शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 15:35 IST

Politics Kolhapur- कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बंडखोरी होऊ नये यासाठी ८१ प्रभागांत स्वबळावर लढल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी स्पष्टोक्ती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

ठळक मुद्दे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत : हसन मुश्रीफ जे बोलतो ते सत्यात आणतो, मे महिन्यांत थेट पाईपलाईनचे काम पूर्ण : पालकमंत्री सतेज पाटील

 कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बंडखोरी होऊ नये यासाठी ८१ प्रभागांत स्वबळावर लढल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी स्पष्टोक्ती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी दहा वर्षांत शहरात विकासगंगा आणली असून ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आगामी निवडणुकीत जनतेने आमच्या पाठीशी राहावे, असे आवाहन केले. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.मुश्रीफ म्हणाले, भाजपमुळेच थेट पाईपलाईन रखडली. राजकारणबाजूला ठेवून त्यांनी सर्व शासकीय परवानगी मिळवून दिल्या पाहिजे होत्या. आमदार चंद्रकांत जाधव यांनी उभारलेले कार्यालय नक्कीच गोरगरिबांना आधार ठरेल. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारे ठरेल. परदेशातून २० हजार लोक राज्यात आल्याचे संकेत असून सर्वांनी १५ दिवस खबरदारी घ्यावी.जे बोलतो ते सत्यात उतरवतो : पालकमंत्री पाटीलराज्यात भाजप सरकार असताना कोल्हापूरसाठी निधी मिळाला नाही. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर तातडीने ४७ कोटींचा निधी आणला. थेट पाईपलाईनचे काम मे महिन्यांत पूर्ण होणार आहे. विकासाच्या दृष्टिकोन ठेवून काम करत आहोत. कधीही चुकीचे आश्वासने दिली नाहीत. जे बोलतो ते सत्यात उतरवतो, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आवर्जून सांगितले. चंद्रकांत जाधव व्हिजन असणारे आमदार आहेत. त्यांना सर्व बाबतीतील ज्ञान आहे. त्यांनी उभारलेल्या कार्यालय नागरिकांना हक्काचे कार्यालय ठरेल, असेही ते म्हणाले.ही कसली सुप्त लाटभाजपच्या एका नगरसेवकाच्या कार्यपुस्तिका प्रकाशनावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बिहारप्रमाणे कोल्हापूर महापालिकेतीही सुप्त लाट असल्याचे म्हटले. मात्र, पदवीधर मतदारसंघाचे त्यांनी १२ वर्षे प्रतिनिधीत्व केले तेथे सुप्त लाट करू शकले नाहीत. महापालिकेत काय सुप्त लाट आणणार, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.माजी आमदार मालोजीराजे पुन्हा सक्रियमाजी आमदार मालोजीराजे यावेळी आवर्जुन हजेरी लावली. सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम केल्यास रखडलेले प्रश्न मार्गी लागतील, असेही त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांना मानणारे आजी-माजी नगरसेवकही कार्यक्रमाला उपस्थित होते. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. मुश्रीफांनीही राजे पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याचे म्हटले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ