शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

स्वातंत्र्यसैनिक बाबूराव हासुरे यांचे निधन, कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 16:11 IST

१९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिगत राहून देशासाठी त्यांनी काम केले होते

कसबा सांगाव : कसबा सांगाव येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबूराव पिरगोंडा हसुरे (वय ९६) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार रूपाली सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशीलकुमार संसारे यांनी शासनाच्या वतीने आदरांजली वाहिली. जि. प. सदस्य युवराज पाटील यांनीही पार्थिवाचे दर्शन घेतले.१९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिगत राहून देशासाठी त्यांनी काम केले होते. सरकारी चावडी, पोस्ट ऑफिस जाळणे, टेलिफोनच्या तारा तोडून दळणवळणामध्ये अडचणी निर्माण करणे, या कार्यामध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. कसबा सांगाव गावालगत महाराणी इंदुमती पार्क येथे इंग्रज अधिकारी वापरत असलेला बंगला जाळून टाकण्यात त्यांचा सहभाग होता. गारगोटी येथील सरकारी खजिना व हत्यारे लुटीमध्ये ते सहभागी होते.भारत छोडो, चले जाव आंदोलनांमध्ये अहिंसा तत्त्वावर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, नागनाथअण्णा नायकवडी, दादासाहेब मगदूम, शिवराम मर्दाने या स्वातंत्र्यसैनिकांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यरत होते.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गावातील विविध संस्था स्थापनेत त्यांचा सहभाग होता. त्यांनी कोल्हापूर जिल्हा स्वातंत्रसैनिक संघटना, जिल्हा खादी ग्रामोद्योग समिती व दादासाहेब मगदूम स्मारक समितीमध्ये संचालक म्हणून काम केले आहे. ते कुमार विद्यामंदिर शाळेचे चेअरमन म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर