शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

चौथरा जाग्यावर; टाकी गायब

By admin | Updated: January 29, 2015 00:32 IST

सातवे नळपाणी योजनेत गैरकारभार : कोटींवर खर्च करून शिंदेवाडी, वाळकेवाडीत पाणीटंचाई

पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील जलस्वराज्य योजनेंतर्गत असलेल्या पाणीपुरवठा योजनेत गैरकारभार झाल्याने ८ जानेवारी रोजी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकासह १२ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. या योजनेत ‘ढपला’ कुणी, किती मारला याची चर्चा आता सुरू आहे. राजकीय वरदहस्त, अधिकाऱ्यांचे संगनमत यामुळे तक्रारीनंतर थेट कारवाईकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, तपासणीत निदर्शनास आलेला गैरकारभार, झालेली कारवाई यांवर प्रकाशझोत टाकणारी मालिका आजपासून... 

भीमगोंडा देसाई - कोल्हापूरजलस्वराज्य योजनेंतर्गत सातवे (ता. पन्हाळा) येथील नळपाणी पुरवठा योजनेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला असून ढपलामारीची चर्चा सुरू झाली आहे. वाळकेवाडीत चौथरा बांधला आहे; मात्र पाण्याची टाकी गायब आहे. तत्कालीन ग्रामपंचायत कारभाऱ्यांनी ‘अर्थपूर्ण पाणी’ मुरविले, हे चौकशीत उघड झाले आहे. जागतीक बँकेच्या अर्थसाहाय्याने सातवे गावासाठी सन २००६-०७ साली जलस्वराज्य योजनेतून एक कोटी ११ लाख रुपये मंजूर झाले. ग्रामपंचायत व ग्रामीण पाणीपुरवठा, महिला सबलीकरण, सामाजिक लेखापरीक्षण या समितीतर्फे योजनेची अंमलबजावणी झाली. दहा टक्के लोकवर्गणीही संकलित केली. कामाचा ठेका कऱ्हाडचे रामचंद्र पोवार यांनी घेतला. ठेका घेतल्यानंतर दोन महिन्यांनी रामचंद्र यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ठेकेदारी सांभाळत कारभाऱ्यांनी योजना पूर्ण केली. योजनेसाठी गावसभा होऊन निर्णय होणे अपेक्षित असताना गावसभा कागदावर राहिली आणि कारभाऱ्यांनी डल्ला मारला. त्यामुळे योजनेत त्रुटी राहिल्या.वाड्या, वस्त्यांमध्ये पाणी जाऊन पडले नाही; त्यामुळे कोटींपेक्षा अधिक खर्च झालेला पैसा मुरल्याची शंका येऊ लागली. त्यातूनच रहिवासी उत्तम रंगराव नंदूरकर यांनी तीन वर्षांपूर्वी पहिली तक्रार केली. कारवाईसाठी वेळोवळी वरिष्ठांकडेही साकडे घातले. २५ फेब्रुवारी २०१३ रोजी उत्तम यांनी पुणे विभागाचे आयुक्त यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले. सातवे ग्रामपंचायत हद्दीतील वाळकेवाडी, शिंदेवाडीला योजना सुरू झाल्यापासून पाणीपुरवठा झालेला नाही. काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. योजनेसंबंधी कागदपत्रे ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नाहीत. लोकवर्गणीची खोटी आणि बोगस नावे दाखविली आहेत. पावत्या दिलेल्या नाहीत. वाड्या-वस्तीला पाणी पोहोचले नसताही योजनेचे अंतिम बिल काढले आहे. यामध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे. याची खातेनिहाय सखोल चौकशी करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले. तरीही थेट कारवाई न झाल्याने त्यांनी वारंवार चिकाटीने पाठपुरावा सुरूच ठेवला. उत्तम यांनी १५ आॅगस्ट २०१४ रोजी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, यासाठी उपोषणाचा इशारा देऊन जोरदार रेटा लावला. परिणामी, प्रकरण आता शेकणार म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे धाडस केले. पन्हाळा पंचायत समितीच्या सौ. एन. आर. परीट, शाहूवाडी-पन्हाळ्याचे उपअभियंता जगदीश काटकर यांनी चौकशी केली. यात योजना पूर्ण झाल्यानंतरही बाळकेवाडी, शिंदेवाडी येथील सर्व रहिवाशांना पाणी मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (क्रमश:) तीन वर्षांपूर्वी तक्रारग्रामसभेत वेळोवेळी निर्णय घेऊन पारदर्शकपणे अंमलबजावणी अपेक्षित होते; परंतु, गावसभा कागदावर आणि कारभारी शिरजोर होऊन डल्ला मारला. त्यामुळे योजनेत अनेक त्रुटी राहिल्या. वाड्या, वस्त्यांमध्ये पाणी जाऊन पडले नाही; त्यामुळे कोटींपेक्षा अधिक खर्च झालेला पैसा मुरल्याची शंका येऊ लागली. त्यातूनच रहिवासी उत्तम रंगराव नंदूरकर यांनी तीन वर्षांपूर्वी पहिली तक्रार केली.