शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

चौथरा जाग्यावर; टाकी गायब

By admin | Updated: January 29, 2015 00:32 IST

सातवे नळपाणी योजनेत गैरकारभार : कोटींवर खर्च करून शिंदेवाडी, वाळकेवाडीत पाणीटंचाई

पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील जलस्वराज्य योजनेंतर्गत असलेल्या पाणीपुरवठा योजनेत गैरकारभार झाल्याने ८ जानेवारी रोजी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकासह १२ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. या योजनेत ‘ढपला’ कुणी, किती मारला याची चर्चा आता सुरू आहे. राजकीय वरदहस्त, अधिकाऱ्यांचे संगनमत यामुळे तक्रारीनंतर थेट कारवाईकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, तपासणीत निदर्शनास आलेला गैरकारभार, झालेली कारवाई यांवर प्रकाशझोत टाकणारी मालिका आजपासून... 

भीमगोंडा देसाई - कोल्हापूरजलस्वराज्य योजनेंतर्गत सातवे (ता. पन्हाळा) येथील नळपाणी पुरवठा योजनेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला असून ढपलामारीची चर्चा सुरू झाली आहे. वाळकेवाडीत चौथरा बांधला आहे; मात्र पाण्याची टाकी गायब आहे. तत्कालीन ग्रामपंचायत कारभाऱ्यांनी ‘अर्थपूर्ण पाणी’ मुरविले, हे चौकशीत उघड झाले आहे. जागतीक बँकेच्या अर्थसाहाय्याने सातवे गावासाठी सन २००६-०७ साली जलस्वराज्य योजनेतून एक कोटी ११ लाख रुपये मंजूर झाले. ग्रामपंचायत व ग्रामीण पाणीपुरवठा, महिला सबलीकरण, सामाजिक लेखापरीक्षण या समितीतर्फे योजनेची अंमलबजावणी झाली. दहा टक्के लोकवर्गणीही संकलित केली. कामाचा ठेका कऱ्हाडचे रामचंद्र पोवार यांनी घेतला. ठेका घेतल्यानंतर दोन महिन्यांनी रामचंद्र यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ठेकेदारी सांभाळत कारभाऱ्यांनी योजना पूर्ण केली. योजनेसाठी गावसभा होऊन निर्णय होणे अपेक्षित असताना गावसभा कागदावर राहिली आणि कारभाऱ्यांनी डल्ला मारला. त्यामुळे योजनेत त्रुटी राहिल्या.वाड्या, वस्त्यांमध्ये पाणी जाऊन पडले नाही; त्यामुळे कोटींपेक्षा अधिक खर्च झालेला पैसा मुरल्याची शंका येऊ लागली. त्यातूनच रहिवासी उत्तम रंगराव नंदूरकर यांनी तीन वर्षांपूर्वी पहिली तक्रार केली. कारवाईसाठी वेळोवळी वरिष्ठांकडेही साकडे घातले. २५ फेब्रुवारी २०१३ रोजी उत्तम यांनी पुणे विभागाचे आयुक्त यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले. सातवे ग्रामपंचायत हद्दीतील वाळकेवाडी, शिंदेवाडीला योजना सुरू झाल्यापासून पाणीपुरवठा झालेला नाही. काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. योजनेसंबंधी कागदपत्रे ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नाहीत. लोकवर्गणीची खोटी आणि बोगस नावे दाखविली आहेत. पावत्या दिलेल्या नाहीत. वाड्या-वस्तीला पाणी पोहोचले नसताही योजनेचे अंतिम बिल काढले आहे. यामध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे. याची खातेनिहाय सखोल चौकशी करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले. तरीही थेट कारवाई न झाल्याने त्यांनी वारंवार चिकाटीने पाठपुरावा सुरूच ठेवला. उत्तम यांनी १५ आॅगस्ट २०१४ रोजी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, यासाठी उपोषणाचा इशारा देऊन जोरदार रेटा लावला. परिणामी, प्रकरण आता शेकणार म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे धाडस केले. पन्हाळा पंचायत समितीच्या सौ. एन. आर. परीट, शाहूवाडी-पन्हाळ्याचे उपअभियंता जगदीश काटकर यांनी चौकशी केली. यात योजना पूर्ण झाल्यानंतरही बाळकेवाडी, शिंदेवाडी येथील सर्व रहिवाशांना पाणी मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (क्रमश:) तीन वर्षांपूर्वी तक्रारग्रामसभेत वेळोवेळी निर्णय घेऊन पारदर्शकपणे अंमलबजावणी अपेक्षित होते; परंतु, गावसभा कागदावर आणि कारभारी शिरजोर होऊन डल्ला मारला. त्यामुळे योजनेत अनेक त्रुटी राहिल्या. वाड्या, वस्त्यांमध्ये पाणी जाऊन पडले नाही; त्यामुळे कोटींपेक्षा अधिक खर्च झालेला पैसा मुरल्याची शंका येऊ लागली. त्यातूनच रहिवासी उत्तम रंगराव नंदूरकर यांनी तीन वर्षांपूर्वी पहिली तक्रार केली.