शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

नवे शिक्षण धोरण: चार वर्षांच्या 'बी.एड'मुळे बेकारांची फौज होणार..!

By संदीप आडनाईक | Updated: January 9, 2024 13:11 IST

२०३० पासून चार वर्षांच्या शिक्षकांची भरती

संदीप आडनाईक कोल्हापूर : राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये २०२४ च्या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. डी.एड. प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे बंद केली असून बी.एड. कॉलेजसंदर्भातही शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, या निर्णयाची गंभीरपणे अंमलबजावणी झाली नाही तर भविष्यात विद्यार्थी संख्या वाढून या शिक्षक हाेऊ घातलेल्या बेकारांची फौज निर्माण होईल, अशी भीती शिक्षण विषयातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.एनसीटीईने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत एकात्मिक शिक्षक कार्यक्रमात चार वर्षांच्या बीएडची तरतूद केली आहे, राज्यात सध्या ४६८ बीएड महाविद्यालये आहेत. २०१५ मध्ये एक वर्षाचा बीएड अभ्यासक्रम बंद होऊन दोन वर्षांचा झाला. प्रत्येक महाविद्यालयात ५० विद्यार्थ्यांना शिकवण्याची सोय असली तरी या महाविद्यालयांतील या सर्वच जागा भरल्या गेलेल्या नाहीत. याचे कारण भविष्यात शिक्षकांची नोकरी मिळेलच याची खात्री नाही.याउलट खात्रीपूर्वक नोकरी मिळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत अनेक खासगी संस्थाचालकांच्या बीएड महाविद्यालयांच्या जागा मात्र भरलेल्या आहेत. तिथे ना पायाभूत सुविधा, ना हजेरीचे बंधन. असे असतानाही या महाविद्यालयांमधून शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना आणि केवळ प्रमाणपत्र मिळाल्यामुळे नोकरी करणाऱ्या शिक्षकांच्या हाती विद्यार्थी शिकणार आहेत, हा विरोधाभास निर्माण झाला आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०३० पर्यंत राज्यात पूर्णपणे सर्वच वर्गांसाठी लागू होईल. कौशल्य विकास, संशोधन व विद्यार्थ्यांच्या आवडीला त्यात प्राधान्य आहे. यावर्षी राज्यातील १३ अकृषिक विद्यापीठात त्याची अंमलबजावणी होईल. सध्या देशातील ७५ महाविद्यालयांत प्रायोगिक तत्त्वावर चार वर्षांच्या बीएडचे अभ्यासक्रम सुरू आहेत. त्याचे परिणाम समोर आल्यानंतरच या बीएड अभ्यासक्रम पद्धतीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी तज्ज्ञांनी केली आहे.२०३० पासून चार वर्षांच्या शिक्षकांची भरती२०२८ या वर्षीची तुकडी ही दोन वर्षांच्या बीएडची शेवटची असून २०३० पासून शिक्षकांची केली जाणारी भरती ही चार वर्षांच्या अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या दर्जेदार शिक्षकांचीच असणार आहे. त्यामुळे सध्या मान्यता देण्यात आलेल्या कॉलेजमध्ये बीएड करणाऱ्या संभाव्य शिक्षकांचेही भवितव्य धोक्यात आले आहे. कारण ही महाविद्यालये आणखी चार वर्षेच सुरू राहतील. भविष्यात मात्र शिक्षक होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा इंटिग्रेटेड ‘बी.एड.’चा अभ्यासक्रमच करावा लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducationशिक्षणTeacherशिक्षक