शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

दिवसा विजेसाठी मोजावे लागणार रोजचे चार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 11:40 IST

शेतीला दिवसा वीज पुरवण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करायची तर महावितरणला खासगी कंपन्याकडून रोज दोन हजार मेगावॅट वीज घ्यावी लागणार

नसिम सनदी

कोल्हापूर : शेतीला दिवसा वीज पुरवण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करायची तर महावितरणला खासगी कंपन्याकडून रोज दोन हजार मेगावॅट वीज घ्यावी लागणार आहे. त्यासाठी दर दिवशी चार कोटी याप्रमाणे महिन्याला १०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या मदतीनेच तयार केलेल्या प्रस्तावातून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार हा भार उचलणार का, यावरच दिवसा विजेच्या निर्णयाचे भवितव्य अवलंबून आहे.

या प्रस्तावामुळे दिवसा वीज देणे आर्थिकदृष्ट्या व वहनक्षमता, निर्मितीच्या तुलनेत कितपत शक्य आहे याचा आता नव्याने अभ्यास सुरु झाला आहे. आयआयटीच्या तज्ज्ञ समितीमार्फत या प्रस्तावावर आठ दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. सरकारला दिलेल्या या प्रस्तावात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवायची तर ५ हजार ६१९ मेगावॅट विजेच्या विभागणीचा आधी विचार करावा लागतो. १५ स्लाॅटमध्येच पण पहाटे ४ ते रात्री ११ या वेळेत शेतीचे वेळापत्रक बसवता येते, शिवाय महावितरणची आहे ती यंत्रणादेखील ढेपाळणार नाही हे आकडेवारीसह सिध्द करुन दाखवण्यात आले आहे. सध्या दिवसा २२ हजार मेगावॅट विजेची मागणी आहे, शेतीची त्यात भर टाकली तर ती २८ हजार मेगावॅटपर्यंत जाईल.

खरेदी १० रुपये,विक्री १ रुपये ७६ पैसे

पावसाळ्यात कृषीपंप बंद असतात. साधारपणे डिसेंबरनंतरच हा पुरवठा सुरु होतो. म्हणजेच केवळ ६ महिने शेतीसाठी वीजपुरवठा करावा लागतो. त्यातही मार्च ते मे या तीन महिन्यात शेतीसाठीची मागणी जास्त असते. सध्या असणारी वीजनिर्मिती पाहता २ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा जाणवतो. तो खासगी कंपन्यांकडून खरेदी केल्यास जास्त मागणीच्या काळातील विजेचा दर द्यावा लागतो, त्यासाठी प्रतियुनिट १० रुपये मोजावे लागणार आहे. सरकार महावितरणला अनुदान देऊन शेतीसाठी १ रुपये ७६ पैसे या सवलतीच्या दराने वीज पुरवते. जास्त दराने वीज खरेदी करायची म्हटली तर दिवसाला ४ कोटीप्रमाणे पुढील अडीच महिन्यांसाठी २५० कोटी रुपयांची व्यवस्था सरकारला करावी लागेल.

तास वाढवण्यासाठीही द्राविडी प्राणायाम

वीज किती तास द्यायची याचे अधिकार वीज नियामक आयोगाकडे असतात. ८ ऐवजी १० तास वीज द्यायची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे, मग त्यांच्याकडून आयोगाकडे पाठवावा लागतो. हा द्राविडी प्राणायाम करावा लागणार आहे.

शेतकऱ्यांसाठी २५० कोटी रुपये खर्च करणे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत कठीण असले तरी अशक्य नाही. मंत्र्याची दालने, त्यांच्यावरचा खर्च कमी केला तर ही रक्कम उभी राहू शकते. शेतकऱ्यांसाठी म्हणून सरकारने हा भार उचलायला हवा. -राजू शेट्टी, माजी खासदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीजmahavitaranमहावितरण