शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

Pratibha Patil: “मजबूत सरकारसमोर सक्षम विरोधक असणे गरजेचे, तर लोकशाही चांगल्याप्रकारे टिकेल”: प्रतिभाताई पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 23:03 IST

Pratibha Patil: राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याांचा दौरा केल्याचे प्रतिभाताई पाटील यांनी सांगितले.

कराड: मजबूत सरकारसमोर सक्षम विरोधक असणे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. असे असले तर लोकशाही चांगल्या पद्धतीने टिकू शकते. राजकारणात विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी कार्यरत रहायला हवे, असे प्रतिपादन देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले आहे. कोल्हापूर दौऱ्याहून पुण्याला परतत असताना साताऱ्यात विश्रामगृहात त्या थांबल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. अदमापूरला जाऊन बाळूमामांचे दर्शन घेतले. त्यावेळी आदमापूर येथे असे सांगण्यात आले की, अमावस्येच्या दिवशी जवळपास एक लाख भाविक तेथे येतात. त्यांच्या पाण्याची सोय इथे होत नाही. तरी ती व्हावी, अशी मागणी तेथील लोकांनी आपल्याकडे केली. यावर तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आदमापूरात पाण्याची सोय करावी. पाण्याचे टँकर त्यादिवशी उपलब्ध करून देण्याबाबत सूचवले होते. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी होकार दिला, असे प्रतिभाताई पाटील यांनी सांगितले. 

साताऱ्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात खूप बदल झालेत

राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याांचा दौरा केला. महाराष्ट्राबद्दल नैसर्गिक ओढ असल्याने निवृत्तीनंतर दिल्लीला न राहता महाराष्ट्रातच स्थायिक झाले. महाराष्ट्र खूप गोड आहे. त्यामुळे त्याचे आपणास आकर्षण आहे. अलीकडच्या काळात साताऱ्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात खूप बदल झाले आहेत. औद्योगिक सुधारणा झाल्या आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचे युग आहे. सर्वत्र डिजिटलायझेशन झाले. ही चांगली गोष्ट आहे, असेही प्रतिभाताई पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, साताऱ्याला शिवाजी महाराजांचा वारसा लाभल्याने ऐतिहासिक महत्त्व आहेच. पण, स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असणारे मोठे स्वातंत्र्य सैनिकही येथे होऊन गेल्याने त्या दृष्टीनेही साताऱ्याला खूप महत्त्व आहे. नुकतेच छत्रपती उदयनराजे भोसले भेटून गेले. अतिशय आनंद वाटला. येथीलच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले, असे सांगत अनेक आठवणी प्रतिभाताई पाटील यांनी जागवल्या. 

टॅग्स :Pratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलKaradकराडkolhapurकोल्हापूर