शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

Pratibha Patil: “मजबूत सरकारसमोर सक्षम विरोधक असणे गरजेचे, तर लोकशाही चांगल्याप्रकारे टिकेल”: प्रतिभाताई पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 23:03 IST

Pratibha Patil: राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याांचा दौरा केल्याचे प्रतिभाताई पाटील यांनी सांगितले.

कराड: मजबूत सरकारसमोर सक्षम विरोधक असणे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. असे असले तर लोकशाही चांगल्या पद्धतीने टिकू शकते. राजकारणात विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी कार्यरत रहायला हवे, असे प्रतिपादन देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले आहे. कोल्हापूर दौऱ्याहून पुण्याला परतत असताना साताऱ्यात विश्रामगृहात त्या थांबल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. अदमापूरला जाऊन बाळूमामांचे दर्शन घेतले. त्यावेळी आदमापूर येथे असे सांगण्यात आले की, अमावस्येच्या दिवशी जवळपास एक लाख भाविक तेथे येतात. त्यांच्या पाण्याची सोय इथे होत नाही. तरी ती व्हावी, अशी मागणी तेथील लोकांनी आपल्याकडे केली. यावर तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आदमापूरात पाण्याची सोय करावी. पाण्याचे टँकर त्यादिवशी उपलब्ध करून देण्याबाबत सूचवले होते. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी होकार दिला, असे प्रतिभाताई पाटील यांनी सांगितले. 

साताऱ्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात खूप बदल झालेत

राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याांचा दौरा केला. महाराष्ट्राबद्दल नैसर्गिक ओढ असल्याने निवृत्तीनंतर दिल्लीला न राहता महाराष्ट्रातच स्थायिक झाले. महाराष्ट्र खूप गोड आहे. त्यामुळे त्याचे आपणास आकर्षण आहे. अलीकडच्या काळात साताऱ्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात खूप बदल झाले आहेत. औद्योगिक सुधारणा झाल्या आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचे युग आहे. सर्वत्र डिजिटलायझेशन झाले. ही चांगली गोष्ट आहे, असेही प्रतिभाताई पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, साताऱ्याला शिवाजी महाराजांचा वारसा लाभल्याने ऐतिहासिक महत्त्व आहेच. पण, स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असणारे मोठे स्वातंत्र्य सैनिकही येथे होऊन गेल्याने त्या दृष्टीनेही साताऱ्याला खूप महत्त्व आहे. नुकतेच छत्रपती उदयनराजे भोसले भेटून गेले. अतिशय आनंद वाटला. येथीलच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले, असे सांगत अनेक आठवणी प्रतिभाताई पाटील यांनी जागवल्या. 

टॅग्स :Pratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलKaradकराडkolhapurकोल्हापूर