शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

Pratibha Patil: “मजबूत सरकारसमोर सक्षम विरोधक असणे गरजेचे, तर लोकशाही चांगल्याप्रकारे टिकेल”: प्रतिभाताई पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 23:03 IST

Pratibha Patil: राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याांचा दौरा केल्याचे प्रतिभाताई पाटील यांनी सांगितले.

कराड: मजबूत सरकारसमोर सक्षम विरोधक असणे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. असे असले तर लोकशाही चांगल्या पद्धतीने टिकू शकते. राजकारणात विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी कार्यरत रहायला हवे, असे प्रतिपादन देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले आहे. कोल्हापूर दौऱ्याहून पुण्याला परतत असताना साताऱ्यात विश्रामगृहात त्या थांबल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. अदमापूरला जाऊन बाळूमामांचे दर्शन घेतले. त्यावेळी आदमापूर येथे असे सांगण्यात आले की, अमावस्येच्या दिवशी जवळपास एक लाख भाविक तेथे येतात. त्यांच्या पाण्याची सोय इथे होत नाही. तरी ती व्हावी, अशी मागणी तेथील लोकांनी आपल्याकडे केली. यावर तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आदमापूरात पाण्याची सोय करावी. पाण्याचे टँकर त्यादिवशी उपलब्ध करून देण्याबाबत सूचवले होते. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी होकार दिला, असे प्रतिभाताई पाटील यांनी सांगितले. 

साताऱ्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात खूप बदल झालेत

राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याांचा दौरा केला. महाराष्ट्राबद्दल नैसर्गिक ओढ असल्याने निवृत्तीनंतर दिल्लीला न राहता महाराष्ट्रातच स्थायिक झाले. महाराष्ट्र खूप गोड आहे. त्यामुळे त्याचे आपणास आकर्षण आहे. अलीकडच्या काळात साताऱ्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात खूप बदल झाले आहेत. औद्योगिक सुधारणा झाल्या आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचे युग आहे. सर्वत्र डिजिटलायझेशन झाले. ही चांगली गोष्ट आहे, असेही प्रतिभाताई पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, साताऱ्याला शिवाजी महाराजांचा वारसा लाभल्याने ऐतिहासिक महत्त्व आहेच. पण, स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असणारे मोठे स्वातंत्र्य सैनिकही येथे होऊन गेल्याने त्या दृष्टीनेही साताऱ्याला खूप महत्त्व आहे. नुकतेच छत्रपती उदयनराजे भोसले भेटून गेले. अतिशय आनंद वाटला. येथीलच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले, असे सांगत अनेक आठवणी प्रतिभाताई पाटील यांनी जागवल्या. 

टॅग्स :Pratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलKaradकराडkolhapurकोल्हापूर