शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

धर्मसंकटातील 'के. पी. पाटीलां'ना काँग्रेस पाठबळ देणे शक्य, शरद पवारांसोबतच राहण्याचा दिला सल्ला

By राजाराम लोंढे | Updated: July 5, 2023 13:53 IST

माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासमोर ‘दादा’ की ‘साहेब’ असे धर्मसंकट

राजाराम लोंढे कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासमोर ‘दादा’ की ‘साहेब’ असे धर्मसंकट उभे राहिले आहे. त्यांच्यादृष्टीने ‘बिद्री’ कारखाना व आमदारकी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी तेथील राजकीय त्रांगडे पाहता कोणती भूमिका घ्यावी, अशी संभ्रमावस्था आहे. आगामी ‘लोकसभे’चे गणित सोपे करण्यासाठी त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहावे, असा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांचा आहे. त्या बदल्यात त्यांना विधानसभेला मदत करण्याची भूमिकाही काँग्रेसने घेतल्याचे समजते.गेली अनेक वर्षे ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या माध्यमातून के. पी. पाटील यांचे कागल, करवीर, भुदरगड, राधानगरी तालुक्यांत चांगले नेटवर्क आहे. कारखानाही चांगल्या प्रकारे चालवल्याने त्यांच्याबाबत कार्यक्षेत्रात सहानुभूती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘के. पी.’च्या भूमिका वेगळे महत्त्व आहे. गेली ४० वर्षे ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाेबत आहेत. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर ते काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता आहे.सोमवारी त्यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतल्याने ते त्यांच्यासोबतच राहणार असे वाटते; पण त्यांच्यासमोर ‘राधानगरी’च्या राजकारणाचे त्रांगडे आहे. विधानसभेसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत जावे तर ‘बिद्री’ कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची मंजुरी, चौकशी आणि कारखाना निवडणूक या सगळ्यांमध्ये अडचणी येऊ शकतात. ही भीती त्यांच्या मनात दिसते. पाटील यांच्यासमोर असे धर्मसंकट उभे असताना, काँग्रेसच्या पातळीवरून लोकसभेचे गणित पाहून त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहावे, यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते.

मुश्रीफ यांची समजूत काढून तिथेच थांबू या

आगामी विधानसभेसह एकूणच भुदरगड व राधानगरी तालुक्यांतील राजकारणातील त्रांगडे पाहता, ‘बिद्री’ कारखान्यापुरते मंत्री हसन मुश्रीफ यांची समजूत काढा आणि शरद पवार यांच्यासोबत राहण्याची परवानगी घ्यावी, असा एक मतप्रवाह पाटील यांच्या गटाचा आहे.‘के. पी.’ शरद पवार यांच्यासोबत राहण्यात काँग्रेसचा हा स्वार्थमहाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस हाच ताकदवान पक्ष राहिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ‘कोल्हापूर’ची जागा काँग्रेसला मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. काँग्रेसची ताकद कोल्हापूर शहर, करवीर व राधानगरी तालुक्यांत आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, भुदरगडमध्ये फारसे अस्तित्व नाही. अशा परिस्थितीत लोकसभेची जागा खेचून आणायची म्हटले तर या तालुक्यातील एखादा नेता सोबत असण्याची गरज आहे. दोन-तीन तालुक्यांत प्रभाव असणारे के. पी. पाटील हे सोबत असणे काँग्रेसला फायद्याचे आहे.विधानसभेला ‘के. पीं’ना असे मिळू शकते बळआमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, रिपाइं (काही गट)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणK P. Patilके. पी. पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस