शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धर्मसंकटातील 'के. पी. पाटीलां'ना काँग्रेस पाठबळ देणे शक्य, शरद पवारांसोबतच राहण्याचा दिला सल्ला

By राजाराम लोंढे | Updated: July 5, 2023 13:53 IST

माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासमोर ‘दादा’ की ‘साहेब’ असे धर्मसंकट

राजाराम लोंढे कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासमोर ‘दादा’ की ‘साहेब’ असे धर्मसंकट उभे राहिले आहे. त्यांच्यादृष्टीने ‘बिद्री’ कारखाना व आमदारकी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी तेथील राजकीय त्रांगडे पाहता कोणती भूमिका घ्यावी, अशी संभ्रमावस्था आहे. आगामी ‘लोकसभे’चे गणित सोपे करण्यासाठी त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहावे, असा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांचा आहे. त्या बदल्यात त्यांना विधानसभेला मदत करण्याची भूमिकाही काँग्रेसने घेतल्याचे समजते.गेली अनेक वर्षे ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या माध्यमातून के. पी. पाटील यांचे कागल, करवीर, भुदरगड, राधानगरी तालुक्यांत चांगले नेटवर्क आहे. कारखानाही चांगल्या प्रकारे चालवल्याने त्यांच्याबाबत कार्यक्षेत्रात सहानुभूती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘के. पी.’च्या भूमिका वेगळे महत्त्व आहे. गेली ४० वर्षे ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाेबत आहेत. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर ते काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता आहे.सोमवारी त्यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतल्याने ते त्यांच्यासोबतच राहणार असे वाटते; पण त्यांच्यासमोर ‘राधानगरी’च्या राजकारणाचे त्रांगडे आहे. विधानसभेसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत जावे तर ‘बिद्री’ कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची मंजुरी, चौकशी आणि कारखाना निवडणूक या सगळ्यांमध्ये अडचणी येऊ शकतात. ही भीती त्यांच्या मनात दिसते. पाटील यांच्यासमोर असे धर्मसंकट उभे असताना, काँग्रेसच्या पातळीवरून लोकसभेचे गणित पाहून त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहावे, यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते.

मुश्रीफ यांची समजूत काढून तिथेच थांबू या

आगामी विधानसभेसह एकूणच भुदरगड व राधानगरी तालुक्यांतील राजकारणातील त्रांगडे पाहता, ‘बिद्री’ कारखान्यापुरते मंत्री हसन मुश्रीफ यांची समजूत काढा आणि शरद पवार यांच्यासोबत राहण्याची परवानगी घ्यावी, असा एक मतप्रवाह पाटील यांच्या गटाचा आहे.‘के. पी.’ शरद पवार यांच्यासोबत राहण्यात काँग्रेसचा हा स्वार्थमहाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस हाच ताकदवान पक्ष राहिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ‘कोल्हापूर’ची जागा काँग्रेसला मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. काँग्रेसची ताकद कोल्हापूर शहर, करवीर व राधानगरी तालुक्यांत आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, भुदरगडमध्ये फारसे अस्तित्व नाही. अशा परिस्थितीत लोकसभेची जागा खेचून आणायची म्हटले तर या तालुक्यातील एखादा नेता सोबत असण्याची गरज आहे. दोन-तीन तालुक्यांत प्रभाव असणारे के. पी. पाटील हे सोबत असणे काँग्रेसला फायद्याचे आहे.विधानसभेला ‘के. पीं’ना असे मिळू शकते बळआमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, रिपाइं (काही गट)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणK P. Patilके. पी. पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस