शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळातील विजेचे बिल माफ करा,अन्यथा... राजू शेट्टी यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 17:50 IST

लॉकडाऊनच्या काळातील विजेचे बिल माफ करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या कालॉकडाऊनच्या काळातील विजेचे बिल माफ करा-राजू शेट्टी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय राज्यस्तरीय आंदोलन

कोल्हापुर- लॉकडाऊनच्या काळातील विजेचे बिल माफ करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला.सोमवारी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यावेळी शेट्टी बोलत होते.

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळपासून सर्वपक्षीय राज्यस्तरीय आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये राजू शेट्टी यांच्यासह अनेक राजकीय कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. कार्यकर्त्यांनी संपूर्ण वीज बिल माफ करावे, अन्यथा इलेक्ट्रिक शॉक राज्य सरकारला देऊ अशा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे .कोरोना काळात हाताला रोजगार नाही, काम नाही, अशा स्थितीत विजेचे दर सरकारने वाढवले आहेत. हे पैसे कसे भरायचे, असा सवाल शेट्टी यांनी केला. महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सुरु आहे, रीडिंगही गेल्या वर्षीच्या सरासरीने काढले आहे, त्यामुळे स्थिर आकारही वाढला आहे, त्यामुळे वीज बिल वाढून आला आहे. क्रिकेट पटू पासून सामान्य नागरिकांपर्यंत वीज बिल वाढलेले आहे. यामुळे वीज वितरण कंपनी हि चेष्टेचा विषय बनली आहे, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.या सर्वपक्षिय राज्यस्तरीय आंदोलनात अनेकांनी महावितरण कंपनीवर टीका केली. लॉकडाऊनच्या काळातील म्हणजे एप्रिल, मे आणि जून महिन्यातील विजेचे संपूर्ण बिल माफ करा, अशी मागणी या आंदोलनात अनेकांनी केली आहे.

वीज ग्राहक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रताप होगाडे म्हणाले, अडचणीच्या काळात गुजरात, कर्नाटक, हरियाणा, मध्यप्रदेश राज्यांनी पॅकेज देऊन तेथील जनतेला दिलासा दिला. येथे केंद्र सरकार व राज्य सरकारने काय केले. येथे पोट भरायसाठी पैसे नसताना बिले भरायची कुठून? तीन महिन्यांचे ३०० युनिटपर्यंतचे संपूर्ण बिल माफ करायचे म्हटले तर ४५०० कोटी रुपये लागतील.

यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, बाबा पार्टे, प्रा. जालंदर पाटील, बाबासाहेब देवकर, राजेंद्र सूर्यवंशी, सुभाष देसाई, दिलीप देसाई, संभाजीराव जगदाळे आदी उपस्थित होते. दरम्यान, दुपारी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर