शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
5
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
7
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
8
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
9
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
10
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
11
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
12
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
13
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
14
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
18
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
19
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
20
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळातील विजेचे बिल माफ करा,अन्यथा... राजू शेट्टी यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 17:50 IST

लॉकडाऊनच्या काळातील विजेचे बिल माफ करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या कालॉकडाऊनच्या काळातील विजेचे बिल माफ करा-राजू शेट्टी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय राज्यस्तरीय आंदोलन

कोल्हापुर- लॉकडाऊनच्या काळातील विजेचे बिल माफ करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला.सोमवारी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यावेळी शेट्टी बोलत होते.

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळपासून सर्वपक्षीय राज्यस्तरीय आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये राजू शेट्टी यांच्यासह अनेक राजकीय कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. कार्यकर्त्यांनी संपूर्ण वीज बिल माफ करावे, अन्यथा इलेक्ट्रिक शॉक राज्य सरकारला देऊ अशा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे .कोरोना काळात हाताला रोजगार नाही, काम नाही, अशा स्थितीत विजेचे दर सरकारने वाढवले आहेत. हे पैसे कसे भरायचे, असा सवाल शेट्टी यांनी केला. महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सुरु आहे, रीडिंगही गेल्या वर्षीच्या सरासरीने काढले आहे, त्यामुळे स्थिर आकारही वाढला आहे, त्यामुळे वीज बिल वाढून आला आहे. क्रिकेट पटू पासून सामान्य नागरिकांपर्यंत वीज बिल वाढलेले आहे. यामुळे वीज वितरण कंपनी हि चेष्टेचा विषय बनली आहे, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.या सर्वपक्षिय राज्यस्तरीय आंदोलनात अनेकांनी महावितरण कंपनीवर टीका केली. लॉकडाऊनच्या काळातील म्हणजे एप्रिल, मे आणि जून महिन्यातील विजेचे संपूर्ण बिल माफ करा, अशी मागणी या आंदोलनात अनेकांनी केली आहे.

वीज ग्राहक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रताप होगाडे म्हणाले, अडचणीच्या काळात गुजरात, कर्नाटक, हरियाणा, मध्यप्रदेश राज्यांनी पॅकेज देऊन तेथील जनतेला दिलासा दिला. येथे केंद्र सरकार व राज्य सरकारने काय केले. येथे पोट भरायसाठी पैसे नसताना बिले भरायची कुठून? तीन महिन्यांचे ३०० युनिटपर्यंतचे संपूर्ण बिल माफ करायचे म्हटले तर ४५०० कोटी रुपये लागतील.

यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, बाबा पार्टे, प्रा. जालंदर पाटील, बाबासाहेब देवकर, राजेंद्र सूर्यवंशी, सुभाष देसाई, दिलीप देसाई, संभाजीराव जगदाळे आदी उपस्थित होते. दरम्यान, दुपारी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर