शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

‘आरटीओ’त हेल्मेट सक्ती  : अजित शिंदे, ३० व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 18:39 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यापासून पहिल्यांदा हेल्मेट सक्तीची सुरुवात करावी. याचा विचार करून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) अधिकारी व कर्मचारी  मंगळवारपासून कार्यालयात हेल्मेट घालून येतील, अशी घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केली. जे परिवहन अधिकारी, कर्मचारी हेल्मेट घालून येणार नाहीत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगरू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे‘आरटीओ’त हेल्मेट सक्ती : अजित शिंदे ३० व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात घोषणा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यापासून पहिल्यांदा हेल्मेट सक्तीची सुरुवात करावी. याचा विचार करून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) अधिकारी व कर्मचारी  मंगळवारपासून कार्यालयात हेल्मेट घालून येतील, अशी घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केली. जे परिवहन अधिकारी, कर्मचारी हेल्मेट घालून येणार नाहीत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगरू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.३० व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते ताराबाई पार्कातील परिवहन कार्यालयात बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठातील क्रीडा अधिविभागप्रमुख प्रा. पी. डी. गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव, आदींची प्रमुख उपस्थिती होती. रविवार (दि. १०) पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.अजित शिंदे म्हणाले, बिहार, तमिळनाडूमध्ये हेल्मेटसक्ती आहे; पण महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत हेल्मेट सक्ती नाही. आपली सुरक्षा, आपल्या हाती आहे. आपल्याला सुधारायचे असेल, तर आपण स्वत: सुधारले पाहिजे, तरच समाज सुधारेल आणि आपणही सुखी व्हाल. १९८५ ला त्याकाळी अत्याधुनिक पद्धतीच्या दुचाकी, चारचाकी येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वाहनांची संख्या वाढली; परंतु, रस्ते वाढले नाहीत. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक केले. तसेच जे अधिकारी, कर्मचारी हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर परिवहन व पोलीस विभागातर्फे कारवाई करू.अनिल गुजर म्हणाले, केवळ सात दिवस रस्ते सुरक्षा अभियानात वाहनांचे नियम पाळू नका. ते कायमस्वरूपी पाळावे, तरच रस्ते सुरक्षा अभियानाचा उद्देश सफल झाला, असे म्हणता येईल. यावेळी पी. डी. गायकवाड यांनी वाहतूक नियमांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्पीडवर नियंत्रण ठेवले पाहिजे, मनाचा वेग वाढवू नका. हेल्मेटसक्ती होणे गरजेचे आहे.

आपण नियम पाळूनसुद्धा चुका करूनये, असा सल्ला दिला. यानंतर मिशन डिफेन्स ड्रायव्हिंग स्टिकर्स वाहनांवर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले. यावेळी चारचाकी, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, महाविद्यालयीन युवक-युवती उपस्थित होते. वरिष्ठ मोटारवाहन निरीक्षक पी. डी. सावंत यांनी प्रास्ताविक केले. साहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर