शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शुभ्र काही जीवघेणे.. गोपाळ समाजाचे वेदनामय जिणे; शासकीय योजनांचा लाभ नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 16:20 IST

कोणत्या निकषात बसवायचे?

कोल्हापूर : एरवी गोऱ्या रंगासाठी मुला-मुलींपासून ते महिला-पुरुषांपर्यंत सगळे जंगजंग पछाडतात, ढीगभर क्रीम, कॉस्मॅटिक, नैसर्गिक, आयुर्वेदिक उपचारांच्या मागे लागतात, रंग गोरा नाही म्हणून अनेकांचे विवाह जुळत नाहीत.. अशी सर्वसामान्यांची तक्रार असताना हाच पांढरा रंग गोपाळ समाजातील नागरिकांसाठी शाप ठरला आहे. पांढऱ्या रंगाने दिलेल्या संघर्षामुळे पिचलेल्या लोकांनी पहिल्यांदा रस्त्यावर येत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शासनाची दारं ठोठावत किमान आम्हाला शासकीय योजनांचा लाभ द्या, अशी हाक त्यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात रोज कोणती ना कोणती निदर्शने होतात; पण गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हातकणंगले तालुक्यातील दलित महासेनेच्या नेतृत्वाखाली निदर्शने करत असलेल्या या नागरिकांकडे सगळे येता जाता टकामका बघत होते. परदेशातील माणसेही फिकी पडतील एवढे पांढरेफटक दिसणारी लहान मुले, महिला, पुरुष हक्काच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणा देत होते. घोषणांपेक्षा ते दिसतात कसे याकडेच सगळ्यांचे लक्ष होते.

जन्मत:च त्वचादोष असल्याने डोक्याच्या केसापासून, पायाच्या नखापर्यंत सगळं शरीर पांढरेफटक, उन्हाच्या झळांचा अतीव त्रास, दृष्टिदोषामुळे आधार कार्ड निघत नाही, हाताचे ठसे उमटत नसल्याने रेशनकार्ड नाही, शिक्षण नाहीच, या दोषांमुळे कोणी कामावरही घेत नाही.. भीक मागून जगण्याशिवाय पर्याय नाही. शासनाकडून स्त्री, पुरुष, तृतीयपंथी, दिव्यांग अशा सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात; पण या नागरिकांची संख्या कमी असल्याने कोणतीच तरतूद नाही.त्वचारोग असल्याने उन्हात काम करता येत नाही, डोळ्यांना कमी दिसते त्यामुळे व्यवसायाला मर्यादा येतात. भटके विमुक्त असल्याने नागरिकत्वाचा पुरावा नाही. तहसीलदार कार्यालयात दाद घेतली जात नाही. ही व्यथा घेऊन हे लोक दाद मागायला आले होते. शासनाच्या योजना, मोफत धान्य, विनाअट जन्माचे दाखले, जातीचे दाखले, राहायला घरकुल मिळावे एवढ्या त्यांच्या माफक अपेक्षा आहेत.

कोणत्या निकषात बसवायचे?या व्यक्तींना जन्मत: शारीरिक त्रास, व्यंग सुरू होतात; पण बाह्य शरीर धडधाकट असते, त्वचारोगाशी संबंधित आजारांचा दिव्यांग योजनांमध्ये समावेश होत नाही, आधार कार्ड काही जणांचे निघतात, तर काही जणांचे निघत नाही, शिधापत्रिकांचीदेखील तीच अवस्था. कागदपत्रांच्या अभावाने आपण या जिल्ह्यातील, राज्यातील नागरिक आहाेत हेच त्यांना सिद्ध करता येत नाही. मग या लोकांना कोणत्या योजनांच्या निकषात बसवायचे हाच मोठा पेच आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर