शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
5
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
6
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
7
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
8
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
9
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
10
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
11
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
12
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
13
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
14
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
15
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
16
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
17
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
18
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
19
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
20
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

Kolhapur: शुभ्र काही जीवघेणे.. गोपाळ समाजाचे वेदनामय जिणे; शासकीय योजनांचा लाभ नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 16:20 IST

कोणत्या निकषात बसवायचे?

कोल्हापूर : एरवी गोऱ्या रंगासाठी मुला-मुलींपासून ते महिला-पुरुषांपर्यंत सगळे जंगजंग पछाडतात, ढीगभर क्रीम, कॉस्मॅटिक, नैसर्गिक, आयुर्वेदिक उपचारांच्या मागे लागतात, रंग गोरा नाही म्हणून अनेकांचे विवाह जुळत नाहीत.. अशी सर्वसामान्यांची तक्रार असताना हाच पांढरा रंग गोपाळ समाजातील नागरिकांसाठी शाप ठरला आहे. पांढऱ्या रंगाने दिलेल्या संघर्षामुळे पिचलेल्या लोकांनी पहिल्यांदा रस्त्यावर येत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शासनाची दारं ठोठावत किमान आम्हाला शासकीय योजनांचा लाभ द्या, अशी हाक त्यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात रोज कोणती ना कोणती निदर्शने होतात; पण गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हातकणंगले तालुक्यातील दलित महासेनेच्या नेतृत्वाखाली निदर्शने करत असलेल्या या नागरिकांकडे सगळे येता जाता टकामका बघत होते. परदेशातील माणसेही फिकी पडतील एवढे पांढरेफटक दिसणारी लहान मुले, महिला, पुरुष हक्काच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणा देत होते. घोषणांपेक्षा ते दिसतात कसे याकडेच सगळ्यांचे लक्ष होते.

जन्मत:च त्वचादोष असल्याने डोक्याच्या केसापासून, पायाच्या नखापर्यंत सगळं शरीर पांढरेफटक, उन्हाच्या झळांचा अतीव त्रास, दृष्टिदोषामुळे आधार कार्ड निघत नाही, हाताचे ठसे उमटत नसल्याने रेशनकार्ड नाही, शिक्षण नाहीच, या दोषांमुळे कोणी कामावरही घेत नाही.. भीक मागून जगण्याशिवाय पर्याय नाही. शासनाकडून स्त्री, पुरुष, तृतीयपंथी, दिव्यांग अशा सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात; पण या नागरिकांची संख्या कमी असल्याने कोणतीच तरतूद नाही.त्वचारोग असल्याने उन्हात काम करता येत नाही, डोळ्यांना कमी दिसते त्यामुळे व्यवसायाला मर्यादा येतात. भटके विमुक्त असल्याने नागरिकत्वाचा पुरावा नाही. तहसीलदार कार्यालयात दाद घेतली जात नाही. ही व्यथा घेऊन हे लोक दाद मागायला आले होते. शासनाच्या योजना, मोफत धान्य, विनाअट जन्माचे दाखले, जातीचे दाखले, राहायला घरकुल मिळावे एवढ्या त्यांच्या माफक अपेक्षा आहेत.

कोणत्या निकषात बसवायचे?या व्यक्तींना जन्मत: शारीरिक त्रास, व्यंग सुरू होतात; पण बाह्य शरीर धडधाकट असते, त्वचारोगाशी संबंधित आजारांचा दिव्यांग योजनांमध्ये समावेश होत नाही, आधार कार्ड काही जणांचे निघतात, तर काही जणांचे निघत नाही, शिधापत्रिकांचीदेखील तीच अवस्था. कागदपत्रांच्या अभावाने आपण या जिल्ह्यातील, राज्यातील नागरिक आहाेत हेच त्यांना सिद्ध करता येत नाही. मग या लोकांना कोणत्या योजनांच्या निकषात बसवायचे हाच मोठा पेच आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर