शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

गव्हापाठोपाठ आता साखर निर्यातीवरही येणार निर्बंध; केंद्र सरकारच्या हालचाली, लवकरच घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 10:55 IST

१०० लाख टन निर्यातीलाच मिळणार परवानगी

- चंद्रकांत कित्तुरे

कोल्हापूर : गव्हाच्या निर्यातबंदीपाठोपाठ साखरेच्या निर्यातीवरही निर्बंध आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. केवळ १०० लाख टन साखरेच्या निर्यातीलाच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत याबाबत घोषणा केली जाईल.

युक्रेन - रशिया युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या दरात वाढ झाल्याने आणि उष्णतेच्या लाटेमुळे देशातील गव्हाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. साखरेची टंचाई नसतानाही केवळ खबरदारीचा उपाय म्हणून साखरेची मर्यादेबाहेर निर्यात होऊ नये यासाठी निर्बंध घातले जाणार आहेत. ही मर्यादा १०० ते १०५ लाख टन असेल, असा अंदाज आहे.

देशात हंगामाच्या सुरुवातीला ८५ लाख टन साखर शिल्लक होती. चालू हंगामात ३५५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. देशांतर्गत साखरेचा वापर २८० लाख टन गृहीत धरला तर १६५ लाख टन साखर शिल्लक राहते. नव्या हंगामातील साखर बाजारात येण्यास किमान ३ महिने लागतात. महिन्याला २० ते २२ लाख टन साखर देशात लागते. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला तीन महिन्यांची म्हणजेच ६० ते ६५ लाख टन साखर शिल्लक असणे आवश्यक आहे. त्यामुळे १६५ लाख टनपैकी १०० टन साखरेच्या निर्यातीलाच परवानगी द्यावी. 

यापेक्षा जास्त निर्यात केल्यास देशात साखरेची टंचाई निर्माण होऊ शकते. यामुळेच केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे.  ऑल इंडिया शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत ८५ लाख टनपेक्षा जादा साखर निर्यातीचे करार झाले आहेत. सुमारे ७१ लाख टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकार