शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पूरबाधित ऊस येत्या आठ दिवसांत युद्धपातळीवर तोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 15:12 IST

पूरबाधित ऊस तोडण्यासाठी कारखानदारांकडून टाळाटाळ आणि शेतकºयांची लुबाडणूक होत असल्याने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर कारखानदार, शेतकरी संघटना या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूरबाधित ऊसतोडीचा सविस्तर आढावा घेण्यात आला

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांचे कारखान्यांना आदेश: कारखानानिहाय नियंत्रणासाठी सहनिबंधकांची नेमणूक

कोल्हापूर : पूरबाधित ऊस कोणत्याही परिस्थितीत या आठवडाभरात तोडा, परराज्यांतून येणारा ऊसही पूरबुडीतच घ्या, त्यासाठीची यंत्रणा युद्धपातळीवर राबवा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी साखर कारखानदारांना दिले. यावर नियंत्रणासाठी कारखानानिहाय सहनिबंधकांची नेमणूक करावी, अशा सूचना प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिल्या. हा ऊस तोडावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी हे तिस-यांदा आदेश काढले आहेत. तरीही मुर्दाड कारखानदार त्याला दाद देत नाहीत असे चित्र दिसत आहे.

पूरबाधित ऊस तोडण्यासाठी कारखानदारांकडून टाळाटाळ आणि शेतकºयांची लुबाडणूक होत असल्याने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर कारखानदार, शेतकरी संघटना या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूरबाधित ऊसतोडीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रा. एन. डी. पाटील यांनी पूरबाधित ऊस प्राधान्याने तोडावा, असे ठरलेले असतानाही वारंवार यावर बैठका घेऊन सूचना का द्याव्या लागतात, अशी विचारणा करून कारखानदारांनी शेतकºयांकडे पाहावे, आपली जबाबदारी झटकू नये. शेतकरी टिकला तरच कारखाने टिकणार आहेत; त्यामुळे ही नैतिक जबाबदारी समजून ऊस तोडून शेतक-याला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाधिकारी देसाई यांनी अजूनही १० हजार हेक्टरवरील ऊस तुटण्याचा शिल्लक राहिला असल्याने तो प्राधान्याने तोडावा, असे सांगताना ७० : ३० हा रेशोही स्वीकारायला हरकत नाही, असे सुचविले. विशेषत: जिल्ह्यात आंतरराज्य करार असलेले कारखाने जास्त असल्याने त्यांनीही परराज्यांतून ऊस आणताना पूरबाधित ऊसच प्राधान्याने उचलावा, असे सांगितले. पूरबाधित ऊस तोडण्यासाठी टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने सहकारातील निबंधकांची यंत्रणा आठ दिवसांपुरती कामाला लावावी, असे प्रभारी साखर सहसंचालक अरुण काकडे यांना सांगितले. काकडे यांनी जातीने यात लक्ष घालावे, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

या चर्चेत इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, आर. के. पाटील, बाबासाहेब देवकर, सागर पाटील, आनंदा कदम, शिवाजीराव माने, मारुती पाटील, शेतकरी संघटनेचे आदिनाथ हिंगमिरे, रामचंद्र फुलारी, जनार्दन पाटील, अजित पवार यांनी सहभाग घेतला.

  • अजून १० हजार हेक्टर क्षेत्र तोडीच्या प्रतीक्षेत

प्रभारी प्रादेशिक साखर सहसंचालक अरुण काकडे यांनी जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवरील ऊस पूरबाधित झाला होता, त्यापैकी आतापर्यंत १६ हजार हेक्टरवरील ऊस तुटला असून, नऊ ते १० हजार हेक्टर इतकेच क्षेत्र तुटण्याचे राहिले असल्याचे निदर्शनास आणून दिले.कृषी अधिकाºयांमार्फत पूरबाधित ऊसक्षेत्राची यादीपूरबाधित गावातील पूरबुडीत ऊस उत्पादक शेतकºयांची कृषी अधिकाºयांकडून यादी तयार करून घ्या, त्यांचा ऊस तुटला आहे की नाही याबाबतची खात्री करून घ्या. त्याप्रमाणे तोडणी पत्रक करून ऊस गाळपासाठी पाठविण्यासाठी साखर कारखाना प्रशासनाला सूचित करा, असेही आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने