शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

पूरबाधित ऊस येत्या आठ दिवसांत युद्धपातळीवर तोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 15:12 IST

पूरबाधित ऊस तोडण्यासाठी कारखानदारांकडून टाळाटाळ आणि शेतकºयांची लुबाडणूक होत असल्याने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर कारखानदार, शेतकरी संघटना या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूरबाधित ऊसतोडीचा सविस्तर आढावा घेण्यात आला

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांचे कारखान्यांना आदेश: कारखानानिहाय नियंत्रणासाठी सहनिबंधकांची नेमणूक

कोल्हापूर : पूरबाधित ऊस कोणत्याही परिस्थितीत या आठवडाभरात तोडा, परराज्यांतून येणारा ऊसही पूरबुडीतच घ्या, त्यासाठीची यंत्रणा युद्धपातळीवर राबवा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी साखर कारखानदारांना दिले. यावर नियंत्रणासाठी कारखानानिहाय सहनिबंधकांची नेमणूक करावी, अशा सूचना प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिल्या. हा ऊस तोडावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी हे तिस-यांदा आदेश काढले आहेत. तरीही मुर्दाड कारखानदार त्याला दाद देत नाहीत असे चित्र दिसत आहे.

पूरबाधित ऊस तोडण्यासाठी कारखानदारांकडून टाळाटाळ आणि शेतकºयांची लुबाडणूक होत असल्याने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर कारखानदार, शेतकरी संघटना या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूरबाधित ऊसतोडीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रा. एन. डी. पाटील यांनी पूरबाधित ऊस प्राधान्याने तोडावा, असे ठरलेले असतानाही वारंवार यावर बैठका घेऊन सूचना का द्याव्या लागतात, अशी विचारणा करून कारखानदारांनी शेतकºयांकडे पाहावे, आपली जबाबदारी झटकू नये. शेतकरी टिकला तरच कारखाने टिकणार आहेत; त्यामुळे ही नैतिक जबाबदारी समजून ऊस तोडून शेतक-याला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाधिकारी देसाई यांनी अजूनही १० हजार हेक्टरवरील ऊस तुटण्याचा शिल्लक राहिला असल्याने तो प्राधान्याने तोडावा, असे सांगताना ७० : ३० हा रेशोही स्वीकारायला हरकत नाही, असे सुचविले. विशेषत: जिल्ह्यात आंतरराज्य करार असलेले कारखाने जास्त असल्याने त्यांनीही परराज्यांतून ऊस आणताना पूरबाधित ऊसच प्राधान्याने उचलावा, असे सांगितले. पूरबाधित ऊस तोडण्यासाठी टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने सहकारातील निबंधकांची यंत्रणा आठ दिवसांपुरती कामाला लावावी, असे प्रभारी साखर सहसंचालक अरुण काकडे यांना सांगितले. काकडे यांनी जातीने यात लक्ष घालावे, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

या चर्चेत इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, आर. के. पाटील, बाबासाहेब देवकर, सागर पाटील, आनंदा कदम, शिवाजीराव माने, मारुती पाटील, शेतकरी संघटनेचे आदिनाथ हिंगमिरे, रामचंद्र फुलारी, जनार्दन पाटील, अजित पवार यांनी सहभाग घेतला.

  • अजून १० हजार हेक्टर क्षेत्र तोडीच्या प्रतीक्षेत

प्रभारी प्रादेशिक साखर सहसंचालक अरुण काकडे यांनी जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवरील ऊस पूरबाधित झाला होता, त्यापैकी आतापर्यंत १६ हजार हेक्टरवरील ऊस तुटला असून, नऊ ते १० हजार हेक्टर इतकेच क्षेत्र तुटण्याचे राहिले असल्याचे निदर्शनास आणून दिले.कृषी अधिकाºयांमार्फत पूरबाधित ऊसक्षेत्राची यादीपूरबाधित गावातील पूरबुडीत ऊस उत्पादक शेतकºयांची कृषी अधिकाºयांकडून यादी तयार करून घ्या, त्यांचा ऊस तुटला आहे की नाही याबाबतची खात्री करून घ्या. त्याप्रमाणे तोडणी पत्रक करून ऊस गाळपासाठी पाठविण्यासाठी साखर कारखाना प्रशासनाला सूचित करा, असेही आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने