शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पूरबाधित ऊस येत्या आठ दिवसांत युद्धपातळीवर तोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 15:12 IST

पूरबाधित ऊस तोडण्यासाठी कारखानदारांकडून टाळाटाळ आणि शेतकºयांची लुबाडणूक होत असल्याने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर कारखानदार, शेतकरी संघटना या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूरबाधित ऊसतोडीचा सविस्तर आढावा घेण्यात आला

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांचे कारखान्यांना आदेश: कारखानानिहाय नियंत्रणासाठी सहनिबंधकांची नेमणूक

कोल्हापूर : पूरबाधित ऊस कोणत्याही परिस्थितीत या आठवडाभरात तोडा, परराज्यांतून येणारा ऊसही पूरबुडीतच घ्या, त्यासाठीची यंत्रणा युद्धपातळीवर राबवा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी साखर कारखानदारांना दिले. यावर नियंत्रणासाठी कारखानानिहाय सहनिबंधकांची नेमणूक करावी, अशा सूचना प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिल्या. हा ऊस तोडावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी हे तिस-यांदा आदेश काढले आहेत. तरीही मुर्दाड कारखानदार त्याला दाद देत नाहीत असे चित्र दिसत आहे.

पूरबाधित ऊस तोडण्यासाठी कारखानदारांकडून टाळाटाळ आणि शेतकºयांची लुबाडणूक होत असल्याने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर कारखानदार, शेतकरी संघटना या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूरबाधित ऊसतोडीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रा. एन. डी. पाटील यांनी पूरबाधित ऊस प्राधान्याने तोडावा, असे ठरलेले असतानाही वारंवार यावर बैठका घेऊन सूचना का द्याव्या लागतात, अशी विचारणा करून कारखानदारांनी शेतकºयांकडे पाहावे, आपली जबाबदारी झटकू नये. शेतकरी टिकला तरच कारखाने टिकणार आहेत; त्यामुळे ही नैतिक जबाबदारी समजून ऊस तोडून शेतक-याला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाधिकारी देसाई यांनी अजूनही १० हजार हेक्टरवरील ऊस तुटण्याचा शिल्लक राहिला असल्याने तो प्राधान्याने तोडावा, असे सांगताना ७० : ३० हा रेशोही स्वीकारायला हरकत नाही, असे सुचविले. विशेषत: जिल्ह्यात आंतरराज्य करार असलेले कारखाने जास्त असल्याने त्यांनीही परराज्यांतून ऊस आणताना पूरबाधित ऊसच प्राधान्याने उचलावा, असे सांगितले. पूरबाधित ऊस तोडण्यासाठी टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने सहकारातील निबंधकांची यंत्रणा आठ दिवसांपुरती कामाला लावावी, असे प्रभारी साखर सहसंचालक अरुण काकडे यांना सांगितले. काकडे यांनी जातीने यात लक्ष घालावे, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

या चर्चेत इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, आर. के. पाटील, बाबासाहेब देवकर, सागर पाटील, आनंदा कदम, शिवाजीराव माने, मारुती पाटील, शेतकरी संघटनेचे आदिनाथ हिंगमिरे, रामचंद्र फुलारी, जनार्दन पाटील, अजित पवार यांनी सहभाग घेतला.

  • अजून १० हजार हेक्टर क्षेत्र तोडीच्या प्रतीक्षेत

प्रभारी प्रादेशिक साखर सहसंचालक अरुण काकडे यांनी जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवरील ऊस पूरबाधित झाला होता, त्यापैकी आतापर्यंत १६ हजार हेक्टरवरील ऊस तुटला असून, नऊ ते १० हजार हेक्टर इतकेच क्षेत्र तुटण्याचे राहिले असल्याचे निदर्शनास आणून दिले.कृषी अधिकाºयांमार्फत पूरबाधित ऊसक्षेत्राची यादीपूरबाधित गावातील पूरबुडीत ऊस उत्पादक शेतकºयांची कृषी अधिकाºयांकडून यादी तयार करून घ्या, त्यांचा ऊस तुटला आहे की नाही याबाबतची खात्री करून घ्या. त्याप्रमाणे तोडणी पत्रक करून ऊस गाळपासाठी पाठविण्यासाठी साखर कारखाना प्रशासनाला सूचित करा, असेही आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने