शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही राज्यांमध्ये समन्वय असेल तरच महापूर रोखणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 18:54 IST

वडनेरे म्हणाले, महापूर रोखण्यासाठी जलाशय परिचालन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. धरणांचा वापर पाणी साठविण्यासाठीच केला जातो. हे त्याचे महत्त्वाचे काम आहेच, परंतु त्यांचा उपयोग पूर विरोधक म्हणूनही कसा करून घेता येईल, असा विचार केला आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील धरणांमध्ये पूर सामावून घेण्याची क्षमता निर्माण केलेली नाही.

ठळक मुद्देवडनेरे समितीचे म्हणणे रियल टाईम फ्लड फोरकास्ंिटग यंत्रणा विकसित करण्याची गरज

विश्वास पाटील ।कोल्हापूर : कृष्णा नदीतील पाणीवाटपामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशने जरूर वाद घालावा; परंतु महापुरामध्ये राष्ट्रीय आपत्ती म्हणून सामोरे गेलो तरच महापुराच्या संकटाची तीव्रता आपल्याला कमी करता येईल. त्यासाठी ‘रिअल टाईम फ्लड फोरकास्ंिटग’ यंत्रणा विकसित करावी, असे भीमा-कृष्णा खोरे महापूर अभ्यास समितीने सुचविले आहे. समितीचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.

जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी केलेल्या सर्व सूचनांची दखल या अहवालात घेतली आहे. त्यांनी समितीतून बाहेर पडून अहवाल आधीच फोडला हे चुकीचेच आहे; परंतु मला त्याबद्दल काहीच म्हणायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वडनेरे म्हणाले, तिन्ही राज्यांनी पाण्यावरील आपापले हक्क जरूर सांगावेत, पाणी वापरासाठी जरूर भांडा; परंतु तिथे विध्वसंक पूर येतो तेव्हा ती राष्ट्रीय आपत्ती म्हणून आपण सामोरे गेले पाहिजे आणि त्यासाठी आपल्याकडे एकच यंत्रणा असली पाहिजे आणि ती रिअल टाईम फ्लड फोरकास्टिंग यंत्रणा होय. हे धोरण तिन्ही राज्यांनी मान्य केले आहे. महाराष्ट्राच्यावतीने त्यासंबंधीच्या लवादामध्ये हा मुद्दा मांडला आणि तो जलविवाद कायद्यान्वये (वॉटर डिस्प्युट अ‍ॅक्ट) मंजूर केला आहे. त्यानुसार यापुढे कार्यवाही होईल.

वडनेरे म्हणाले, महापूर रोखण्यासाठी जलाशय परिचालन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. धरणांचा वापर पाणी साठविण्यासाठीच केला जातो. हे त्याचे महत्त्वाचे काम आहेच, परंतु त्यांचा उपयोग पूर विरोधक म्हणूनही कसा करून घेता येईल, असा विचार केला आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील धरणांमध्ये पूर सामावून घेण्याची क्षमता निर्माण केलेली नाही. कारण ते केले असते तर धरणाची उंची वाढते व त्याचा खर्चही वाढतो. जी आपल्याला उत्तर प्रदेशात पाहायला मिळते.

पावसाळा सुरू होताना धरणांत किती पाणी ठेवायचे याच्या अचूक नियोजनावर भर दिला जाणार आहे. कोणत्या महिन्यांत धरणांत किती पाणी ठेवायचे असे मागील वर्षाच्या पुरावर आधारित केलेले नियोजन अंदाज चुकवू शकते. आपण धरणांतील पाणी सोडून दिले आणि पूर आलाच नाही तर टांगती तलवार राहते. पाणी साठवून ठेवले आणि जास्त पाऊस होऊन पूर आला तर धरणे महापूर आणण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून या सर्वांवरील उत्तर म्हणून आपल्याला पूर कधी येणार याचे अंदाज त्या-त्या वेळीच मिळतील, अशी व्यवस्था उभी करा. किती पाण्याचा लोंढा केव्हा येतो हे आताच समजले पाहिजे. त्यासाठी ‘रिअल टाईम डिजिटल फ्लड फोरकास्टिंग’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. स्वयंचलित रेनगेज स्टेशन आपण धरणाच्या सर्व क्षेत्रांवर लावली आहेत. त्याचे खालच्या बाजूला मीटरिंग केले आहे. त्या दोघांची कनेक्टिव्हिटी करून सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

सॅटेलाईटचे मेसेजेस वापरून धरणांत किती पाणी आहे व पाण्याची लाट कुठपर्यंत कशी येत आहे हे समजले पाहिजे. ठरावीक कॅचमेंट एरियामधील पाण्याचा अंदाज बांधता येतो. त्यातून कोयनेमध्ये इतका पाऊस पडला तर त्याची एवढी लाट तयार होऊन इतक्या क्षेत्रात पाणी येईल हे समजू शकते. अशी मॉडेल्स कोल्हापूर आणि सांगलीतील प्रत्येक धरणामध्ये करण्यात येणार आहेत; परंतु सध्या त्यांचे काम प्राथमिक स्तरांवर आहे. मोठा पूर आला की वापरलेली साधने वाहून जातात. त्यामुळे डेटा मिळत नाही. त्यामुळे हीच यंत्रणा जास्त कशी सक्षम करता येईल यावर भर दिला आहे.

पूर संस्कृती..पुराचीही एक संस्कृती असते. पूर्वीच्या काळी पूर आला की लोक डोक्यावर साहित्य घेऊन चालू लागायचे. मागे काही त्यांचे उरायचे नाही. परत येऊन परत वस्ती करायचे. तसे आज होत नाही; कारण घर सोडण्याची मानसिकता नसते. गेल्या वर्षी अनेक गावांत हे चित्र दिसले.

रेल्वेगाडी आणि पूरआपण रेल्वेस्थानकावर थांबलेलो असतो आणि रेल्वे सुरुवातीला १५ मिनिटे उशिरा धावणार आहे असे सांगितले जाते. त्यानंतर पुन्हा ती तासभर उशिरा धावणार आहे असे सांगितले जाते, असेच काहीसे धरणांतील पाणी सोडण्याबाबत घडते. परंतु तसे घडू नये यासाठीच अचूक नियोजन आवश्यक आहे

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरSangliसांगली