शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

कोल्हापूर शहरातील पूररेषा तत्काळ जाहीर करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 2:46 PM

कोल्हापूर : राज्य सरकार तसेच महानगरपालिका प्रशासनाने ३० सप्टेंबरपूर्वी शहराची पूररेषा जाहीर करावी, अन्यथा मानवी जीवनाच्या रक्षणासाठी आम्हाला जनआंदोलन ...

ठळक मुद्देकोल्हापूर शहरातील पूररेषा तत्काळ जाहीर करावी

कोल्हापूर : राज्य सरकार तसेच महानगरपालिका प्रशासनाने ३० सप्टेंबरपूर्वी शहराची पूररेषा जाहीर करावी, अन्यथा मानवी जीवनाच्या रक्षणासाठी आम्हाला जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यात आले, तसेच पूररेषेविषयी त्यांच्याशी चर्चा केली.सन २००५ पासून २०१४ पर्यंत पूररेषासंबंधी राज्य सरकारने महानगरपालिकेला पाठविलेली पत्रे जनतेच्या माहितीसाठी जाहीर करावीत, प्रतिबंधित क्षेत्रात भरावे टाकून बांधकाम परवाने ज्यांनी दिले, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच गेल्या १0 वर्षांत ठरावीक अभियंते, अधिकारी गब्बर झाले. त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशा मागण्याही कृती समितीच्या सदस्यांनी केल्या.नदीच्या प्रवाहात बांधकाम परवाने देण्याच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शहरात महापुराचे पाणी शिरले आहे. निळ्या रेषेच्या आत बांधकामे करता येत नाहीत, तरीही अशा प्रतिबंधित क्षेत्रात काही अटींवर परवाने दिले; त्यामुळे यापुढे शहरातील स्वच्छता करताना प्रशासनातील अधिकाऱ्यांचीही स्वच्छता करावी, अशी सूचना अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी केली.नदी परिसरातील काळ्या मातीत पुराचे पाणी शिरले असल्यामुळे तेथील इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्याची आवश्यकता आहे, याकडेही इंदुलकर यांनी लक्ष वेधले. जानेवारी २०१८ पासून ज्यांनी परवाने दिले, अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.विकास आराखड्यात दाखविण्यात आलेल्या ओढे, नाले हटवून बांधकाम परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. नाले बंद करणे, ग्रीनझोनमध्ये बांधकामे करणे याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माजी नगरसेवक दिलीप शेटे यांनी केली. दिलीप पवार यांनी आधी तातडीने बांधकामे थांबवा आणि नंतर दोषींवर कारवाई करा, असे सांगितले. यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, लालासाहेब गायकवाड, विजय साळोखे यांनीही सूचना केल्या, तर संभाजीराव जगदाळे, नितीन जाधव, भाऊ घोडके, किरण पडवळ, विनोद डुणुंंग, श्रीकांत भोसले उपस्थित होते.शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पूररेषा निश्चित होईपर्यंत नवीन तसेच यापूर्वी परवानगी देण्यात आलेली बांधकामे थांबविण्याचे आदेश आपण नगररचना विभागाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरMuncipal Corporationनगर पालिका