शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मानवतेचा पूर यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:00 IST

इंद्रजित देशमुख महाराष्ट्रातील एका मोठ्या प्रांतात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पावसानं आणि महापुरानं अगदी थैमान घातलं आहे. डोळ्यादेखत बुडणारे संसार ...

इंद्रजित देशमुखमहाराष्ट्रातील एका मोठ्या प्रांतात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पावसानं आणि महापुरानं अगदी थैमान घातलं आहे. डोळ्यादेखत बुडणारे संसार आणि उद्ध्वस्त होणारी स्वप्नं बघून जीव अक्षरश: कातरला जातोय. या कातरण्यातच अनंत काहुरांची कधीच न संपणारी मालिका मनात विचारांचा डोंगर उभा करून जाते. पाऊस भयानक, पावसामुळे जीवनदायिनी असलेल्या नद्यांची दिसणारी रूपेही भयानक आणि या भयानक रूपातून निर्माण झालेला महापूरही भयानक आणि त्या भयानकतेमुळे जीवनात आलेलं केविलवाणेपण तर त्याहूनही भयानक, अशी आमची अवस्था झाली आहे. वास्तविक पाणी म्हणजे जीवन असतं ते आम्हाला जगवत असतं. पण आज हेच जगवणारं पाणी कितीतरी जणांचा जीवन संपवू पाहतंय. याचंच खूप वाईट वाटत आहे आणि मन खूप विषण्ण होत आहे. याच विषण्णतेत भर घालण्यासाठी म्हणून की काय कुठे कुठे महापुराच्या पाण्याबरोबर व्यापक न झालेली संकुचित मनंही पाहायला मिळत आहेत.वास्तविक जगातलं कुठलंही संकट इतकं गंभीर कधीच असू शकत नाही की जे आमचा धीर संपवेल; पण हा महापूर बघून आता मन खरोखरच घाबरायला लागलंय. भोवताली भग्न अवस्थेतील बांधकाम आणि विस्कटलेले संसार यामुळे होत्याचं न्हवतं झालेली कितीतरी चिन्हे आम्हाला बघायला मिळत आहेत. आणि आता सगळंच गेलं. त्यामुळे जीवनातील नाउमेद वाढवणारी मनोवृत्ती तयार होत आहे, हे असं असलं तरी एखाद्या वावटळात दिवा लागावा त्याप्रमाणे आपलं स्वत:च तन-मन-धन अर्पण करून माणुसकीच्या महापुराचं दर्शन घडवणारं कुणी उभं राहतंय का आणि स्वत:सोबत इतरांनापूर काय येईल जाईलम्हणून का गळायचं।झटत झगडत जगूनाही गा पळायचं।परत उभं करू सारंमागं नाही वळायचं।धिटाई मनात धरूनाही चिंतेत जळायचं।हिंमतीनं ताकदीनं फुलवूसंसार आणि बांधू नवं घर।।जाईल महापूर दादा, जाईल महापूर।जाईल महापूर दादा, नको सोडू धीर।।...असा धीर देत काही गोष्टीची मनं आतुरतेने वाट पाहत असत. तेवढ्यात आपल्या जवळचे दीदी आणि दादा पूर आणि पाण्यात उभं राहून इतरांचे संसार उभे करण्यासाठी धडपडत असल्याचं कळलं की डोळे आपोआप भरून येतात आणि जीवनाबद्दलचा सकारात्मक भाव वाढीस लागतो. संपत्तीसंचयाच्या पलीकडे सुद्धा एक देखणं विश्व आहे आणि तेच विश्व या जगातील अंतिम सत्य आहे, याची आपोआप प्रचिती या लोकांचं काम बघून जाणवते.जीवनात संकटं तर येतच असतात, पण अशा संकटातसुद्धा एखादी संधी लपलेली असते आणि त्या संधीला शोधून तिचं सौंदर्यात परिवर्तन करायचं असतं; हे आम्हाला अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळीच कळतं म्हणूनच परत परत अशा आपत्तीग्रस्तांना मदत करू वाटते. मग ती कोणत्याही प्रकारे असुदे. त्यांना आपल्याकडून देता आलं तर धन द्यावं नाही जमलं तर मन द्यावं आणि तेही नाही जमलं तर निदान तन तरी द्यावं. धनाच्या बाबतीत कुणी चलन द्यावं म्हणजे आपत्तीग्रस्तांना सुसह्य स्थितीत जगता येईल. ज्यांना चलन जमणार नाही त्यांनी या आपत्तीग्रस्तांची मनोभावे सेवा करावी आणि ज्यांना सेवाही जमत नाही त्यांनी निदान माझ्या एका कवी मित्रानं म्हटल्याप्रमाणेआलेल्या या संकटात एकेजागी ºहाऊ।मिळालेला घास, तुकडा सांभाळून खाऊ।बुडवणारा पूर सगळे एकोप्याने पोहू।धिटाईने महापुरा ओसराया लावू।संकटात परसंगाला, तुला मी आधार आणिमला तू आधार।जाईल महापूर दादा, जाईल महापूर।।असा निदान शब्दाचा आधार तरी द्यावा आणि तो मनापासून द्यावा. ही सगळी मदतीचीच रूपे आहेत. आपण ती अवलंबली तर आपल्यालाही समाधान लाभतं. कधीतरी आमच्या मनाला प्रश्न पडतो की हे आम्ही का करायचं तर त्याचं उत्तर एकच आहे की तर ते मानव्याच्या जोपासनेसाठी करायचं. एक तेजस्वी दिवा आपल्यासारखे हजारो दिवे प्रज्वलित करू शकतो आणि जगातील अंधार कमी होऊ शकतो; त्याचप्रमाणे माणसाला माणूस जोडत राहून अवघ्यांच्या जीवनातील अपूर्णांचा अंध:कार कमी करण्यासाठी हे करायचं. वास्तविक नदी गावात येत असताना गटारीचं आणि ओढ्याचं पाणी ज्या सहजतेने आपल्या प्रवाहात स्वीकारते; त्याच भावाने मंदिरातील मोरीतून येणारं तीर्थसुद्धा ती स्वीकारते. आमच्या जगण्यातसुद्धा ही सहजता यावी. आम्ही अशा या आपत्तीग्रस्तांसाठी खूप खूप मदत करावी आणि आमच्या प्रत्येकाच्या अंत:करणात मानवतेचा महापूर यावा आणि तो कधीही न ओसरणारा असावा, एवढीच अपेक्षा.(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक वपरिवर्तनशील वक्ते आहेत)