शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

मानवतेचा पूर यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:00 IST

इंद्रजित देशमुख महाराष्ट्रातील एका मोठ्या प्रांतात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पावसानं आणि महापुरानं अगदी थैमान घातलं आहे. डोळ्यादेखत बुडणारे संसार ...

इंद्रजित देशमुखमहाराष्ट्रातील एका मोठ्या प्रांतात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पावसानं आणि महापुरानं अगदी थैमान घातलं आहे. डोळ्यादेखत बुडणारे संसार आणि उद्ध्वस्त होणारी स्वप्नं बघून जीव अक्षरश: कातरला जातोय. या कातरण्यातच अनंत काहुरांची कधीच न संपणारी मालिका मनात विचारांचा डोंगर उभा करून जाते. पाऊस भयानक, पावसामुळे जीवनदायिनी असलेल्या नद्यांची दिसणारी रूपेही भयानक आणि या भयानक रूपातून निर्माण झालेला महापूरही भयानक आणि त्या भयानकतेमुळे जीवनात आलेलं केविलवाणेपण तर त्याहूनही भयानक, अशी आमची अवस्था झाली आहे. वास्तविक पाणी म्हणजे जीवन असतं ते आम्हाला जगवत असतं. पण आज हेच जगवणारं पाणी कितीतरी जणांचा जीवन संपवू पाहतंय. याचंच खूप वाईट वाटत आहे आणि मन खूप विषण्ण होत आहे. याच विषण्णतेत भर घालण्यासाठी म्हणून की काय कुठे कुठे महापुराच्या पाण्याबरोबर व्यापक न झालेली संकुचित मनंही पाहायला मिळत आहेत.वास्तविक जगातलं कुठलंही संकट इतकं गंभीर कधीच असू शकत नाही की जे आमचा धीर संपवेल; पण हा महापूर बघून आता मन खरोखरच घाबरायला लागलंय. भोवताली भग्न अवस्थेतील बांधकाम आणि विस्कटलेले संसार यामुळे होत्याचं न्हवतं झालेली कितीतरी चिन्हे आम्हाला बघायला मिळत आहेत. आणि आता सगळंच गेलं. त्यामुळे जीवनातील नाउमेद वाढवणारी मनोवृत्ती तयार होत आहे, हे असं असलं तरी एखाद्या वावटळात दिवा लागावा त्याप्रमाणे आपलं स्वत:च तन-मन-धन अर्पण करून माणुसकीच्या महापुराचं दर्शन घडवणारं कुणी उभं राहतंय का आणि स्वत:सोबत इतरांनापूर काय येईल जाईलम्हणून का गळायचं।झटत झगडत जगूनाही गा पळायचं।परत उभं करू सारंमागं नाही वळायचं।धिटाई मनात धरूनाही चिंतेत जळायचं।हिंमतीनं ताकदीनं फुलवूसंसार आणि बांधू नवं घर।।जाईल महापूर दादा, जाईल महापूर।जाईल महापूर दादा, नको सोडू धीर।।...असा धीर देत काही गोष्टीची मनं आतुरतेने वाट पाहत असत. तेवढ्यात आपल्या जवळचे दीदी आणि दादा पूर आणि पाण्यात उभं राहून इतरांचे संसार उभे करण्यासाठी धडपडत असल्याचं कळलं की डोळे आपोआप भरून येतात आणि जीवनाबद्दलचा सकारात्मक भाव वाढीस लागतो. संपत्तीसंचयाच्या पलीकडे सुद्धा एक देखणं विश्व आहे आणि तेच विश्व या जगातील अंतिम सत्य आहे, याची आपोआप प्रचिती या लोकांचं काम बघून जाणवते.जीवनात संकटं तर येतच असतात, पण अशा संकटातसुद्धा एखादी संधी लपलेली असते आणि त्या संधीला शोधून तिचं सौंदर्यात परिवर्तन करायचं असतं; हे आम्हाला अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळीच कळतं म्हणूनच परत परत अशा आपत्तीग्रस्तांना मदत करू वाटते. मग ती कोणत्याही प्रकारे असुदे. त्यांना आपल्याकडून देता आलं तर धन द्यावं नाही जमलं तर मन द्यावं आणि तेही नाही जमलं तर निदान तन तरी द्यावं. धनाच्या बाबतीत कुणी चलन द्यावं म्हणजे आपत्तीग्रस्तांना सुसह्य स्थितीत जगता येईल. ज्यांना चलन जमणार नाही त्यांनी या आपत्तीग्रस्तांची मनोभावे सेवा करावी आणि ज्यांना सेवाही जमत नाही त्यांनी निदान माझ्या एका कवी मित्रानं म्हटल्याप्रमाणेआलेल्या या संकटात एकेजागी ºहाऊ।मिळालेला घास, तुकडा सांभाळून खाऊ।बुडवणारा पूर सगळे एकोप्याने पोहू।धिटाईने महापुरा ओसराया लावू।संकटात परसंगाला, तुला मी आधार आणिमला तू आधार।जाईल महापूर दादा, जाईल महापूर।।असा निदान शब्दाचा आधार तरी द्यावा आणि तो मनापासून द्यावा. ही सगळी मदतीचीच रूपे आहेत. आपण ती अवलंबली तर आपल्यालाही समाधान लाभतं. कधीतरी आमच्या मनाला प्रश्न पडतो की हे आम्ही का करायचं तर त्याचं उत्तर एकच आहे की तर ते मानव्याच्या जोपासनेसाठी करायचं. एक तेजस्वी दिवा आपल्यासारखे हजारो दिवे प्रज्वलित करू शकतो आणि जगातील अंधार कमी होऊ शकतो; त्याचप्रमाणे माणसाला माणूस जोडत राहून अवघ्यांच्या जीवनातील अपूर्णांचा अंध:कार कमी करण्यासाठी हे करायचं. वास्तविक नदी गावात येत असताना गटारीचं आणि ओढ्याचं पाणी ज्या सहजतेने आपल्या प्रवाहात स्वीकारते; त्याच भावाने मंदिरातील मोरीतून येणारं तीर्थसुद्धा ती स्वीकारते. आमच्या जगण्यातसुद्धा ही सहजता यावी. आम्ही अशा या आपत्तीग्रस्तांसाठी खूप खूप मदत करावी आणि आमच्या प्रत्येकाच्या अंत:करणात मानवतेचा महापूर यावा आणि तो कधीही न ओसरणारा असावा, एवढीच अपेक्षा.(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक वपरिवर्तनशील वक्ते आहेत)