शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

Kolhapur Airport: अचानक विमान रद्द, प्रवाशांची गोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:07 IST

एकाच महिन्यात हा प्रकार वारंवार घडल्याने या एअरलाइन्सची सेवाच बंद करण्याची मागणी होऊ लागली

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावरून देशभरातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये जाण्याचा पर्याय उपलब्ध असताना आता कोल्हापूर विमानतळावरील एका कंपनीची विमानसेवा अचानक वारंवार रद्द केली जात असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे विमान टेकऑफ करण्याच्या आधी दोन तास प्रवाशांना रद्दचा संदेश येत असल्याने प्रवाशांसह ट्रॅव्हल कंपन्यांची झोप उडाली आहे. एकाच महिन्यात हा प्रकार वारंवार घडल्याने या एअरलाइन्सची सेवाच बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-तिरुपती व कोल्हापूर-बंगळुरू या मार्गावर एका कंपनीकडून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला ही सेवा नियमितपणे सुरू असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या कंपनीने कोल्हापूर-तिरुपती, कोल्हापूर-मुंबई, बंगळुरू या मार्गावरील विमाने अचानक रद्द केल्याने प्रवाशांची चांगलीच गोची झाली.कोणत्याही वेळेस कुठलीही कल्पना न देता विमान रद्द केले जात आहे. केवळ एका एसएमएसद्वारे प्रवाशांना दोन तास आधी याची कल्पना देऊन संबंधित कंपनी आपल्या अनागोंदी कारभाराचे वारंवार दर्शन घडवीत आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.ट्रॅव्हल कंपन्यांना त्रासकोल्हापुरातील ट्रॅव्हल कंपन्यांमार्फत अनेक नागरिक पर्यटनासाठी जगभर जातात. दोन दिवसांपूर्वी एका ट्रॅव्हल कंपनीने तिरुपतीसाठी २१ प्रवाशांचे तिकीट काढले होते. मात्र, या मार्गावरील विमान अचानक रद्द करण्यात आल्याने ट्रॅव्हल कंपनीची झोप उडाली. कोल्हापूर-मुंबई ही सेवा एखाद्या चांगल्या एअरलाइन्सला द्यावी, अशी मागणी कोल्हापूर ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळairplaneविमान