शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
2
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
3
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
4
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
5
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
6
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
7
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
8
"मी तशी नाही…" वादग्रस्त प्रकरणावर व्यक्त होताना बांगलादेशी कर्णधाराने घेतलं हरमनप्रीतचं नाव
9
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
10
Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
11
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
12
Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
13
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
14
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
15
‘साधी एक चिपही बनवता येत नाही, अमेरिकन नागरिक काय कामाचे?’, डोनाल्ड ट्रम्प संतापले, ‘या’ देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला 
16
अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!
17
आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
18
Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
19
भारताचा मध्यमवर्ग संकटाच्या उंबरठ्यावर; २ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका
20
त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 
Daily Top 2Weekly Top 5

फिटस् -बालस्वास्थ

By admin | Updated: March 7, 2017 21:47 IST

संभाव्य समस्यांबाबत नियमितपणे पालकांचे प्रबोधन झाल्यास आजाराबाबतच शारीरिक व मानसिक भीती नक्कीच कमी करता येईल.

अलेक्झांडर दि ग्रेट, आगाथा ख्रिस्ती, सॉक्रेटिस, चार्लस डिफेन्स, सर आयझॅक न्यूटन या सर्व सुपरिचित व्यक्ती असून, त्यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे. या सर्व व्यक्ती इपिलेप्सी अथवा फिटस्च्या आजाराने ग्रस्त होत्या. सर्वसाधारणपणे हजार लोकसंख्येमधील ५ ते ६ जणांमध्ये हा आजार आढळतो. सहसा अशा आजाराची सुरुवात लहानपणीच होत असल्याने हा आजार नेमका कसा आहे आणि यात पालकांची भूमिका कोणती, याचा आपण आज विचार करुया.मागील लेखामध्ये तापामध्ये येणाऱ्या झटक्यांबाबत आपण सविस्तर माहिती घेतली आहेच. क्वचितप्रसंगी मेंदूमधील जन्मजात व्यंग, मेंदूला दुखापत, गाठ, रक्तस्राव, जंतूसंसर्ग अशा कारणाने येणाऱ्या फिटस् आपल्याला माहीत असतात. तथापि, सकृतदर्शनी मेंदूचा कोणताही आजार नसताना अथवा कोणत्याही समजून येणाऱ्या ठळक कारणांशिवाय येणाऱ्या झटक्यांना फिटस्चा आजार किंवा इपिलेप्सी असे म्हणतात. घरातील इतर व्यक्तींना फिटस्चा आजार असल्यास मुलाला आजार होण्याची शक्यता जास्त असली तरी हा आजार अनुवंशिक अथवा संसर्गजन्य नव्हे. मेंदूच्या प्रत्येक पेशीमध्ये निर्माण होणारा विद्युतभार सुनियोजित पद्धतीने शरीरामधील सर्व पेशींपर्यंत पोहोचून मेंदूच्या नियंत्रणाखाली शरीरामधील विविध अवयवांची कामे चालू असतात. क्वचितप्रसंगी अशा पेशींमध्ये विद्युतभाराचे ‘शॉर्टसर्किट’ झाल्यास रुग्णाला फिटस् सुरू होतात. मेंदूच्याबाधित भागानुसार विविध चिन्हे वा लक्षणे दिसून येतात. तथापि, अचानक शुद्ध हरपणे, हातपाय ताठ करणे, हातपाय झाडणे, तोंडातून फेस येणे, डोळे पांढरे करणे, अशा लक्षण समूहास आपण फिटस् म्हणतो. बहुतांशी अशा फिटस् ५-१० मिनिटांमध्ये आपणच थांबून जातात. मूल त्यानंतर काही काळ गुंगीत वा झोपेत असते. फिटस् प्रत्यक्ष पाहताना घाबरून टाकणाऱ्या असल्या तरी त्या क्वचितच जीवघेण्या असतात. झटके येताना तोंडात येणारा फेस श्वासनलिकेमध्ये गेल्यास मूल गुदमरते. तसेच त्या प्रदीर्घकाळ चालू राहिल्यास त्यामुळे मेंदूची हानी होऊ शकते.झटका आल्यास पालकांनी घाबरून जाऊ नये. मुलाला सपाट, कठीण पृष्ठभागावर झोपवून एका कुशीवर वळवावे. झटका काही काळातच थांबल्यावर शांतपणे डॉक्टरांकडे नेऊन हा फिटस्चा आजार आहे किंवा अन्य कोणता याची खात्री करून घ्यावी. या आजारासाठी दीर्घकाळ औषधे घ्यावी लागत असल्याने औषधोपचार सुरू करण्यापूर्वी मेंदूच्या कार्याची माहिती समजण्यासाठी ईईजी ही तपासणी तसेच मेंदूचा स्कॅन केला जातो. निदान पक्के झाल्यावर या मुलांना दीर्घकाळासाठी फिटस्च्या गोळ्या देण्यात येतात. सर्वसाधारणपणे औषधोपचार चालू केल्यानंतर २/३ वर्षे फिटस् न आल्यास औषधे बंद करण्यात येतात. या कालावधीमध्ये औषधे घेण्यात सातत्य ठेवणे आवश्यक असते. गोळ्या १/२ दिवस जरी चुकल्या तरी फिट येऊ शकते. मुलांच्या अन्य तत्कालीन आजारामध्ये औषधाचा डोस वाढवावा लागतो. काही मुलांमध्ये काविळीसारखे औषधाचे दुष्परिणाम दिसू शकतात. त्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक असते. अशा मुलांनी आजार आटोक्यात येईपर्यंत पोहणे, वाहन चालविणे, झाडावर चढणे, अशा गोष्टी टाळणे हितकारक असते. दीर्घकाळ औषध चालू असल्याने या मुलांमध्ये आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, याची सातत्याने जाणीव होऊन त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. फिटस्च्या आजाराबाबत अद्यापही समाजामध्ये अनेक समज, गैरसमज प्रचलित असल्याने या रुग्णांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यामुळे हा आजार लपविण्याकडे कल असतो. ग्रामीण भागात वैदू अथवा भोंदूबाबांकडून विविध उपचार करून घेतले जातात. तथापि, बहुतांश रुग्णात हा आजार नियमित औषधाने आटोक्यात ठेवता येतो. या व्यक्ती मोठेपणी असा आजार नसलेल्या व्यक्तीप्रमाणेच मोठ्या होऊ शकतात व नावलौकिक मिळवू शकतात. त्यामुळे या आजाराबाबत पालक व डॉक्टर यांच्यामध्ये वेळोवेळी सुसंवाद होऊन निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्यांबाबत नियमितपणे पालकांचे प्रबोधन झाल्यास आजाराबाबतच शारीरिक व मानसिक भीती नक्कीच कमी करता येईल. -- डॉ. मोहन पाटील.