शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

आंबेडकरांच्या हयातीत उभारलेला देशातील पहिला पुतळा बिंदू चौकात

By admin | Updated: December 5, 2014 23:29 IST

महापरिनिर्वाणदिन विशेष : भाई माधवराव बागल यांचा पुढाकार

संदीप खवळे - कोल्हापूर -दलित, श्रमिक आणि शोषितांच्या न्याय्य हक्कांसाठी हयातभर इथल्या सामाजिक व्यवस्थेविरुद्ध एकाकी लढणारे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन... ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि देशातील करोडो दलितांवर दु:खाचा डोंगर कोसळला. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारादरम्यान प्र. के. अत्रे यांनी त्यांना आदरांजली वाहताना एक वाक्य उच्चारले होते, ‘बाबांचा देह आता जळत आहे; पण त्यांना दलितांच्या हक्कांची लढाई लढताना आयुष्यभर जळावे लागले होते.’ डॉ. बाबासाहेबांच्या या लढाईत कोल्हापूरकरांनी मात्र त्यांना चांगली साथ दिली होती. राजर्षी शाहू महाराजांचे सहकार्य, माणगाव येथील अस्पृश्य परिषद आणि ऐतिहासिक बिंदू चौकात डॉ़ आंबेडकरांचा त्यांच्या हयातीत उभारण्यात आलेला पहिला अर्धाकृती पुतळा, अशी काही उदाहरणे सांगता येतील.कोल्हापुरातील बिंंदू चौक येथे डॉ. बाबासाहेबांचा पुतळा ९ डिसेंबर १९४९ रोजी तत्कालीन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल यांच्या पुढाकाराने उभारण्यात आला होता. डॉ. बाबासाहेबांच्या हयातीत उभारण्यात आलेला हा भारतातील पहिलाच पुतळा आहे. बाळ चव्हाण या शिल्पकाराने बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा तयार केला आहे़ तत्कालीन नगराध्यक्ष द़ मा़ साळोेखे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रतिमा समितीकडून नगरपालिकेस करवीर जनतेच्यावतीने तो प्रदान करण्यात आला़ तेव्हापासून जिल्ह्यातील तमाम आंबेडकरप्रेमींसाठी बिंदू चौक हे आदराचे आणि शक्तीचे ठिकाण ठरले आहे़ बहुजन समाजाच्या चळवळीचे अनेक प्रबोधनपर कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले आहेत़ दरवर्षी जिल्ह्यातील विविध आंबेडकरप्रेमी संघटनांकडून येथे भीमगीते सादर करून महामानवाला वंदना दिली जाते़ यातील अनेक गीते स्थानिक कलाकारांनी तयार केलेली आहेत. डॉ़ आंबेडकरांचा जीवनपट डोळ्यांसमोर उभा करण्याची ताकद या गीतांमध्ये असते़ ऐतिहासिक असा हा बिंदू चौक जिल्ह्यातील तमाम दलित बांधवांसाठी एक ऊर्जेचे आणि पे्ररणेचे केंद्र ठरत आलेला आहे़ मराठवाड्यातील दलित बांधव जेव्हा कोल्हापुरात येतात, तेव्हा ते माणगाव आणि बिंदू चौक येथे आवर्जून भेट देतात अन् कोल्हापूरच्या पुरोगामी दृष्टीला सलाम करून जातात़