शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ठरलेली पहिली उचल देणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:04 AM

सेनापती कापशी : यंदा साखर कारखाने सुरू झाले, त्यावेळी साखरेचे दर ३६०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. त्यानंतर दोन ते अडीच महिन्यांत साखर दरामध्ये ८०० रुपयांची घसरण होऊन ते २८०० रुपयांवर आले. परिणामी कारखानदारांना ठरलेली उचल देणे केवळ अशक्य झाले. पण सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या वतीने या गळीत हंगामातील टनाला ...

सेनापती कापशी : यंदा साखर कारखाने सुरू झाले, त्यावेळी साखरेचे दर ३६०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. त्यानंतर दोन ते अडीच महिन्यांत साखर दरामध्ये ८०० रुपयांची घसरण होऊन ते २८०० रुपयांवर आले. परिणामी कारखानदारांना ठरलेली उचल देणे केवळ अशक्य झाले. पण सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या वतीने या गळीत हंगामातील टनाला ठरलेली तीन हजार रुपयांची पहिली उचल कोणत्याही परिस्थितीत देणारच, असा विश्वास संस्थापक आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) कारखाना कार्यस्थळावर ८ लाख १ हजार १११ साखर पोत्यांच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपतराव फराकटे होते.ते म्हणाले, सद्य:स्थितीत साखर दरात झालेली घसरण, बँकांचे घटलेले मूल्यांकन त्यामुळे कारखान्यांकडे २००० ते २१०० रुपयेच उपलब्ध होतात. यामुळेच २५०० रुपये दर देण्याचा निर्णय कारखानदारांचा झाला. घोरपडे कारखान्याने पूर्वीच्या तीन पंधरवड्यांची बिले टनाला ३००० रुपयांनी काढली आहेत. उर्वरित टनाला ५०० रुपयांचा फरक निश्चितपणे अदा करू. याबाबत ऊस उत्पादकांनी काळजी करू नये.यावेळी भय्या माने यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी स्वागत केले. जनरल मॅनेजर महेश जोशी यांनी प्रास्ताविक केले. संतोष मोरबाळे यांनी आभार मानले. संघाचे अध्यक्ष सूर्याजी घोरपडे, पं. स. सदस्य जे. डी. मुसळे, अंकुश पाटील, प्रवीण भोसले, शिरीष देसाई, जयवंत पाटील-कासारीकर, शामराव पाटील, सतीश पाटील, मनोज फराकटे व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.दोन वर्षांत विस्तारीकरणसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने दोन हंगामात गाळप क्षमता ६ हजारांवरून ८ हजार मे. टन, सहवीज निर्मिती २३ वरून ४५ मेगावॅट व इथेनॉल निर्मिती दररोज ३५ हजारांवरून १ लाख लिटर असे विस्तारीकरण करणार आहे. या संबंधीच्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. त्यापैकी पहिला टप्पा म्हणून येत्या हंगामातच इथेनॉल निर्मिती ३५ हजारांवरून ५० हजार लिटर सुरू करणार आहोत. तरी यासाठी सर्वांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.