जिल्हाध्यक्षांवरच आधी कारवाई करा : क्षीरसागर
By Admin | Updated: May 18, 2014 00:54 IST2014-05-18T00:52:24+5:302014-05-18T00:54:05+5:30
कोल्हापूर : ज्यांच्यावर पक्षसंघटनेची जिल्ह्याची जबाबदारी आहे, त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार न पाडल्याने राधानगरी,

जिल्हाध्यक्षांवरच आधी कारवाई करा : क्षीरसागर
कोल्हापूर : ज्यांच्यावर पक्षसंघटनेची जिल्ह्याची जबाबदारी आहे, त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार न पाडल्याने राधानगरी, करवीर व कोल्हापूर दक्षिणमधील विरोधी उमेदवाराचे मताधिक्य तुटू शकले नाही. त्यामुळे त्यांच्यावरच प्रथम कारवाई करावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष पवार यांनी घरभेद्यांवर कारवाई करा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याबद्दल विचारले असता क्षिरसागर बोलत होते. ते म्हणाले, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले. कोल्हापूर उत्तर व दक्षिणमधील शहरी भागांतून दहा हजारांचे मताधिक्य त्यांना दिले. मात्र, ज्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आहे त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली नाही. क्षीरसागर म्हणाले, ‘शहरप्रमुख या नात्याने कोल्हापूर उत्तर व कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील शहरी भाग असे शिवसेनेच्या उमेदवारास मताधिक्य दिले. जिल्ह्याचे पदाधिकारी सक्षम नाहीत. पक्षबांधणी करण्यापेक्षा कुरघोड्या करण्यात ते धन्यता मानतात. त्यांच्यामुळेच आपण जिल्ह्यात मागे राहिलो. याबाबत आपण यापूर्वीच पक्षश्रेष्ठींना माहिती दिली आहे. अत्यंत तोकड्या साधनसामग्रीवर आपण चार हजारांचे मताधिक्य दिले. विरोधी उमेदवाराकडे आजी-माजी नगरसेवकांची फौज तसेच धनशक्तीचा पूर्णपणे वापर होऊनसुद्धा शहरी भागात मताधिक्य देऊ शकलो, त्याबद्दल सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आपण आभारी आहेत. ज्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आहे, त्यांनी ते न करता शहरात कुरघोड्या करण्यात धन्यता मानली. त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा त्याचा परिणाम येणार्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो असे पक्षश्रेष्ठींना कळविले आहे.’