शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

आगीचे लोट अन् धुराचे साम्राज्य -मोरेवाडीच्या माळावरील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 19:40 IST

मोरेवाडी (ता. करवीर) येथील गायरानामध्ये भारती विद्यापीठाजवळ लागून असलेल्या माळावर उघड्यावरच टाकलेल्या कचºयाला आग लागल्यामुळे सर्वत्र आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरले

ठळक मुद्देउघड्यावर टाकलेल्या कचऱ्याला आग लागल्याने दुर्गंधी

ज्योती पाटील ।पाचगाव : मोरेवाडी (ता. करवीर) येथील गायरानामध्ये भारती विद्यापीठाजवळ लागून असलेल्या माळावर उघड्यावरच टाकलेल्या कचºयाला आग लागल्यामुळे सर्वत्र आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामध्ये असणाºया विविध प्रकारचा कचरा व कातडी जळाल्याचा वास पसरत असल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. कचºयापासून कंपोस्ट खत निर्मितीचा प्रस्ताव अद्यापही धूळ खात पडल्याने कचºयाची विल्हेवाट लागणार की नाही, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक व वाहनधारकांतून विचारला जात आहे.

चित्रनगरी परिसर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी, अष्टविनायक पार्क, के.एम.टी. कॉलनी, धन्वंतरी कॉलनी या परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरत असून, येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीने गोळा केलेला कचरा पसरत असल्याने कचरा जाळून टाकण्याचा खटाटोप ग्रामपंचायतीमार्फत केले जातात. परंतु, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर भीषण परिणाम होताना पाहावयास मिळत आहेत.

या कचºयातील कुजलेले अन्न, ओला कचरा,प्लास्टिक कचरा तसेच धन्वंतरी कॉलनीमध्ये असलेल्या चपलच्या कारखान्यातील कातड्याचे तुकडेदेखील या कचºयाच्या ढिगात टाकले जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरतेच; परंतु याचा लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात. या परिसरात असणाºया नामांकित भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे शिक्षणासाठी बाहेरून आलेले विद्यार्थी विद्यापीठाच्या आसपास असणाºया वसतिगृहाचा आसरा घेतात; परंतु वसतिगृहावर दिवस-रात्र धुराचे लोट येत असल्याने त्यांना राहणे मुश्कील झालेआहे.

जवळजवळ तीन-चार टन गोळा केलेला कचरा दररोज या ठिकाणी आणून टाकला जातो. अनेक वर्षांपासून कचºयाचे ढीग येथे असल्याने त्यासंदर्भात अनेकवेळा आंदोलने, तक्रारी शासन स्तरावर झाल्या; परंतु कचरा प्रकल्प अद्यापही कागदोपत्रीच अडकला आहे. हा कचरा प्रकल्प लवकरात लवकर करावा, अशी मागणी येथील रहिवासी व वाहनधारकांतून जोर धरू लागला आहे.घसादुखीकचºयातील कुजलेले अन्न, प्लास्टिक व चप्पल कारखान्यातील कातडी जळालेल्या दुर्गंधीमुळे व धुरामुळे डोळ्यांची जळजळ, खोकला, घसादुखी व श्वसनाचे आजार उद्भवले आहेत. 

गेली अनेक वर्षांपासून या कचºयामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागत असून, आता गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. अनेकजण आजारांशी सामना करीत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकवेळा लेखी तक्रार करूनदेखील प्रशासनाला जाग येत नाही.- चंद्रकांत बराले, नागरिकवर्षानुवर्षे आम्हाला या कचºयामुळे त्रास होत आहे. आमच्या घराच्या मागच्या बाजूस हा कचरा ढीग असल्याने आमचे घर कचरा डेपोतच आहे, असे वाटते. तसेच जळालेल्या कचºयाचा धूर नेहमी घरात आल्याने लहान मुलांना गंभीर स्वरुपाचे आजार उद्भवले आहेत. - शंकर सातपुते, नागरिक 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण