शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आगीचे लोट अन् धुराचे साम्राज्य -मोरेवाडीच्या माळावरील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 19:40 IST

मोरेवाडी (ता. करवीर) येथील गायरानामध्ये भारती विद्यापीठाजवळ लागून असलेल्या माळावर उघड्यावरच टाकलेल्या कचºयाला आग लागल्यामुळे सर्वत्र आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरले

ठळक मुद्देउघड्यावर टाकलेल्या कचऱ्याला आग लागल्याने दुर्गंधी

ज्योती पाटील ।पाचगाव : मोरेवाडी (ता. करवीर) येथील गायरानामध्ये भारती विद्यापीठाजवळ लागून असलेल्या माळावर उघड्यावरच टाकलेल्या कचºयाला आग लागल्यामुळे सर्वत्र आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामध्ये असणाºया विविध प्रकारचा कचरा व कातडी जळाल्याचा वास पसरत असल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. कचºयापासून कंपोस्ट खत निर्मितीचा प्रस्ताव अद्यापही धूळ खात पडल्याने कचºयाची विल्हेवाट लागणार की नाही, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक व वाहनधारकांतून विचारला जात आहे.

चित्रनगरी परिसर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी, अष्टविनायक पार्क, के.एम.टी. कॉलनी, धन्वंतरी कॉलनी या परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरत असून, येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीने गोळा केलेला कचरा पसरत असल्याने कचरा जाळून टाकण्याचा खटाटोप ग्रामपंचायतीमार्फत केले जातात. परंतु, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर भीषण परिणाम होताना पाहावयास मिळत आहेत.

या कचºयातील कुजलेले अन्न, ओला कचरा,प्लास्टिक कचरा तसेच धन्वंतरी कॉलनीमध्ये असलेल्या चपलच्या कारखान्यातील कातड्याचे तुकडेदेखील या कचºयाच्या ढिगात टाकले जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरतेच; परंतु याचा लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात. या परिसरात असणाºया नामांकित भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे शिक्षणासाठी बाहेरून आलेले विद्यार्थी विद्यापीठाच्या आसपास असणाºया वसतिगृहाचा आसरा घेतात; परंतु वसतिगृहावर दिवस-रात्र धुराचे लोट येत असल्याने त्यांना राहणे मुश्कील झालेआहे.

जवळजवळ तीन-चार टन गोळा केलेला कचरा दररोज या ठिकाणी आणून टाकला जातो. अनेक वर्षांपासून कचºयाचे ढीग येथे असल्याने त्यासंदर्भात अनेकवेळा आंदोलने, तक्रारी शासन स्तरावर झाल्या; परंतु कचरा प्रकल्प अद्यापही कागदोपत्रीच अडकला आहे. हा कचरा प्रकल्प लवकरात लवकर करावा, अशी मागणी येथील रहिवासी व वाहनधारकांतून जोर धरू लागला आहे.घसादुखीकचºयातील कुजलेले अन्न, प्लास्टिक व चप्पल कारखान्यातील कातडी जळालेल्या दुर्गंधीमुळे व धुरामुळे डोळ्यांची जळजळ, खोकला, घसादुखी व श्वसनाचे आजार उद्भवले आहेत. 

गेली अनेक वर्षांपासून या कचºयामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागत असून, आता गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. अनेकजण आजारांशी सामना करीत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकवेळा लेखी तक्रार करूनदेखील प्रशासनाला जाग येत नाही.- चंद्रकांत बराले, नागरिकवर्षानुवर्षे आम्हाला या कचºयामुळे त्रास होत आहे. आमच्या घराच्या मागच्या बाजूस हा कचरा ढीग असल्याने आमचे घर कचरा डेपोतच आहे, असे वाटते. तसेच जळालेल्या कचºयाचा धूर नेहमी घरात आल्याने लहान मुलांना गंभीर स्वरुपाचे आजार उद्भवले आहेत. - शंकर सातपुते, नागरिक 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण