शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कोल्हापूर जिल्ह्यात अखेर वळवाची हजेरी, उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 18:03 IST

शिरोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना रात्री झालेल्या वळीव पावसाने थोडासा दिलासा दिला. हा दिलासा फार काळ टिकला नाही. केवळ वीस मिनिटे बरसलेल्या या पावसाने रात्रीची झोप मात्र नकोशी करून सोडली. पाऊस पडून गेल्यानंतर रात्री पुन्हा उकाड्याने शहरवासीय हैराण झाले.नवीन वर्षातील पहिल्या वळीव पावसाची शहरवासीय गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. दिवसभर कडाक्याचे ऊन, त्यामुळे होणाऱ्या अंगाची काहिलीने नागरिक भलतेच अस्वस्थ होते. दुपारच्या वेळी उन्हातून फिरणेदेखील मुश्कील होऊन गेले होते.गुरुवारी दिवसभर फारच गदगदत होते. अंगातून घामाच्या धारा लागलेल्या होत्या. सायंकाळी वळीव पाऊस पडेल असे वातावरण तयार झाले होते. रात्री थोडे वारे सुटले. त्यानंतर साडेदहा वाजण्याच्या सुमारास आकाश भरून आले. जोरदार वारे, विजांचा लखलखाट होऊ लागल्याने जोराचा पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. केवळ वीस मिनिटेच पाऊस झाला. या वर्षातील पहिलाच पाऊस असल्याने मातीचा सुगंध सुटला. पण, वीस मिनिटानंतर मात्र पाऊस थांबला. शहरवासीयांची जोरदार पावसाची अपेक्षा भंग पावली.कसबा वाळवे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसकसबा वाळवे : विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह आज रात्री १०:३० वाजेच्या सुमारास येथील परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरू होती. हवेत गारवा पसरल्याने उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.राधानगरीत वादळी वाऱ्यासह मुसळदार पाऊसराधानगरी :  राधानगरीत गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. राधानगरीसह धरण परिसरात तासभर पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. ऊस पिकांना पाणी मिळाल्याने शेतकरी सुखावला. मुसळधार पावसामुळे राधानगरीसह परिसरातील वीजपुरवठा रात्री खंडित करण्यात आला होता.शिरोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसानगणेशवाडी : शिरोळ तालुक्यात बुधवारी दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे भाजीपाला, केळी, उसाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या पावसामुळे राजापूर, खिद्रापूर परिसरात भाजीपाला, उसाचे नुकसान झाले आहे. वांगी, टॉमटो या भाजीपाल्याची रोपे वादळी वाऱ्यामुळे उपटून पडली आहेत. केळीचे झाडेही तुटल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस