शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कोल्हापूर जिल्ह्यात अखेर वळवाची हजेरी, उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 18:03 IST

शिरोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना रात्री झालेल्या वळीव पावसाने थोडासा दिलासा दिला. हा दिलासा फार काळ टिकला नाही. केवळ वीस मिनिटे बरसलेल्या या पावसाने रात्रीची झोप मात्र नकोशी करून सोडली. पाऊस पडून गेल्यानंतर रात्री पुन्हा उकाड्याने शहरवासीय हैराण झाले.नवीन वर्षातील पहिल्या वळीव पावसाची शहरवासीय गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. दिवसभर कडाक्याचे ऊन, त्यामुळे होणाऱ्या अंगाची काहिलीने नागरिक भलतेच अस्वस्थ होते. दुपारच्या वेळी उन्हातून फिरणेदेखील मुश्कील होऊन गेले होते.गुरुवारी दिवसभर फारच गदगदत होते. अंगातून घामाच्या धारा लागलेल्या होत्या. सायंकाळी वळीव पाऊस पडेल असे वातावरण तयार झाले होते. रात्री थोडे वारे सुटले. त्यानंतर साडेदहा वाजण्याच्या सुमारास आकाश भरून आले. जोरदार वारे, विजांचा लखलखाट होऊ लागल्याने जोराचा पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. केवळ वीस मिनिटेच पाऊस झाला. या वर्षातील पहिलाच पाऊस असल्याने मातीचा सुगंध सुटला. पण, वीस मिनिटानंतर मात्र पाऊस थांबला. शहरवासीयांची जोरदार पावसाची अपेक्षा भंग पावली.कसबा वाळवे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसकसबा वाळवे : विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह आज रात्री १०:३० वाजेच्या सुमारास येथील परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरू होती. हवेत गारवा पसरल्याने उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.राधानगरीत वादळी वाऱ्यासह मुसळदार पाऊसराधानगरी :  राधानगरीत गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. राधानगरीसह धरण परिसरात तासभर पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. ऊस पिकांना पाणी मिळाल्याने शेतकरी सुखावला. मुसळधार पावसामुळे राधानगरीसह परिसरातील वीजपुरवठा रात्री खंडित करण्यात आला होता.शिरोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसानगणेशवाडी : शिरोळ तालुक्यात बुधवारी दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे भाजीपाला, केळी, उसाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या पावसामुळे राजापूर, खिद्रापूर परिसरात भाजीपाला, उसाचे नुकसान झाले आहे. वांगी, टॉमटो या भाजीपाल्याची रोपे वादळी वाऱ्यामुळे उपटून पडली आहेत. केळीचे झाडेही तुटल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस