शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, कोल्हापुरात समाजवादी पक्षाचे धरणे आंदोलन 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: February 26, 2024 16:03 IST

शेतमालाला हमी भावासह विविध मागण्यांसाठी दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन

कोल्हापूर : शेतमालाला हमी भावासह विविध मागण्यांसाठी दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर गुन्हे दाखल करा. भारतरत्न स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी समाजवादी पक्षाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.प्रदेश महासचिव शिवाजीराव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यामध्ये २३ पिकांची हमी भावाप्रमाणे खरेदी करा, शेतकऱ्यांची कर्जे माफ करा, शेतकऱ्यांना ५८ वर्षानंतर पेन्शन सुरु करा, शेतजमिनींचे भूसंपादन २०१३ च्या कायद्यानुसार करा, धान्याच्या आयात शुल्कात वाढ करा, नुकसानीचे मुल्यांकन शेतकरीनिहाय करावे, भारतीने जागतिक व्यापार संघटनेच्या करारातून बाहेर पडावे, पंतप्रधान विमा योजनेत सुधारणा करून विम्याचे पैसे शासनाने भरावे, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पिडितांना न्याय द्यावा, कृषी वस्तू, दुग्धजन्य पदार्थ फळे, भाजीपाला यांची आयात कमी करा, वीज बिले माफ करुन मोफत २४ तास वीज द्या या मागण्या मान्य कराव्यात. सध्या देशात दिवसाला दोन शेतकरी आत्महत्या करतात. दुर्देवाने यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी आंदोलने मोठ्या प्रमाणात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल असा इशारा देण्यात आला. यावेळी रवी जाधव, मुकुंद माळी, अनिल घाटगे, संभाजी जगदाळे, बाबू कदम, ए. एन. पाटील, सुभाष देसाई, रसूल नवाब, जावेद मोमीन, रफिक इस्माईल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपagitationआंदोलन