शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, कोल्हापुरात समाजवादी पक्षाचे धरणे आंदोलन 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: February 26, 2024 16:03 IST

शेतमालाला हमी भावासह विविध मागण्यांसाठी दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन

कोल्हापूर : शेतमालाला हमी भावासह विविध मागण्यांसाठी दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर गुन्हे दाखल करा. भारतरत्न स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी समाजवादी पक्षाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.प्रदेश महासचिव शिवाजीराव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यामध्ये २३ पिकांची हमी भावाप्रमाणे खरेदी करा, शेतकऱ्यांची कर्जे माफ करा, शेतकऱ्यांना ५८ वर्षानंतर पेन्शन सुरु करा, शेतजमिनींचे भूसंपादन २०१३ च्या कायद्यानुसार करा, धान्याच्या आयात शुल्कात वाढ करा, नुकसानीचे मुल्यांकन शेतकरीनिहाय करावे, भारतीने जागतिक व्यापार संघटनेच्या करारातून बाहेर पडावे, पंतप्रधान विमा योजनेत सुधारणा करून विम्याचे पैसे शासनाने भरावे, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पिडितांना न्याय द्यावा, कृषी वस्तू, दुग्धजन्य पदार्थ फळे, भाजीपाला यांची आयात कमी करा, वीज बिले माफ करुन मोफत २४ तास वीज द्या या मागण्या मान्य कराव्यात. सध्या देशात दिवसाला दोन शेतकरी आत्महत्या करतात. दुर्देवाने यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी आंदोलने मोठ्या प्रमाणात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल असा इशारा देण्यात आला. यावेळी रवी जाधव, मुकुंद माळी, अनिल घाटगे, संभाजी जगदाळे, बाबू कदम, ए. एन. पाटील, सुभाष देसाई, रसूल नवाब, जावेद मोमीन, रफिक इस्माईल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपagitationआंदोलन