शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मिल्क फेडरेशनच्या काळात बिले मिळताना मारामार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:26 IST

विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीर तालुका मिल्क फेडरेशन जे दूध गोळा करीत असे, त्यांच्याकडे प्रक्रिया करण्याची सोय ...

विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : करवीर तालुका मिल्क फेडरेशन जे दूध गोळा करीत असे, त्यांच्याकडे प्रक्रिया करण्याची सोय नसल्याने सरकारी डेअरीला घातले जाई. त्या काळात सरकारी डेअरीकडून शेतकऱ्यांना तीन-तीन महिने बिलेच मिळायची नाहीत. एका चांगल्या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना जगण्यासाठी एक साधन निर्माण झाले होते; परंतु ते मोडकळीस येईल की काय, अशी स्थिती सुरुवातीच्या टप्प्यातच निर्माण झाली होती. तेथून जी संघाची वाटचाल सुरू झाली ती एकेक टप्पे पार करीत आजच्या शिखरापर्यंत आली आहे. त्यावेळी अन्य जिल्ह्यांत तालुका संघ झाले; परंतु कोल्हापुरात मात्र तालुका संघांची स्थापना होऊ दिली नाही. त्यामुळेही ‘गोकुळ’ भक्कम झाला, हे नोंद घेण्यासारखे आहे.

महाराष्ट्रात आणि देशातही लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या; परंतु हे संकट कोल्हापूर जिल्ह्याने थोपवले त्याचे सारे श्रेय ‘गोकुळ’चे आहे. हाच अनुभव जिल्ह्याला १९७२-७३ च्या दुष्काळातही आला होता. त्यामुळे ‘गोकुळ’ हा नुसता सहकारी संघ नाही, तर ती इथल्या लाखो शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी जोडलेली रक्तवाहिनी आहे. तिच्या जिवावर राजकारण करणाऱ्या सर्वांनीच याचे भान सतत ठेवले पाहिजे. ‘गोकुळ’च्या विकासामध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचेही (एनडीडीबी) पाठबळ फारच मोलाचे राहिले आहे. वर्गीस कुरियन यांनी १९७७-७८ च्या सुमारास संघाला ३२ कोटी रुपयांचे कर्ज कमी व्याजाने उपलब्ध करून दिले. त्यातून पहिली दूध महापूर योजना सुरू झाली. संघाचे हजारांत संकलन होणारे दूध लाखांचे आकडे ओलांडून पुढे गेले. दूध महापूर दोनमध्येही एवढीच रक्कम या संस्थेने दिली. त्यामुळेच डेअरी प्रकल्प, पशुखाद्य, पावडर प्रकल्प असे टप्पे यशस्वी झाले.

असे होते पहिले संचालक मंडळ

दूध व्यवसायाचा कोल्हापूर जिल्ह्याला लाभ व्हावा यासाठी करवीर तालुका मिल्क फेडरेशनचे रूपांतर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात झाल्यावर आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेकजण या चळवळीशी प्रामाणिक राहून काम करीत होते. त्याकाळी संचालक मंडळात उपाध्यक्ष म्हणून रामचंद्र परशराम दरेकर (रा. वाघापूर), गणपती पाटील (टोप), अमृतराव पाटील, सदाशिव आमते (कोथळी), शामराव पाटील, रामू पाटील, राजाराम पाटील, दत्तात्रय यशवंत पाटील, बंडा पाटील, सुरेंद्र चौगुले व हरी गायकवाड यांचा समावेश होता. एस. वाय. पाटील-कणेरीकर हे कार्यकारी संचालक असले तरी त्यांचेही योगदान मोलाचे राहिले. चुयेकर यांना संघात आणण्यातही व पहिले अध्यक्ष करण्यातही त्यांचाच पुढाकार होता. सध्याची गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील जागा संघासाठी मिळावी यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. त्या काळी वाघापूरचे तुकाराम रामचंद्र कुरडे हेदेखील चुयेकरांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय होते.

बोंद्रे दादा यांचे पाठबळ

‘गोकुळ’ची उभारणी ज्या काळात झाली, त्यावेळी दिवंगत नेते श्रीपतराव बोंद्रे यांचे जिल्ह्याच्या राजकारणावर प्रचंड वर्चस्व होते. करवीर तालुका मिल्क फेडरेशनची उभारणी करण्यातही त्यांचेच पाठबळ होते. चुयेकर यांना या फेडरेशनवर बोंद्रेदादांनीच संधी दिली. सध्याचा गोकुळ शिरगावमधील डेअरी प्रकल्प आहे, त्याचे भूमिपूजन दिवंगत बोंद्रे यांच्या हस्ते झाले आहे.

दुधाचा महापूर योजना

राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे (एनडीडीबी) तांत्रिक साहाय्य झाल्याने गोकुळचा या व्यवसायातील पाया भक्कम झाला. या मंडळाचे पहिले पथक १९७८ ला कोल्हापूरला आले. त्यामध्ये व्ही. जी. पाटील, सध्याचे कार्यकारी संचालक डी. एस. घाणेकर, व्ही. पी. गांधी व श्रीवास्तव यांचा सहभाग होता. त्याकाळी संघाच्या ३४ पर्यवेक्षकांची टीम ‘अमूल’मध्ये प्रशिक्षणासाठी गेली होती.

२२०४२०२१-कोल-गोकुळ भूमिपूजन

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा सध्याच्या गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील डेअरी प्रकल्पाचे भूमिपूजन दिवंगत नेते श्रीपतराव बोंद्रे यांच्या हस्ते झाले होते. तत्कालीन अध्यक्ष आनंदराव पाटील-चुयेकर त्यावेळी उपस्थित होते.