शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सन्मानाने आघाडी करा, नाही तर स्वबळावर लढू, ‘शेकाप’च्या जिल्हा बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 13:27 IST

धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही; पण काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करताना सन्मानाने सोबत घ्यावे. दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ लढविण्याची आमची तयारी आहे. आम्ही कुणासमोर माना खाली घालणार नाही, प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे, असा निर्धार माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केला. याला उपस्थितांनी हात उंचावून पाठिंबा दर्शविला.

ठळक मुद्दे सन्मानाने आघाडी करा, नाही तर स्वबळावर लढू, ‘शेकाप’च्या जिल्हा बैठकीत निर्णयविधानसभेच्या पाच जागांवर दावा

कोल्हापूर : धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही; पण काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करताना सन्मानाने सोबत घ्यावे. दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ लढविण्याची आमची तयारी आहे. आम्ही कुणासमोर माना खाली घालणार नाही, प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे, असा निर्धार माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केला. याला उपस्थितांनी हात उंचावून पाठिंबा दर्शविला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेंबे रोडवरील शेकापच्या कार्यालयात रविवारी दुपारी जिल्हा कार्यकारिणीचा मेळावा झाला. यात काँग्रेसप्रणित आघाडीत सहभागी होण्यासह स्वतंत्र लढण्याबाबतही चाचपणी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासो देवकर, प्राचार्य टी. एस. पाटील, भारत पाटील, अशोकराव पवार-पाटील, बाबूराव कदम, केरबा पाटील, निवास लाड, बाजार समिती संचालक अमित कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. बाबासो देवकर म्हणाले, शेकाप सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आंदोलने उभारते, ती यशस्वीही करते; पण निवडणुकीच्या मैदानात मात्र यश मिळत नाही, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. निवडणूक जिंकण्याच्याच दृष्टीने रणनीती आखली गेली पाहिजे. भारत पाटील यांनी शेकाप सध्या जिंकण्याच्या नसल्या तरी पाडण्याची भूमिका चांगली निभावू शकतो, याचे प्रत्यंतर यापूर्वीही आलेले आहे. त्यामुळे आघाडीत शेकापला सन्मान मिळावा, अशी भावना व्यक्त केली. केरबा जाधव, कुमार जाधव, सुभाष सावंत यांनी कार्यकर्ते हीच ‘शेकाप’ची ताकद असल्याने त्यांचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. काँग्रेससोबतचा पूर्वानुभव वाईट असल्याने त्याचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

करवीरसाठी आग्रह, शाहूवाडी-पन्हाळा लढण्याची तयारीपारंपरिक मतदारसंघ म्हणून करवीरवर ‘शेकाप’चाच पहिला हक्क आहे. आघाडीच्या जागावाटप बैठकीत करवीरसाठी आग्रह कायम असणार आहे. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादीने लढण्यास नकार दिला, तर अग्रहक्काने या जागेवर शेकापचाच विचार व्हावा, तसा उमेदवार आमच्याकडे आहे. तो योग्य वेळी बाहेर काढू, असे भारत पाटील यांनी सांगितले.बापूंकडे निर्णयाचे सर्वाधिकारदोन्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यासह जागावाटपासंदर्भात सर्वाधिकार संपतबापू पवार पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय मेळाव्यात झाला. ‘शेकाप’ने दावा केलेल्या पाचपैकी किमान दोन तरी जागा पदरात पाडून घ्याव्यात, असेही ठरले. तीन आॅगस्टपर्यंत हा निर्णय होणार असल्याने तत्पूर्वी तालुकानिहाय बैठका घेऊन सक्षम उमेदवारांचा शोध घेण्याचेही ठरले.‘शेकाप’ने दावा केलेले मतदारसंघकोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी-भुदरगड, शाहूवाडी-पन्हाळा.

 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण