शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दुधाच्या एफआरपीसाठी राज्यभर लढ्याचे रणशिंग, डॉ. अजित नवले यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 16:08 IST

राज्यात रोज संकलित होणाऱ्या एकूण दुधापैकी केवळ ४० लाख लिटर दूध खाण्यासाठी वापरले जाते. उर्वरित ९० लाख लिटर दुधाची पावडर करून साठवून ठेवली जाते.

कोल्हापूर : उसाप्रमाणे दुधालाही एफआरपी मिळावी, यासाठी आगामी काळात राज्यभर लढा उभा केला जाईल. या लढ्यात कोल्हापूरचे शेतकरी, दूध उत्पादकांनी अग्रभागी रहावे, असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सोमवारी केले. अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्ह्याच्या सातव्या अधिवेशनात ते बोलत होते. येथील शाहू स्मारक भवनात अधिवेशन झाले.

ते म्हणाले, दुधालाही एफआरपी मिळण्यासाठी किसान सभा लढत आहे. याची दखल घेवून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीसोबत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी साखर साठवून ठेवता येते, त्यामुळे उसाला एफआरपी देणे शक्य झाल्याची चुकीची माहिती दिली. यावर आम्ही जोरदार आक्षेप घेतला. राज्यात रोज संकलित होणाऱ्या एकूण दुधापैकी केवळ ४० लाख लिटर दूध खाण्यासाठी वापरले जाते. उर्वरित ९० लाख लिटर दुधाची पावडर करून साठवून ठेवली जाते. अशाप्रकारे दुधाची पावडरही साठवून विकता येते, हा मुद्दा आम्ही पटवून दिला. पण प्रत्यक्षात एफआरपीचा कायदा करण्याची मानसिकता समितीची नाही. यामुळे भविष्यात यासाठीचा लढा तीव्र करावा लागेल.पश्चिम महाराष्ट्रातील जागृत ऊस उत्पादकांनी टोकाचा संघर्ष करून उसाला एफआरपीचा कायदा करून घेतला; पण साखरसम्राट आणि शासनातील पुढारी संगनमताने एफआरपीलाच नख लावण्याचे काम करीत आहेत. एफआरपीचा कायदा थेट मोडल्यास ऊस उत्पादक शेतकरी दांडके घेऊन राज्यकर्त्यांना जाब विचारतील, अशी त्यांना भीती आहे. म्हणून एफआरपीचे तुकडे पाडले आहेत. याला किसान सभेचा विरोध आहे.

यावेळी किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर यांनी केंद्र सरकारच्या शेती विरोधी भूमिकेवर प्रकाशझोत टाकला. याप्रसंगी उमेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. अधिवेशनास नारायण गायकवाड, ए. बी. पाटील, शिवाजी मगदूम, आनंद चव्हाण, बाळासाहेब कमते, अमित नाईक आदी उपस्थित होते.

अधिवेशनातील प्रमुख ठराव असे :

  • उसाला एकरकमी चार हजार रुपये एफआरपी द्या.
  • दुधासाठीही एफआरपीचा कायदा करावा.
  • देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा.
  • खते, कीटकनाशक, वीज यांची दरवाढ रद्द करा.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूध