शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

‘हातकणंगले’ची वाया गेलेली पंधरा वर्षे : तालुक्याची प्रगती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 01:17 IST

या ठिकाणचा वस्त्रोद्योग पहिल्यांदाच एवढा डळमळीत झाला आहे. हजारो यंत्रमाग बंद पडले असून, आॅटोलूमची देखील कामे कमी झाली आहेत. नवी खाती सुरू होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.

ठळक मुद्दे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ; अनेक प्रश्न प्रलंबित; सर्वाधिक शहरीकरणाचा मतदारसंघ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक शहरीकरण झालेलाआणि झपाट्याने विकसित झालेला तालुका म्हणून हातकणंगले तालुका ओळखला जातो. वारणा व पंचगंगा नदीच्या खोऱ्यात विखुरलेल्या या तालुक्यात हातकणंगले आणिइचलकरंजी हे दोन मतदारसंघ येतात. पण, गेल्या १५ वर्षांत येथील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सक्षम नेत्यांच्या अभावामुळे विविध पायाभूत सुविधांची वानवा जाणवते.

हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी, पेठवडगाव, हुपरी या नगरपालिका, तर हातकणंगले ही नवीन नगरपंचायत आहे. जिल्ह्यातील हा एकमेव तालुका आहे, ज्यामध्ये चार नगरपालिका, तर शिरोली एमआयडीसी, लक्ष्मी इंडस्ट्रीज, आवाडे टेक्सटाईल पार्क, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग आणि कागल पंचतारांकित एमआयडीसीचा काही भाग आहे. पण, पायाभूत सुविधांच्या बाबतीत हा तालुका पिछाडीवर राहत असल्याचे चित्र दिसते. सांगली-शिरोली रस्त्याचा प्रश्न गेली १० वर्षे रखडला आहे. हा रस्ता झाला असला तरी कामे अजूनही प्रलंबित असून, जो रस्ता झाला आहे तो देखील खराब आहे.

यासाठी आमदारांनी आंदोलने केली; पण सत्ता आल्यावर त्यांना हे काम पूर्ण करता आले नाही. त्याचप्रमाणे तालुका क्रीडा संकुल २००३ मध्ये मंजूर झाले, तर २००९ मध्ये त्याचा निधी वाढविण्यात आला. पण, आजअखेर हे संकुल भिजत पडले आहे. औद्योगिक वसाहतीत वडगाव येथील

एकही नवा प्रकल्प उभारला गेला नाही. वाढीव वीजदरामुळे फौंड्री उद्योग देखील अडचणीत आला आहे. शिरोलीत मार्बल आणि टाईल्स उद्योग बहरला आहे; पण त्यासाठी कोणतेही नियोजन नाही. इचलकरंजी नगरपालिका व परिसरातील गावांचा मिळून मतदारसंघ आहे. या ठिकाणचा वस्त्रोद्योग पहिल्यांदाच एवढा डळमळीत झाला आहे. हजारो यंत्रमाग बंद पडले असून, आॅटोलूमची देखील कामे कमी झाली आहेत. नवी खाती सुरू होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. गेल्या दहा वर्षांत एकही नवीन सूतगिरणी भागात सुरू झालेली नाही. २०१२ मध्ये इचलकरंजीत काविळीने थैमान घातल्यानंतर प्रदूषित पाणीप्रश्न ऐरणीवर आला; पण त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. वारणा अमृत योजनेचे घोंगडे भिजत पडले आहे.आरोग्य सुविधांचा बोजवारामोठी लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या दोन्ही मतदारसंघांत आरोग्य सुविधांची दाणादाण उडाली आहे. याठिकाणी एकही उपजिल्हा रुग्णालय नाही. आयजीएम रुग्णालय, बळवंतराव यादव रुग्णालय याची अवस्था बघून आज तेथे एकही रुग्ण जाणार नाही. येथील लोकप्रतिनिधींनी देखील याबाबत कधीच आवाज उठवला नाही, हे दुर्दैव. महामार्गावरील अपघातांचे प्रमाण बघतट्रॉमा सेंटरची नितांत गरज असूनही याबाबत कधी पाठपुरावा होताना दिसत नाही.शैक्षणिक हब, बेरोजगारी जादातालुक्यात विविध शैक्षणिक संस्था, निवासी शाळा, डीकेटीई, घोडावत इन्स्टिट्यूट, माने इन्स्टिट्यूट, डीवायपी शैक्षणिक संकुल, आदी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. येथे दरवर्षी हजारो युवक शिक्षण घेतात; पण त्यांना परिसरात रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. एमआयडीसीमध्ये फार कमी रोजगार मिळत आहे. तालुक्यात माहिती तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग, फौंड्री, वाहन उद्योग वाढविण्याची सुवर्णसंधी असूनही लोकप्रतिनिधींच्या पातळीवर काहीच होत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण