शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

गड किल्ले भाड्याने दिल्यास उग्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 11:37 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात गडकोट किल्ल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे; मात्र शासनाने हे किल्ले विकसकांना भाड्याने देण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाला डिवचले आहे. हा निर्णय शासनाने त्वरित मागे न घेतल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोमवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने दिला आहे.

ठळक मुद्देगड किल्ले भाड्याने दिल्यास उग्र आंदोलनकोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा इशारा

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात गडकोट किल्ल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे; मात्र शासनाने हे किल्ले विकसकांना भाड्याने देण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाला डिवचले आहे. हा निर्णय शासनाने त्वरित मागे न घेतल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोमवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने दिला आहे.काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत किल्ल्यांची वर्गवारी करून काही किल्ले विकसकांना भाडेतत्वावर देण्याचे ठरले आहे. त्या ठिकाणी हॉटेल, मंगल कार्यालय, लॉज व अन्य व्यवसायाची परवानगी देण्यात येणार आहे.स्वराज्य निर्मिती करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या शौर्य व बुद्धिमत्तेबरोबरच गनिमी कावा, युद्धनीती व गड-किल्ल्यांची महत्त्वाची साथ लाभली. महाराजांनी किल्ले बांधणीबरोबरच काही किल्ले जिंकून त्यांची डागडुजी करून त्यांचा विकास केला.

हे किल्ले महाराष्ट्राची शान व अस्मिता असून, त्यांचे पावित्र्य व इतिहास चिरंतन राहिले पाहिजे; मात्र शासनाच्या निर्णयामुळे किल्ल्यावर अवैध धंद्याचीही निर्मिती होण्याची शक्यता आहे; त्यामुळे हा अविचारी निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावा.

शिष्टमंडळात शहर काँग्रेस अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, संपतराव पाटील, किशोर खानविलकर, तौफिक मुल्लाणी, प्रताप जाधव, मंगल खुडे, रणजित पोवार, उदय चव्हाण, किरण मेथे, संग्राम गायकवाड, संजय पोवार, संध्या घोटणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसFortगडkolhapurकोल्हापूर