शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

घरी बसून चमचमीत पदार्थांवर ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊनने पुन्हा एकदा नागरिकांची जीवनशैली बदलली असून सध्या रोज सकाळ-संध्याकाळ चमचमीत पदार्थांवर, बेकरी पदार्थांवर ताव ...

कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊनने पुन्हा एकदा नागरिकांची जीवनशैली बदलली असून सध्या रोज सकाळ-संध्याकाळ चमचमीत पदार्थांवर, बेकरी पदार्थांवर ताव मारणे, तासनतास टीव्ही बघणे आणि बेडवर मस्त ताणून देणे असा एकूण स्थूल व्यक्तिमत्त्वाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सध्या कडक निर्बंधांमुळे फिरायला जाणे, सायकलिंग करता येत नाही. घरातल्या घरात व्यायाम करायचा म्हणो कंटाळा अशी मानसिकता आहे. मात्र अशा काळातही उत्तम आरोग्य राखणे हीच खरी कसोटी असणार आहे.

गेल्यावर्षी कोरोना सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांचा कडकडीत लॉकडाऊनची संधी करत अनेकांनी कुटुंबासाठी वेळ,, स्वयंपाक घरात पुरुषांनी मुक्त वावर करत आपले नवनवीन प्रयोग केलेले पदार्थ सर्वांना खाऊ घातले, खेळ खेळले. घराघरातील गृहिणी सुखावल्या. हा सगळा महोत्सव गतवर्षी साजरा करुन झाल्यानंतर आता यातला उत्साह कमी झाला आहे.

स्वत: स्वयंपाक करण्याची जागा सोफ्यावर बसून ऑर्डर सोडण्याचे घेतली आहे. सुगरणीने पुन्हा पदर खाेवून चमचमीत पदार्थ बनवायला सुरुवात केली आहे. बिस्किटांची जागा खारी, बटरने घेतली आहे. तर युट्यूबद्वारे गुरूने दाखवलेली रेसिपी करून बघण्यासाठी पिझ्झा बेस, पनीर, चीज, केक बनवण्याचे साहित्य, प्रिमिक्स अशा वेगवेगळ्या साहित्यांनी ही फ्रिजचे रकाने भरून गेले आहेत. या काळात सकाळी उशिरा उठणे, गरमागरम आणि लज्जतदार पदार्थांवर ताव मारणे, तासनतास टीव्ही बघणे कंटाळा आला की पुन्हा दुपारी झोप काढणे, जमलंच तर मुलांसाेबत काही गेम खेळणे अशी सध्याची जीवनशैली झाली आहे.

--

सध्या मॉनिंग-‌इव्हिनिंग वॉक, जलतरण तलाव, जीम सगळेच बंद आहे. अनेक घरांमध्ये घरातल्या घरात फिरण्या इतकी जागाही नसते. कौटुंबिक अडचणी असतात. पण ज्यांना शक्य आहे ते देखील घरात हे सगळं करायला कंटाळा करतात. सभोवतालची परिस्थिती इतकी नकारात्मक आणि कंटाळवाणी असताना मन प्रफुल्लित ठेवणे, स्वत: बरोबर कुटुंबियांचा ही उत्साह वाढवणे हेच मोठे आव्हान झाले आहे.

-

बेकरी पदार्थांवर ताव

बेकरी पदार्थांच्या विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ पर्यंतच परवानगी आहे. पण या काळात जणू दिवसभराच्या खरेदी केली जाते. सध्या सर्वाधिक खरेदी ही मिसळच्या पदार्थांची केली जात आहे. फरसाण आणि ब्रेकला अधिक मागणी आहे.

राजेश मोरे (बेकरी व्यावसायिक)

---

नियमित व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण

प्रतिकारशक्ती चांगली असलेले, व्यायामाला जगण्याचा भाग बनवलेल्या अनेक नागरिकांपर्यंत काेरोना पोहोचू शकला नाही. आणि ज्यांना संसर्ग झाला त्यांना त्या काळात फार त्रास झाला नाही, या काळात घरात बसून आणि अनावश्यक खाण्यामुळे वजन वाढते. त्यामुळे व्यायाम, योगा, प्राणायाम या गोष्टी केल्याच पाहिजेत. नियमित वर्क आऊट करणे, अनावश्यक झोप टाळून पण पुरेशी झोप घेणे, गोड, पॅकेट बंद पदार्थ टाळणे, तब्येत सांभाळणे या गोष्टींवर अधिक लक्ष दिले पाहिजे.

आशिष रवळू (फिटनेस तज्ज्ञ)