शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

घरी बसून चमचमीत पदार्थांवर ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊनने पुन्हा एकदा नागरिकांची जीवनशैली बदलली असून सध्या रोज सकाळ-संध्याकाळ चमचमीत पदार्थांवर, बेकरी पदार्थांवर ताव ...

कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊनने पुन्हा एकदा नागरिकांची जीवनशैली बदलली असून सध्या रोज सकाळ-संध्याकाळ चमचमीत पदार्थांवर, बेकरी पदार्थांवर ताव मारणे, तासनतास टीव्ही बघणे आणि बेडवर मस्त ताणून देणे असा एकूण स्थूल व्यक्तिमत्त्वाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सध्या कडक निर्बंधांमुळे फिरायला जाणे, सायकलिंग करता येत नाही. घरातल्या घरात व्यायाम करायचा म्हणो कंटाळा अशी मानसिकता आहे. मात्र अशा काळातही उत्तम आरोग्य राखणे हीच खरी कसोटी असणार आहे.

गेल्यावर्षी कोरोना सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांचा कडकडीत लॉकडाऊनची संधी करत अनेकांनी कुटुंबासाठी वेळ,, स्वयंपाक घरात पुरुषांनी मुक्त वावर करत आपले नवनवीन प्रयोग केलेले पदार्थ सर्वांना खाऊ घातले, खेळ खेळले. घराघरातील गृहिणी सुखावल्या. हा सगळा महोत्सव गतवर्षी साजरा करुन झाल्यानंतर आता यातला उत्साह कमी झाला आहे.

स्वत: स्वयंपाक करण्याची जागा सोफ्यावर बसून ऑर्डर सोडण्याचे घेतली आहे. सुगरणीने पुन्हा पदर खाेवून चमचमीत पदार्थ बनवायला सुरुवात केली आहे. बिस्किटांची जागा खारी, बटरने घेतली आहे. तर युट्यूबद्वारे गुरूने दाखवलेली रेसिपी करून बघण्यासाठी पिझ्झा बेस, पनीर, चीज, केक बनवण्याचे साहित्य, प्रिमिक्स अशा वेगवेगळ्या साहित्यांनी ही फ्रिजचे रकाने भरून गेले आहेत. या काळात सकाळी उशिरा उठणे, गरमागरम आणि लज्जतदार पदार्थांवर ताव मारणे, तासनतास टीव्ही बघणे कंटाळा आला की पुन्हा दुपारी झोप काढणे, जमलंच तर मुलांसाेबत काही गेम खेळणे अशी सध्याची जीवनशैली झाली आहे.

--

सध्या मॉनिंग-‌इव्हिनिंग वॉक, जलतरण तलाव, जीम सगळेच बंद आहे. अनेक घरांमध्ये घरातल्या घरात फिरण्या इतकी जागाही नसते. कौटुंबिक अडचणी असतात. पण ज्यांना शक्य आहे ते देखील घरात हे सगळं करायला कंटाळा करतात. सभोवतालची परिस्थिती इतकी नकारात्मक आणि कंटाळवाणी असताना मन प्रफुल्लित ठेवणे, स्वत: बरोबर कुटुंबियांचा ही उत्साह वाढवणे हेच मोठे आव्हान झाले आहे.

-

बेकरी पदार्थांवर ताव

बेकरी पदार्थांच्या विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ पर्यंतच परवानगी आहे. पण या काळात जणू दिवसभराच्या खरेदी केली जाते. सध्या सर्वाधिक खरेदी ही मिसळच्या पदार्थांची केली जात आहे. फरसाण आणि ब्रेकला अधिक मागणी आहे.

राजेश मोरे (बेकरी व्यावसायिक)

---

नियमित व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण

प्रतिकारशक्ती चांगली असलेले, व्यायामाला जगण्याचा भाग बनवलेल्या अनेक नागरिकांपर्यंत काेरोना पोहोचू शकला नाही. आणि ज्यांना संसर्ग झाला त्यांना त्या काळात फार त्रास झाला नाही, या काळात घरात बसून आणि अनावश्यक खाण्यामुळे वजन वाढते. त्यामुळे व्यायाम, योगा, प्राणायाम या गोष्टी केल्याच पाहिजेत. नियमित वर्क आऊट करणे, अनावश्यक झोप टाळून पण पुरेशी झोप घेणे, गोड, पॅकेट बंद पदार्थ टाळणे, तब्येत सांभाळणे या गोष्टींवर अधिक लक्ष दिले पाहिजे.

आशिष रवळू (फिटनेस तज्ज्ञ)