शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

घरी बसून चमचमीत पदार्थांवर ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊनने पुन्हा एकदा नागरिकांची जीवनशैली बदलली असून सध्या रोज सकाळ-संध्याकाळ चमचमीत पदार्थांवर, बेकरी पदार्थांवर ताव ...

कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊनने पुन्हा एकदा नागरिकांची जीवनशैली बदलली असून सध्या रोज सकाळ-संध्याकाळ चमचमीत पदार्थांवर, बेकरी पदार्थांवर ताव मारणे, तासनतास टीव्ही बघणे आणि बेडवर मस्त ताणून देणे असा एकूण स्थूल व्यक्तिमत्त्वाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सध्या कडक निर्बंधांमुळे फिरायला जाणे, सायकलिंग करता येत नाही. घरातल्या घरात व्यायाम करायचा म्हणो कंटाळा अशी मानसिकता आहे. मात्र अशा काळातही उत्तम आरोग्य राखणे हीच खरी कसोटी असणार आहे.

गेल्यावर्षी कोरोना सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांचा कडकडीत लॉकडाऊनची संधी करत अनेकांनी कुटुंबासाठी वेळ,, स्वयंपाक घरात पुरुषांनी मुक्त वावर करत आपले नवनवीन प्रयोग केलेले पदार्थ सर्वांना खाऊ घातले, खेळ खेळले. घराघरातील गृहिणी सुखावल्या. हा सगळा महोत्सव गतवर्षी साजरा करुन झाल्यानंतर आता यातला उत्साह कमी झाला आहे.

स्वत: स्वयंपाक करण्याची जागा सोफ्यावर बसून ऑर्डर सोडण्याचे घेतली आहे. सुगरणीने पुन्हा पदर खाेवून चमचमीत पदार्थ बनवायला सुरुवात केली आहे. बिस्किटांची जागा खारी, बटरने घेतली आहे. तर युट्यूबद्वारे गुरूने दाखवलेली रेसिपी करून बघण्यासाठी पिझ्झा बेस, पनीर, चीज, केक बनवण्याचे साहित्य, प्रिमिक्स अशा वेगवेगळ्या साहित्यांनी ही फ्रिजचे रकाने भरून गेले आहेत. या काळात सकाळी उशिरा उठणे, गरमागरम आणि लज्जतदार पदार्थांवर ताव मारणे, तासनतास टीव्ही बघणे कंटाळा आला की पुन्हा दुपारी झोप काढणे, जमलंच तर मुलांसाेबत काही गेम खेळणे अशी सध्याची जीवनशैली झाली आहे.

--

सध्या मॉनिंग-‌इव्हिनिंग वॉक, जलतरण तलाव, जीम सगळेच बंद आहे. अनेक घरांमध्ये घरातल्या घरात फिरण्या इतकी जागाही नसते. कौटुंबिक अडचणी असतात. पण ज्यांना शक्य आहे ते देखील घरात हे सगळं करायला कंटाळा करतात. सभोवतालची परिस्थिती इतकी नकारात्मक आणि कंटाळवाणी असताना मन प्रफुल्लित ठेवणे, स्वत: बरोबर कुटुंबियांचा ही उत्साह वाढवणे हेच मोठे आव्हान झाले आहे.

-

बेकरी पदार्थांवर ताव

बेकरी पदार्थांच्या विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ पर्यंतच परवानगी आहे. पण या काळात जणू दिवसभराच्या खरेदी केली जाते. सध्या सर्वाधिक खरेदी ही मिसळच्या पदार्थांची केली जात आहे. फरसाण आणि ब्रेकला अधिक मागणी आहे.

राजेश मोरे (बेकरी व्यावसायिक)

---

नियमित व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण

प्रतिकारशक्ती चांगली असलेले, व्यायामाला जगण्याचा भाग बनवलेल्या अनेक नागरिकांपर्यंत काेरोना पोहोचू शकला नाही. आणि ज्यांना संसर्ग झाला त्यांना त्या काळात फार त्रास झाला नाही, या काळात घरात बसून आणि अनावश्यक खाण्यामुळे वजन वाढते. त्यामुळे व्यायाम, योगा, प्राणायाम या गोष्टी केल्याच पाहिजेत. नियमित वर्क आऊट करणे, अनावश्यक झोप टाळून पण पुरेशी झोप घेणे, गोड, पॅकेट बंद पदार्थ टाळणे, तब्येत सांभाळणे या गोष्टींवर अधिक लक्ष दिले पाहिजे.

आशिष रवळू (फिटनेस तज्ज्ञ)