शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

ताप- बालस्वास्थ

By admin | Updated: February 21, 2017 23:49 IST

शरीराचे वाढलेले तापमान प्रत्येकवेळी शरीराला हानीकारक असते असे नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये शरीराच्या तापमानामध्ये होणारी वाढ शरीराला उपकारक असते

गेल्या काही लेखांमध्ये आपण बालआरोग्याबाबत प्राथमिक माहिती घेतली. आता बालरुग्णांच्या काही सर्वसाधारण तक्रारी व त्याबाबत पालकांनी घ्यावयाची काळजी जाणून घेऊया. डॉक्टरांकडे येणाऱ्या बहुतेक बालरुग्णांच्या पालकांची मुख्य तक्रार ताप ही असते. काही पालक आपल्या मुलाच्या तापाबाबत अतिसंवेदनशील असल्याने ताप असल्याची खात्रीदेखील न करता वारंवार ताप येत असल्याची तक्रार करीत असतात व वारंवार उपचार करीत असतात. बाह्य वातावरणामधील तापमानामध्ये बदल झाला तरी स्वत:च्या शरीराचे तापमान एका ठरावीक मर्यादेमध्ये नियंत्रित ठेवण्याची क्षमता मानवामध्ये असते. त्यामुळे काश्मीरमधील बर्फाने गोठलेले वातावरण ९९.६ अंश +१ अंश सेल्सिअस या मर्यादेमध्ये कायम ठेवले जाते. यासाठी मेंदूमधील तापमान नियंत्रित करणारे केंद्र काम करीत असते. अनेक तात्पुरत्या कारणांमुळे या केंद्राची क्षमता शिथिल झाल्यास शरीराचे तापमान या मर्यादेबाहेर जाते. आपण त्याला ताप म्हणतो. अनेक प्र्रकारचे जंतूसंसर्ग किंवा विषाणू संसर्ग हे तापाचे महत्त्वाचे कारण आहे. ताप कमी करणाऱ्या औषधांमुळे व ज्या कारणामुळे जंतूसंसर्ग झाला आहे, त्या मूळ कारणाचा इलाज केल्यावर परत शरीराचे तापमान कार्यक्षमतेने नियंत्रित केले जाते. या ताप आलेल्या कालावधीमध्ये आपल्या मुलाची काळजी कशी घ्यावी ते पाहूया.शरीराचे वाढलेले तापमान प्रत्येकवेळी शरीराला हानीकारक असते असे नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये शरीराच्या तापमानामध्ये होणारी वाढ शरीराला उपकारक असते. या वाढलेल्या तापमानामुळे जंतूंची वाढ रोखून धरली जाते. पांढऱ्या पेशी उत्तेजित झाल्याने त्या जंतूंशी सक्षमपणे मुकाबला करण्यास सज्ज होतात. तसेच रक्ताभिसरण क्रिया जलद झाल्याने या पेशी जंतूसंसर्गाच्या ठिकाणी त्वरेने पोहोचविल्या जातात. त्यामुळे असा अल्पप्रमाणामध्ये वाढलेला ताप औषधाद्वारे लगेच कमी करण्याची गरज नसते.अनेकदा असा ताप लगेच सर्व अंग ओल्या कपड्याने पुसून कमी करण्याची आवश्यकता नसते. अन्यथा थंडी वाजून ताप वाढू शकतो व सर्दी होऊ शकते. सर्वसाधारणपणे १०० अंश फॅरनहीटपर्यंत वाढलेल्या तापाला त्वरित औषधोपचाराची गरज नसते. या मर्यादेपलीकडे ताप गेल्यास बाळ कीरकीर करते, खाणे-पिणे कमी करते, अस्वस्थ होते. अशा वेळी पालकांनी केवळ डोक्याला अथवा पोटाला हात लावून ताप पाहण्यापेक्षा थर्मामीटरने दर दोन तासाने मुलाचे तापमान पाहून ताप कमी करणारे औषध डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणात घालावे. सर्वसाधारणपणे दिसून येणारा ताप हा विषाणूजन्य असल्याने तो तिसऱ्या, चौथ्या दिवसापासून उतरणीस लागतो व थांबून जातो. दरम्यानच्या काळात घाबरून जाऊन अनावश्यक रक्त, लघवीच्या चाचण्या करू नयेत. तसेच अँटिबायोटिक्सचा वापर करू नये. तीन-चार दिवसांनंतर ताप कायम राहिल्यास डॉक्टरी सल्ल्याने पुढील औषधोपचार करणे योग्य ठरेल.प्रत्येक आजाराचा कालावधी सर्वसाधारण असतो. लहान मुलांमधील बहुतेक आजार विषाणूजन्य असल्याने ते काही दिवसांमध्ये बरे होतात. त्यामुळे अशा प्रसंगी पालकांनी संयम ठेवल्यास अनावश्यक रक्तचाचण्या व अँटिबायोटिक्स वापर टाळता येईल. असे लहान आजार बरे होताना मुलाच्या प्रतिकारक्षमतेत वाढ करीत असल्याने जसे मुलांचे वय वाढते, त्याप्रमाणे मुले आजारी पडण्याचे प्रमाण कमी होत जाते. ज्या पालकांच्या घरी लहान मुले आहेत, त्यांनी घरामध्ये नेहमी थर्मामीटर व तापाचे औषध ठेवावे. तापाच्या कालावधीच्या तापमानाची दर तीन-चार तासाने नोंद ठेवून डॉक्टरांना रोगनिदानासाठी मदत करूया व जबाबदार पालक बनूया.- डॉ. मोहन पाटील