शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

ताप- बालस्वास्थ

By admin | Updated: February 21, 2017 23:49 IST

शरीराचे वाढलेले तापमान प्रत्येकवेळी शरीराला हानीकारक असते असे नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये शरीराच्या तापमानामध्ये होणारी वाढ शरीराला उपकारक असते

गेल्या काही लेखांमध्ये आपण बालआरोग्याबाबत प्राथमिक माहिती घेतली. आता बालरुग्णांच्या काही सर्वसाधारण तक्रारी व त्याबाबत पालकांनी घ्यावयाची काळजी जाणून घेऊया. डॉक्टरांकडे येणाऱ्या बहुतेक बालरुग्णांच्या पालकांची मुख्य तक्रार ताप ही असते. काही पालक आपल्या मुलाच्या तापाबाबत अतिसंवेदनशील असल्याने ताप असल्याची खात्रीदेखील न करता वारंवार ताप येत असल्याची तक्रार करीत असतात व वारंवार उपचार करीत असतात. बाह्य वातावरणामधील तापमानामध्ये बदल झाला तरी स्वत:च्या शरीराचे तापमान एका ठरावीक मर्यादेमध्ये नियंत्रित ठेवण्याची क्षमता मानवामध्ये असते. त्यामुळे काश्मीरमधील बर्फाने गोठलेले वातावरण ९९.६ अंश +१ अंश सेल्सिअस या मर्यादेमध्ये कायम ठेवले जाते. यासाठी मेंदूमधील तापमान नियंत्रित करणारे केंद्र काम करीत असते. अनेक तात्पुरत्या कारणांमुळे या केंद्राची क्षमता शिथिल झाल्यास शरीराचे तापमान या मर्यादेबाहेर जाते. आपण त्याला ताप म्हणतो. अनेक प्र्रकारचे जंतूसंसर्ग किंवा विषाणू संसर्ग हे तापाचे महत्त्वाचे कारण आहे. ताप कमी करणाऱ्या औषधांमुळे व ज्या कारणामुळे जंतूसंसर्ग झाला आहे, त्या मूळ कारणाचा इलाज केल्यावर परत शरीराचे तापमान कार्यक्षमतेने नियंत्रित केले जाते. या ताप आलेल्या कालावधीमध्ये आपल्या मुलाची काळजी कशी घ्यावी ते पाहूया.शरीराचे वाढलेले तापमान प्रत्येकवेळी शरीराला हानीकारक असते असे नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये शरीराच्या तापमानामध्ये होणारी वाढ शरीराला उपकारक असते. या वाढलेल्या तापमानामुळे जंतूंची वाढ रोखून धरली जाते. पांढऱ्या पेशी उत्तेजित झाल्याने त्या जंतूंशी सक्षमपणे मुकाबला करण्यास सज्ज होतात. तसेच रक्ताभिसरण क्रिया जलद झाल्याने या पेशी जंतूसंसर्गाच्या ठिकाणी त्वरेने पोहोचविल्या जातात. त्यामुळे असा अल्पप्रमाणामध्ये वाढलेला ताप औषधाद्वारे लगेच कमी करण्याची गरज नसते.अनेकदा असा ताप लगेच सर्व अंग ओल्या कपड्याने पुसून कमी करण्याची आवश्यकता नसते. अन्यथा थंडी वाजून ताप वाढू शकतो व सर्दी होऊ शकते. सर्वसाधारणपणे १०० अंश फॅरनहीटपर्यंत वाढलेल्या तापाला त्वरित औषधोपचाराची गरज नसते. या मर्यादेपलीकडे ताप गेल्यास बाळ कीरकीर करते, खाणे-पिणे कमी करते, अस्वस्थ होते. अशा वेळी पालकांनी केवळ डोक्याला अथवा पोटाला हात लावून ताप पाहण्यापेक्षा थर्मामीटरने दर दोन तासाने मुलाचे तापमान पाहून ताप कमी करणारे औषध डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणात घालावे. सर्वसाधारणपणे दिसून येणारा ताप हा विषाणूजन्य असल्याने तो तिसऱ्या, चौथ्या दिवसापासून उतरणीस लागतो व थांबून जातो. दरम्यानच्या काळात घाबरून जाऊन अनावश्यक रक्त, लघवीच्या चाचण्या करू नयेत. तसेच अँटिबायोटिक्सचा वापर करू नये. तीन-चार दिवसांनंतर ताप कायम राहिल्यास डॉक्टरी सल्ल्याने पुढील औषधोपचार करणे योग्य ठरेल.प्रत्येक आजाराचा कालावधी सर्वसाधारण असतो. लहान मुलांमधील बहुतेक आजार विषाणूजन्य असल्याने ते काही दिवसांमध्ये बरे होतात. त्यामुळे अशा प्रसंगी पालकांनी संयम ठेवल्यास अनावश्यक रक्तचाचण्या व अँटिबायोटिक्स वापर टाळता येईल. असे लहान आजार बरे होताना मुलाच्या प्रतिकारक्षमतेत वाढ करीत असल्याने जसे मुलांचे वय वाढते, त्याप्रमाणे मुले आजारी पडण्याचे प्रमाण कमी होत जाते. ज्या पालकांच्या घरी लहान मुले आहेत, त्यांनी घरामध्ये नेहमी थर्मामीटर व तापाचे औषध ठेवावे. तापाच्या कालावधीच्या तापमानाची दर तीन-चार तासाने नोंद ठेवून डॉक्टरांना रोगनिदानासाठी मदत करूया व जबाबदार पालक बनूया.- डॉ. मोहन पाटील