शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

ताप- बालस्वास्थ

By admin | Updated: February 21, 2017 23:49 IST

शरीराचे वाढलेले तापमान प्रत्येकवेळी शरीराला हानीकारक असते असे नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये शरीराच्या तापमानामध्ये होणारी वाढ शरीराला उपकारक असते

गेल्या काही लेखांमध्ये आपण बालआरोग्याबाबत प्राथमिक माहिती घेतली. आता बालरुग्णांच्या काही सर्वसाधारण तक्रारी व त्याबाबत पालकांनी घ्यावयाची काळजी जाणून घेऊया. डॉक्टरांकडे येणाऱ्या बहुतेक बालरुग्णांच्या पालकांची मुख्य तक्रार ताप ही असते. काही पालक आपल्या मुलाच्या तापाबाबत अतिसंवेदनशील असल्याने ताप असल्याची खात्रीदेखील न करता वारंवार ताप येत असल्याची तक्रार करीत असतात व वारंवार उपचार करीत असतात. बाह्य वातावरणामधील तापमानामध्ये बदल झाला तरी स्वत:च्या शरीराचे तापमान एका ठरावीक मर्यादेमध्ये नियंत्रित ठेवण्याची क्षमता मानवामध्ये असते. त्यामुळे काश्मीरमधील बर्फाने गोठलेले वातावरण ९९.६ अंश +१ अंश सेल्सिअस या मर्यादेमध्ये कायम ठेवले जाते. यासाठी मेंदूमधील तापमान नियंत्रित करणारे केंद्र काम करीत असते. अनेक तात्पुरत्या कारणांमुळे या केंद्राची क्षमता शिथिल झाल्यास शरीराचे तापमान या मर्यादेबाहेर जाते. आपण त्याला ताप म्हणतो. अनेक प्र्रकारचे जंतूसंसर्ग किंवा विषाणू संसर्ग हे तापाचे महत्त्वाचे कारण आहे. ताप कमी करणाऱ्या औषधांमुळे व ज्या कारणामुळे जंतूसंसर्ग झाला आहे, त्या मूळ कारणाचा इलाज केल्यावर परत शरीराचे तापमान कार्यक्षमतेने नियंत्रित केले जाते. या ताप आलेल्या कालावधीमध्ये आपल्या मुलाची काळजी कशी घ्यावी ते पाहूया.शरीराचे वाढलेले तापमान प्रत्येकवेळी शरीराला हानीकारक असते असे नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये शरीराच्या तापमानामध्ये होणारी वाढ शरीराला उपकारक असते. या वाढलेल्या तापमानामुळे जंतूंची वाढ रोखून धरली जाते. पांढऱ्या पेशी उत्तेजित झाल्याने त्या जंतूंशी सक्षमपणे मुकाबला करण्यास सज्ज होतात. तसेच रक्ताभिसरण क्रिया जलद झाल्याने या पेशी जंतूसंसर्गाच्या ठिकाणी त्वरेने पोहोचविल्या जातात. त्यामुळे असा अल्पप्रमाणामध्ये वाढलेला ताप औषधाद्वारे लगेच कमी करण्याची गरज नसते.अनेकदा असा ताप लगेच सर्व अंग ओल्या कपड्याने पुसून कमी करण्याची आवश्यकता नसते. अन्यथा थंडी वाजून ताप वाढू शकतो व सर्दी होऊ शकते. सर्वसाधारणपणे १०० अंश फॅरनहीटपर्यंत वाढलेल्या तापाला त्वरित औषधोपचाराची गरज नसते. या मर्यादेपलीकडे ताप गेल्यास बाळ कीरकीर करते, खाणे-पिणे कमी करते, अस्वस्थ होते. अशा वेळी पालकांनी केवळ डोक्याला अथवा पोटाला हात लावून ताप पाहण्यापेक्षा थर्मामीटरने दर दोन तासाने मुलाचे तापमान पाहून ताप कमी करणारे औषध डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणात घालावे. सर्वसाधारणपणे दिसून येणारा ताप हा विषाणूजन्य असल्याने तो तिसऱ्या, चौथ्या दिवसापासून उतरणीस लागतो व थांबून जातो. दरम्यानच्या काळात घाबरून जाऊन अनावश्यक रक्त, लघवीच्या चाचण्या करू नयेत. तसेच अँटिबायोटिक्सचा वापर करू नये. तीन-चार दिवसांनंतर ताप कायम राहिल्यास डॉक्टरी सल्ल्याने पुढील औषधोपचार करणे योग्य ठरेल.प्रत्येक आजाराचा कालावधी सर्वसाधारण असतो. लहान मुलांमधील बहुतेक आजार विषाणूजन्य असल्याने ते काही दिवसांमध्ये बरे होतात. त्यामुळे अशा प्रसंगी पालकांनी संयम ठेवल्यास अनावश्यक रक्तचाचण्या व अँटिबायोटिक्स वापर टाळता येईल. असे लहान आजार बरे होताना मुलाच्या प्रतिकारक्षमतेत वाढ करीत असल्याने जसे मुलांचे वय वाढते, त्याप्रमाणे मुले आजारी पडण्याचे प्रमाण कमी होत जाते. ज्या पालकांच्या घरी लहान मुले आहेत, त्यांनी घरामध्ये नेहमी थर्मामीटर व तापाचे औषध ठेवावे. तापाच्या कालावधीच्या तापमानाची दर तीन-चार तासाने नोंद ठेवून डॉक्टरांना रोगनिदानासाठी मदत करूया व जबाबदार पालक बनूया.- डॉ. मोहन पाटील