शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
5
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
8
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
9
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
10
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
11
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
12
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
13
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
14
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
15
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
16
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
17
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
18
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
19
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
20
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

ताप- बालस्वास्थ

By admin | Updated: February 21, 2017 23:49 IST

शरीराचे वाढलेले तापमान प्रत्येकवेळी शरीराला हानीकारक असते असे नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये शरीराच्या तापमानामध्ये होणारी वाढ शरीराला उपकारक असते

गेल्या काही लेखांमध्ये आपण बालआरोग्याबाबत प्राथमिक माहिती घेतली. आता बालरुग्णांच्या काही सर्वसाधारण तक्रारी व त्याबाबत पालकांनी घ्यावयाची काळजी जाणून घेऊया. डॉक्टरांकडे येणाऱ्या बहुतेक बालरुग्णांच्या पालकांची मुख्य तक्रार ताप ही असते. काही पालक आपल्या मुलाच्या तापाबाबत अतिसंवेदनशील असल्याने ताप असल्याची खात्रीदेखील न करता वारंवार ताप येत असल्याची तक्रार करीत असतात व वारंवार उपचार करीत असतात. बाह्य वातावरणामधील तापमानामध्ये बदल झाला तरी स्वत:च्या शरीराचे तापमान एका ठरावीक मर्यादेमध्ये नियंत्रित ठेवण्याची क्षमता मानवामध्ये असते. त्यामुळे काश्मीरमधील बर्फाने गोठलेले वातावरण ९९.६ अंश +१ अंश सेल्सिअस या मर्यादेमध्ये कायम ठेवले जाते. यासाठी मेंदूमधील तापमान नियंत्रित करणारे केंद्र काम करीत असते. अनेक तात्पुरत्या कारणांमुळे या केंद्राची क्षमता शिथिल झाल्यास शरीराचे तापमान या मर्यादेबाहेर जाते. आपण त्याला ताप म्हणतो. अनेक प्र्रकारचे जंतूसंसर्ग किंवा विषाणू संसर्ग हे तापाचे महत्त्वाचे कारण आहे. ताप कमी करणाऱ्या औषधांमुळे व ज्या कारणामुळे जंतूसंसर्ग झाला आहे, त्या मूळ कारणाचा इलाज केल्यावर परत शरीराचे तापमान कार्यक्षमतेने नियंत्रित केले जाते. या ताप आलेल्या कालावधीमध्ये आपल्या मुलाची काळजी कशी घ्यावी ते पाहूया.शरीराचे वाढलेले तापमान प्रत्येकवेळी शरीराला हानीकारक असते असे नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये शरीराच्या तापमानामध्ये होणारी वाढ शरीराला उपकारक असते. या वाढलेल्या तापमानामुळे जंतूंची वाढ रोखून धरली जाते. पांढऱ्या पेशी उत्तेजित झाल्याने त्या जंतूंशी सक्षमपणे मुकाबला करण्यास सज्ज होतात. तसेच रक्ताभिसरण क्रिया जलद झाल्याने या पेशी जंतूसंसर्गाच्या ठिकाणी त्वरेने पोहोचविल्या जातात. त्यामुळे असा अल्पप्रमाणामध्ये वाढलेला ताप औषधाद्वारे लगेच कमी करण्याची गरज नसते.अनेकदा असा ताप लगेच सर्व अंग ओल्या कपड्याने पुसून कमी करण्याची आवश्यकता नसते. अन्यथा थंडी वाजून ताप वाढू शकतो व सर्दी होऊ शकते. सर्वसाधारणपणे १०० अंश फॅरनहीटपर्यंत वाढलेल्या तापाला त्वरित औषधोपचाराची गरज नसते. या मर्यादेपलीकडे ताप गेल्यास बाळ कीरकीर करते, खाणे-पिणे कमी करते, अस्वस्थ होते. अशा वेळी पालकांनी केवळ डोक्याला अथवा पोटाला हात लावून ताप पाहण्यापेक्षा थर्मामीटरने दर दोन तासाने मुलाचे तापमान पाहून ताप कमी करणारे औषध डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणात घालावे. सर्वसाधारणपणे दिसून येणारा ताप हा विषाणूजन्य असल्याने तो तिसऱ्या, चौथ्या दिवसापासून उतरणीस लागतो व थांबून जातो. दरम्यानच्या काळात घाबरून जाऊन अनावश्यक रक्त, लघवीच्या चाचण्या करू नयेत. तसेच अँटिबायोटिक्सचा वापर करू नये. तीन-चार दिवसांनंतर ताप कायम राहिल्यास डॉक्टरी सल्ल्याने पुढील औषधोपचार करणे योग्य ठरेल.प्रत्येक आजाराचा कालावधी सर्वसाधारण असतो. लहान मुलांमधील बहुतेक आजार विषाणूजन्य असल्याने ते काही दिवसांमध्ये बरे होतात. त्यामुळे अशा प्रसंगी पालकांनी संयम ठेवल्यास अनावश्यक रक्तचाचण्या व अँटिबायोटिक्स वापर टाळता येईल. असे लहान आजार बरे होताना मुलाच्या प्रतिकारक्षमतेत वाढ करीत असल्याने जसे मुलांचे वय वाढते, त्याप्रमाणे मुले आजारी पडण्याचे प्रमाण कमी होत जाते. ज्या पालकांच्या घरी लहान मुले आहेत, त्यांनी घरामध्ये नेहमी थर्मामीटर व तापाचे औषध ठेवावे. तापाच्या कालावधीच्या तापमानाची दर तीन-चार तासाने नोंद ठेवून डॉक्टरांना रोगनिदानासाठी मदत करूया व जबाबदार पालक बनूया.- डॉ. मोहन पाटील