विमा कंपनीकडून शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST2021-09-10T04:30:24+5:302021-09-10T04:30:24+5:30

कुरुंदवाड : महापुरात पीक नुकसानीचा विमा कंपनीकडून पंचनामा होऊन महिना उलटला तरी अद्याप विम्याची रक्कम मिळाली नाही. एकीकडे पूरग्रस्तांच्या ...

Farmers wind up from insurance company | विमा कंपनीकडून शेतकरी वाऱ्यावर

विमा कंपनीकडून शेतकरी वाऱ्यावर

कुरुंदवाड : महापुरात पीक नुकसानीचा विमा कंपनीकडून पंचनामा होऊन महिना उलटला तरी अद्याप विम्याची रक्कम मिळाली नाही. एकीकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडून टाळाटाळ होत असताना विमा कंपनीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त आहे.

जुलै महिन्यात आलेल्या महापुरात शेतीच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती नुकसान झालेल्या व पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून पीक नुकसानभरपाई दिली जाते.

येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनसह इतर पिकांची रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे वेळेत विम्याची रक्कम भरून विमा उतरविला होता. महापुरात पिके गेल्याने विमा कंपनीकडून पंचनामाही केला आहे. मात्र, पंचनामा होऊन महिना उलटला तरी अद्याप विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महिना उलटला तरी विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. शासनाबरोबर विमा कंपनीही शेतकऱ्यांना चिंबवत असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत

आहे.

चौकट

रिलायन्स इन्सुरन्स कंपनीकडून सोयाबीनसाठी एकरी ४५० रुपये विमा रक्कम भरून घेतली असून, पूर्णपणे पीक गेलेल्या शेतकऱ्याला एकरी अठरा हजार रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे.

चौकट

पंचनामा करताना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्यात २५ टक्के, तर उर्वरित रक्कम दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची शासनाकडून अथवा विमा कंपन्यांकडून एक रुपयाही रक्कम मिळाली नाही.

-महवीर पाटील,

प्रगतशील शेतकरी, कुरुंदवाड

Web Title: Farmers wind up from insurance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.