शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

तुळशी-धामणीतील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 16:02 IST

कोरोनाच्या महामारीला सामोरे जात असतानाच शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट ठाकले आहे. महिनाभरापूर्वी पेरणी केलेली नागली पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत, तर भात टोकणीचीही अवस्था फार दयनीय झाली आहे. शेकडो हेक्टरवरील नागली ( नाचणा) पिकांबरोबर भातशेती ही फसली असून, परिसरातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे.

ठळक मुद्दे नागली पिकांसह भात टोकणीची पिके फसलीकोरोनाच्या महामारीमध्ये शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट

श्रीकांत ऱ्हायकरधामोड - कोरोनाच्या महामारीला सामोरे जात असतानाच शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट ठाकले आहे. महिनाभरापूर्वी पेरणी केलेली नागली पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत, तर भात टोकणीचीही अवस्था फार दयनीय झाली आहे. शेकडो हेक्टरवरील नागली ( नाचणा) पिकांबरोबर भातशेती ही फसली असून, परिसरातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे.पावसाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांचे जगणे मेटाकुटीला आले आहे. कोरोनाशी दोन हात करताना विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न करत पदरमोड करून खरेदी केलेले बियाणे पावसाअभावी शेतातच वाळून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.उसनवारी करून भात बियाणे खरेदी करून शेतीत टाकली. सुरवातीचा नक्षत्रात तेवढी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला. पण पेरणी नंतर मात्र पावसाने चांगलीच दडी मारली. इंजन, मोटारपंपाच्या सहाय्याने रोप लागण केली. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून एकही पाऊस न लागल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील लागण केलेल्या रोप लागणी बरोबर भात टोकण व नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सद्यातरी रोप लागण वगळता नाचणी,  भात टोकण, मिरची, भुईमूग यासारखी पिके पूर्णतः वाळली आहेत. येत्या नक्षत्रात चांगला पाऊस झालाच तर दुबार पेरणी करूनच शेतकऱ्यांना पिके घ्यावी लागतील. पण तेही पावसाच्या पाण्यावर तो कितपत लागेल हे सांगता येणार नाही. पण शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला हे नक्की. कृषी विभाग याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार का ? असे प्रश्न विचारला जात आहे .

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसkolhapurकोल्हापूर