शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

तुळशी-धामणीतील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 16:02 IST

कोरोनाच्या महामारीला सामोरे जात असतानाच शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट ठाकले आहे. महिनाभरापूर्वी पेरणी केलेली नागली पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत, तर भात टोकणीचीही अवस्था फार दयनीय झाली आहे. शेकडो हेक्टरवरील नागली ( नाचणा) पिकांबरोबर भातशेती ही फसली असून, परिसरातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे.

ठळक मुद्दे नागली पिकांसह भात टोकणीची पिके फसलीकोरोनाच्या महामारीमध्ये शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट

श्रीकांत ऱ्हायकरधामोड - कोरोनाच्या महामारीला सामोरे जात असतानाच शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट ठाकले आहे. महिनाभरापूर्वी पेरणी केलेली नागली पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत, तर भात टोकणीचीही अवस्था फार दयनीय झाली आहे. शेकडो हेक्टरवरील नागली ( नाचणा) पिकांबरोबर भातशेती ही फसली असून, परिसरातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे.पावसाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांचे जगणे मेटाकुटीला आले आहे. कोरोनाशी दोन हात करताना विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न करत पदरमोड करून खरेदी केलेले बियाणे पावसाअभावी शेतातच वाळून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.उसनवारी करून भात बियाणे खरेदी करून शेतीत टाकली. सुरवातीचा नक्षत्रात तेवढी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला. पण पेरणी नंतर मात्र पावसाने चांगलीच दडी मारली. इंजन, मोटारपंपाच्या सहाय्याने रोप लागण केली. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून एकही पाऊस न लागल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील लागण केलेल्या रोप लागणी बरोबर भात टोकण व नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सद्यातरी रोप लागण वगळता नाचणी,  भात टोकण, मिरची, भुईमूग यासारखी पिके पूर्णतः वाळली आहेत. येत्या नक्षत्रात चांगला पाऊस झालाच तर दुबार पेरणी करूनच शेतकऱ्यांना पिके घ्यावी लागतील. पण तेही पावसाच्या पाण्यावर तो कितपत लागेल हे सांगता येणार नाही. पण शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला हे नक्की. कृषी विभाग याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार का ? असे प्रश्न विचारला जात आहे .

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसkolhapurकोल्हापूर