शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

उत्पन्नाबरोबरच हमीभावामुळे शेतकऱ्यांचा उसाकडेच कल, पर्यायी पिकांतून नुकसानच अधिक 

By राजाराम लोंढे | Updated: November 10, 2023 16:59 IST

कारखानदारांचा काटा काढण्यासाठी शेतकरी ऊस कमी करणार का?

राजाराम लोंढेकोल्हापूर : उसाएवढे उत्पन्न देणारे व हमीभावाचे इतर पिके सध्या तरी शेतकऱ्यांसमोर नाही. केळी, भाजीपाल्यासह इतर पिकांतून नुकसानच अधिक होत असल्याने शेतकऱ्यांचा कल ऊस पिकांकडेच अधिक आहे. त्यामुळे ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांचा काटा काढण्यासाठी ऊस कमी करण्याचा सल्ला दिला असला तरी तो शेतकऱ्यांच्या पचनी पडणार का? हे आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ऊस दराचे आंदोलन पेटले असून, मागील हंगामातील चारशे रुपयांसाठी ‘स्वाभिमानी’ने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत कारखानदारांवर आसूड ओढताना उसाच्या लागणी न करण्याचा सल्ला राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. या सल्ल्याची बुधवारी शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात कोल्हापूर जिल्ह्याच्या हवामानावर पीक पद्धती ठरलेली आहे. बारापैकी दहा तालुक्यात जोरदार पाऊस तर दोन तालुके कमी पावसाचे आहेत. त्यानुसार पिकांची लागवड केली जाते. येथे ४ लाख ४८ हजार हेक्टरपैकी जवळपास ४ लाख हेक्टर खरिपाचे तर २५ हजार हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे. यातील सुमारे १ लाख ८६ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो.दर कमी अधिक झाला तरी त्याची गाळप करणारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात व एफआरपीप्रमाणे दर मिळण्याची हमी असते. इतर पिकांसाठी बाजारपेठ शोधावी लागते, तिथे अपेक्षित दर मिळेल याची खात्री नाही. त्यात जिल्ह्यात सरासरी १७५० मिली मीटर पाऊस पडतो. अशा परिस्थितीत इतर पिकांतून चांगल्या उत्पन्न मिळत नाही. शेतकऱ्यांनी यापूर्वी केळी, भाजीपाल्यासह इतर पिके काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यात मोठे नुकसान सोसावे लागल्याने ते शेतकरी पुन्हा उसाकडे वळले आहेत. आता राजू शेट्टी यांनी ऊस कमी करण्याचा सल्ला दिला असला तरी शेतकऱ्यांच्या पचनी पडणार का? हे पहावे लागणार आहे.नदी बुडीत क्षेत्रात इतर पिके तग धरणार का?जिल्ह्यातील प्रमुख नद्या व ओढ्याच्या पुराच्या पाण्यात तब्बल ८० हजार हेक्टर पूर बाधित क्षेत्र आहे. या सर्व क्षेत्रात इतर कोणतेही पीक तग धरणार नाही, त्यामुळेच ऊस पिकाशिवाय येथे दुसरे पीक येऊ शकत नाही.

ऊसच कसा परवडतो...

  • दराची हमी, दराला कायदेशीर संरक्षण मिळते.
  • प्रतिकूल परिस्थितीत येणारे पीक
  • रोगराई, महापुरामुळे नुकसान झाले तरी किमान ५० टक्के उत्पन्नाची हमी
  • मार्केट उपलब्ध असल्याने त्यासाठी मार्केटिंगची गरज नाही.
  • बाजारात घेऊन जावे लागत नाही, कारखाने थेट शिवारात येऊन उसाची उचल करतात.

भाजीपाल्यासह इतर पिके यासाठी अडचणीची

  • बाजारपेठ शोधावी लागते
  • व्यापाऱ्यांच्या हातात दर
  • अनिश्चित भावामुळे नुकसान
  • अतिपावसात कडधान्य, भाजीपाला टिकत नाही.
  • रोगराई व श्रम अधिक घेऊन उत्पन्न कमी
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी