शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

Kolhapur News: विकासवाडीतील औद्योगिक वसाहतीस शेतकऱ्यांचा विरोध, ..अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 13:06 IST

..त्यामुळे औद्योगिकीकरणास आमचा विरोध

कणेरी : विकासवाडी येथे नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी देण्यास येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. जर सक्तीने भूसंपादन केले तर जन आंदोलन उभारू असा इशारा नेर्ली विकासवाडीचे माजी सरपंच व गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. पत्रकात म्हटले आहे की, विकासवाडी येथे औद्योगिक वसाहत उभी करण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच केली. या वसाहतीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, या वसाहतीसाठी जमिनी देण्यास आमचा विरोध आहे. नेर्ली विकासवाडी येथील बहुतांश जमिनी सुपीक व ओलिताखालील आहेत. येथे अल्पभूधारक शेतकरी जास्त आहेत. त्यामुळे बागायत जमिनी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. नेर्ली येथे गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतजमिनी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. २०१४ साली तत्कालीन गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे नवीन औद्योगिक वसाहतीची पुढील प्रक्रिया थांबवली होती. त्यामुळे आता सक्तीने भूसंपादन केल्यास जन अंदोलन उभे केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.जनावरांसाठी चारा कुठून आणणार?नेर्ली विकासवाडी येथे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पडसर जमिनीचा वापर चराऊ कुरणे म्हणून होत आहे. नवीन औद्योगिक वसाहत तयार झाली तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील औद्योगिकीकरणास आमचा विरोध असल्याचे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसीFarmerशेतकरी