शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसमवेत शेतकरी संघटनांची आज बेळगावात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 12:09 IST

महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकातील साखर कारखानदारांनीही ऊसाला एफआरपी+२०० असा  दर दयावा, अशी मागणी स्वाभिमानीसह कर्नाटकातील शेतकरी संघटनांनी केली अाहे.

ठळक मुद्देअशी माहिती 'स्वाभिमानी'चे राज्य सचिव राजेंद्र गडयान्न‍ावर यांनी  येथील पत्रकार परिषदेत दिली.चंदगड तालुक्यातील जास्तीतजास्त ऊस हा कर्नाटकातील हुदली, शिवशक्ती आदी क‍ारखान्यांना पाठवला :उत्तर कर्नाटकातील ऊसदराचा प्रश्न, एफआरपी + २०० ची मागणी

गडहिंग्लज :  महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकातील साखर कारखानदारांनीही ऊसाला एफआरपी+२०० असा  दर दयावा, अशी मागणी स्वाभिमानीसह कर्नाटकातील शेतकरी संघटनांनी केली अाहे.त्यासंदर्भातील चर्चेसाठी सोमवार( दि. १९ )रोजी बेळगाव येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत बैठकीचे होणार आहे, अशी माहिती 'स्वाभिमानी'चे राज्य सचिव राजेंद्र गडयान्न‍ावर यांनी  येथील पत्रकार परिषदेत दिली.       

  गडयान्नावर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ऊसाची रिकव्हरी आहे त्याचप्रमाणे उत्तर कर्नाटकातील ऊसाची रिकव्हरी चांगली आहे. परंतु तेथील कारखानदारही ऊस उत्पादकांचे शोषण करीत अाहेत. महाराष्ट्रातील ऊसदराच्या अांदोलनामुळे येथील शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागला आहे.त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.       

कर्नाटकातील बेडकिहाळ, मुधोळ, निपाणी, नणदी, अथणी, हुदली, बागलकोट, जमखंडी अादी सीमाभागातील कारखान्यांमधुन दररोज १ लाख ४० हजार टनाचे गाळप होते. त्या कारखान्यांना महाराष्ट्रातील कोल्हापुर व सांगली जिल्ह्यातील सीमेवरील ऊस  मोठ्या प्रमाणात  जातो.   

चंदगड तालुक्यातील जास्तीतजास्त ऊस हा कर्नाटकातील हुदली, शिवशक्ती आदी क‍ारखान्यांना पाठवला जातो.त्यामुळे कर्नाटकासह महाराष्ट्रातील ज्या शेतकरी बांधवांनी कर्नाटकातील कारखान्याना ऊस पाठवला आहे त्यांनाही योग्य एफआरपी+२०० असा दर मिळालाच पाहिज. यासाठी स्वाभिमानी संघटना व रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली  सीमाभागातील शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखविण्याची गरज आहे.

   गेल्या गळीत हंगामातील १०० कोटींच्या थकीत ऊसबीलासह चालु गळीत हंगामात एफअारपी+२०० दर दयावा अशी मागणी या बैठकीत करणार आहोत. बेळगाव येथील विधानसौध येथे होणार्‍या बैठकीसाठी  कर्नाटकासह महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  यावेळी आण्णासाहेब पाटील, बसवराज मुत्नाळे, सागर ग्वाडी, बसवराज संभाजी, दौलतराव देसाई आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर