शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

साडे तीन हजार उचलीसाठी शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:02 IST

मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसास प्रतिटन ३२०० रूपये अंतिम दर व यंदाच्या हंगामासाठी साडे तीन हजार पहिली उचल विभागातील साखर कारखान्यांनी द्यावी. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली. ऊसाच्या राज्यबंदी निर्णयाचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देसाखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने ऊसाच्या राज्यबंदीचा संघटनेच्या वतीने निषेध वजन तपासणीसाठी पथके

कोल्हापूर ,दि. २५ :  मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसास प्रतिटन ३२०० रूपये अंतिम दर व यंदाच्या हंगामासाठी साडे तीन हजार पहिली उचल विभागातील साखर कारखान्यांनी द्यावी. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली. ऊसाच्या राज्यबंदी निर्णयाचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

संपुर्ण देशात साखर एकाच दराने विक्री होते, गुजरात मधील साखर कारखाने १२.५० टक्के उताऱ्या ला ४४४१ रूपये प्रतिटन दर देत असतील तर महाराष्ट्रातील  कारखान्यांना काय झाले. कोल्हापूर विभागातील कारखान्यांनी आतापर्यंत २८०० ते ३ हजार रूपयांपर्यंत दर दिला आहे.

‘हुतात्मा’ कारखान्याने ३३५५ रूपये उच्चांकी दर दिाला मग त्यापेक्षा जास्त उतारा असणाऱ्या  कोल्हापूरातील कारखान्यांना अडचण काय? याबाबत साखर सहसंचालक म्हणून आपण काय केले? अशी विचारणा युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांनी केली. मागील हंगामातील कमी दिलेला दर तातडीने द्यावा व या हंगामासाठी साडे तीन हजार रूपये पहिली उचल द्या अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला.

पिकवलेला ऊस कोठे घालायचा हा आम्हाला घटनेने हक्क दिला आहे. पण राज्य सरकार ऊसबंदी करून शेतकऱ्याना दुहेरी अडचणीत आणत आहे. पोलीसांनी हस्तक्षेप केला तर पोलीस चौक्या उध्दवस्त केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही शिंदे यांनी दिला. मागणीचे निवेदन प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांना देण्यात आले. यावेळी महादेव कोरे, अजित पाटील, आदम मुजावर, मुन्ना सय्यद, हणमंतराव पाटील, गुणाजी शेलार, टी. आर. पाटील आदी उपस्थित होते.

वजन तपासणीसाठी पथकेसाखर कारखाने वजनाच्या माध्यमातून शेतकऱ्याची लुट करत आहेत. त्यांच्यावर कारवाई साठी काय केले अशी विचारणा केल्यानंतर यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केल्याचे रावल यांनी सांगितले.कर्जमाफीचा तमाशाराज्य सरकारने ऊस दरापाठोपाठ आता कर्जमाफीचा तमाशा सुरू केला आहे. नेमके काय करत आहे हे त्यांनाच कळत नसल्याची टीका महादेव कोरे यांनी केली. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीChakka jamचक्काजाम