शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

साडे तीन हजार उचलीसाठी शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:02 IST

मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसास प्रतिटन ३२०० रूपये अंतिम दर व यंदाच्या हंगामासाठी साडे तीन हजार पहिली उचल विभागातील साखर कारखान्यांनी द्यावी. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली. ऊसाच्या राज्यबंदी निर्णयाचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देसाखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने ऊसाच्या राज्यबंदीचा संघटनेच्या वतीने निषेध वजन तपासणीसाठी पथके

कोल्हापूर ,दि. २५ :  मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसास प्रतिटन ३२०० रूपये अंतिम दर व यंदाच्या हंगामासाठी साडे तीन हजार पहिली उचल विभागातील साखर कारखान्यांनी द्यावी. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली. ऊसाच्या राज्यबंदी निर्णयाचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

संपुर्ण देशात साखर एकाच दराने विक्री होते, गुजरात मधील साखर कारखाने १२.५० टक्के उताऱ्या ला ४४४१ रूपये प्रतिटन दर देत असतील तर महाराष्ट्रातील  कारखान्यांना काय झाले. कोल्हापूर विभागातील कारखान्यांनी आतापर्यंत २८०० ते ३ हजार रूपयांपर्यंत दर दिला आहे.

‘हुतात्मा’ कारखान्याने ३३५५ रूपये उच्चांकी दर दिाला मग त्यापेक्षा जास्त उतारा असणाऱ्या  कोल्हापूरातील कारखान्यांना अडचण काय? याबाबत साखर सहसंचालक म्हणून आपण काय केले? अशी विचारणा युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांनी केली. मागील हंगामातील कमी दिलेला दर तातडीने द्यावा व या हंगामासाठी साडे तीन हजार रूपये पहिली उचल द्या अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला.

पिकवलेला ऊस कोठे घालायचा हा आम्हाला घटनेने हक्क दिला आहे. पण राज्य सरकार ऊसबंदी करून शेतकऱ्याना दुहेरी अडचणीत आणत आहे. पोलीसांनी हस्तक्षेप केला तर पोलीस चौक्या उध्दवस्त केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही शिंदे यांनी दिला. मागणीचे निवेदन प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांना देण्यात आले. यावेळी महादेव कोरे, अजित पाटील, आदम मुजावर, मुन्ना सय्यद, हणमंतराव पाटील, गुणाजी शेलार, टी. आर. पाटील आदी उपस्थित होते.

वजन तपासणीसाठी पथकेसाखर कारखाने वजनाच्या माध्यमातून शेतकऱ्याची लुट करत आहेत. त्यांच्यावर कारवाई साठी काय केले अशी विचारणा केल्यानंतर यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केल्याचे रावल यांनी सांगितले.कर्जमाफीचा तमाशाराज्य सरकारने ऊस दरापाठोपाठ आता कर्जमाफीचा तमाशा सुरू केला आहे. नेमके काय करत आहे हे त्यांनाच कळत नसल्याची टीका महादेव कोरे यांनी केली. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीChakka jamचक्काजाम