शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

साडे तीन हजार उचलीसाठी शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:02 IST

मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसास प्रतिटन ३२०० रूपये अंतिम दर व यंदाच्या हंगामासाठी साडे तीन हजार पहिली उचल विभागातील साखर कारखान्यांनी द्यावी. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली. ऊसाच्या राज्यबंदी निर्णयाचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देसाखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने ऊसाच्या राज्यबंदीचा संघटनेच्या वतीने निषेध वजन तपासणीसाठी पथके

कोल्हापूर ,दि. २५ :  मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसास प्रतिटन ३२०० रूपये अंतिम दर व यंदाच्या हंगामासाठी साडे तीन हजार पहिली उचल विभागातील साखर कारखान्यांनी द्यावी. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली. ऊसाच्या राज्यबंदी निर्णयाचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

संपुर्ण देशात साखर एकाच दराने विक्री होते, गुजरात मधील साखर कारखाने १२.५० टक्के उताऱ्या ला ४४४१ रूपये प्रतिटन दर देत असतील तर महाराष्ट्रातील  कारखान्यांना काय झाले. कोल्हापूर विभागातील कारखान्यांनी आतापर्यंत २८०० ते ३ हजार रूपयांपर्यंत दर दिला आहे.

‘हुतात्मा’ कारखान्याने ३३५५ रूपये उच्चांकी दर दिाला मग त्यापेक्षा जास्त उतारा असणाऱ्या  कोल्हापूरातील कारखान्यांना अडचण काय? याबाबत साखर सहसंचालक म्हणून आपण काय केले? अशी विचारणा युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांनी केली. मागील हंगामातील कमी दिलेला दर तातडीने द्यावा व या हंगामासाठी साडे तीन हजार रूपये पहिली उचल द्या अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला.

पिकवलेला ऊस कोठे घालायचा हा आम्हाला घटनेने हक्क दिला आहे. पण राज्य सरकार ऊसबंदी करून शेतकऱ्याना दुहेरी अडचणीत आणत आहे. पोलीसांनी हस्तक्षेप केला तर पोलीस चौक्या उध्दवस्त केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही शिंदे यांनी दिला. मागणीचे निवेदन प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांना देण्यात आले. यावेळी महादेव कोरे, अजित पाटील, आदम मुजावर, मुन्ना सय्यद, हणमंतराव पाटील, गुणाजी शेलार, टी. आर. पाटील आदी उपस्थित होते.

वजन तपासणीसाठी पथकेसाखर कारखाने वजनाच्या माध्यमातून शेतकऱ्याची लुट करत आहेत. त्यांच्यावर कारवाई साठी काय केले अशी विचारणा केल्यानंतर यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केल्याचे रावल यांनी सांगितले.कर्जमाफीचा तमाशाराज्य सरकारने ऊस दरापाठोपाठ आता कर्जमाफीचा तमाशा सुरू केला आहे. नेमके काय करत आहे हे त्यांनाच कळत नसल्याची टीका महादेव कोरे यांनी केली. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीChakka jamचक्काजाम