शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शेतीसाठी दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी, मात्र नेमक्या अडचणी काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 12:27 IST

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू

विश्वास पाटीलकोल्हापूर : मागणीच्या तुलनेत होत असलेला कमी पुरवठा हेच शेती पंपांना दिवसा वीज देण्याला मुख्य अडसर असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शेतीला दिवसा वीज पुरवठा का केला जात नाही हे ‘लोकमत’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याचा त्रास कसा कमी होईल, असा प्रयत्न होण्याची गरज आहे.महाराष्ट्रात सध्या ८० टक्के वीज निर्मिती हे कोळशापासून होते. उर्वरित वीस टक्के ही पाण्यापासून, सोलर व पवनचक्क्यापासून होते. कोळशाच्या दराशी विजेचा दर जोडल्यास प्रति युनिट ५ रुपये ५० पैसे दराने वीज खरेदी करावी लागेल; परंतु महावितरण शेतीसाठी ही वीज सव्वा ते दीड रुपयांनी उपलब्ध करून देते.

सध्या महावितरणची २० ते २३ हजार मेगावॅट वीज पुरवठ्याची क्षमता आहे; परंतु ही मागणी सायंकाळी ६ ते रात्री १० या काळात ४० हजार मेगावॅटपर्यंत जाते. अशा वेळी भारनियमन करणे किंवा टप्पे करून वीज पुरवठा करण्याशिवाय दुसरा मार्गच नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे.पाणी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचा साठा करता येतो तसा विजेचा करता येत नाही. कोणत्या भागात कोणत्या काळात कोणत्या ग्राहकांचे भारनियमन करावे, याचा निर्णय कळवा (जि. ठाणे) येथील लोड डिस्पॅच सेंटरमधून होतो. भारनियमनाचे वेळापत्रक ठरवताना ते पूर्ण राज्यासाठी केले जाते. त्यामुळे एका जिल्ह्याला त्यातून बाहेर काढणे शक्य नाही.

दिवसा वीज पुरवठा करायचा झाल्यास खासगी कंपन्याकडून जास्त दराने वीज खरेदी करावी लागेल व ती कृषी पंपांना पुरवठा करायचा झाल्यास त्याचा दर वाढू शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी महावितरणने सौर कृषी पंपाचा पर्याय पुढे आणला; परंतु तो स्वीकारण्याची शेतकऱ्यांची फारशी मानसकिता नाही.

दृष्टिक्षेपात कृषी पंप

  • राज्यातील एकूण कृषी पंप : ४४ लाख ४९ हजार ४९५
  • कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी पंप : १ लाख ४६ हजार
  • पैसे भरून प्रलंबित असलेले जिल्ह्यातील वीज कनेक्शन्स : ४ हजार
  • सरासरी दर : १.२५ ते १.५० रुपये प्रति युनिट
  • वीज बिल आकारणी : दर तीन महिन्यांनी
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीज