शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बोगस वीज बिलातून शेतकऱ्यांची बदनामी -प्रताप होगाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 01:16 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व महाराष्ट राज्य वीज ग्राहक संघटना यांच्यावतीने कृषी पंपाची वीज जोडणी त्वरित द्या यासह

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद -संडे स्पेशल मुलाखत --महाराष्ट वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून आजतागायत चार हजार कोटींहून अधिक रकमेचा वीज ग्राहकांना लाभ मिळून दिला आहे.

अतुल आंबी ।स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व महाराष्ट राज्य वीज ग्राहक संघटना यांच्यावतीने कृषी पंपाची वीज जोडणी त्वरित द्या यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर काढण्यात येणाºया धडक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांच्याशी साधलेला थेट संवाद...

प्रश्न : कृषी पंप वीज बिलातून शेतकऱ्यांचा नेमका तोटा काय व कसा?उत्तर : वीज नियामक आयोगाने सहावेळा दरवाढ जाहीर केली. मात्र, सरकारने त्यावर आजतागायत एकदाही सवलतीचा दर जाहीर केला नाही. परिणामी शेतकºयांच्या वीज बिलात अडीचपट वाढ झाली. एकूण ४२ लाख ग्राहकांपैकी १६ लाख पंपांना मीटर नाही, तर २६ लाख जोडण्यांना मीटर लावले आहेत. मात्र, त्यातील फक्त २० टक्केच मीटर सुरू आहेत व ८० टक्के ग्राहकांना सरासरी बिल केले जाते. त्यामुळे १६ लाख ग्राहकांवर वीज वितरणमधील गळती, चोरी व भ्रष्टाचार यातील नुकसानीचे युनिट टाकून बोगस बिल केले जाते. त्यामुळे शेतकºयाची बदनामी होते.

प्रश्न : बोगस बिल कसे बनते?उत्तर : याची सुरुवात २०१०-११ पासून झाली आहे. वीज वहन व गळती १५ टक्के दाखवली जाते, तर शेती पंपाचा वापर ३० टक्के दाखविला जातो. प्रत्यक्षात मात्र हे आकडे उलट आहेत. महावितरणकडून शेतकºयांच्या जोडणीला अडीच पट अधिक अश्वशक्तीचे बिल वाढवून लावले जाते.

प्रश्न : यंत्रमागधारकांना दिलेल्या सवलतीत कशी फसवणूक झाली आहे?उत्तर : २७ अश्वशक्तीवरील दहा हजार ग्राहक, तर २७ अश्वशक्तीखालील ८० हजार आहेत. दोघांचाही सरासरी वीज वापर अंदाजे दोन हजार दशलक्ष युनिट आहे. सरकारने २७ अश्वशक्तीवरील ग्राहकांचा १ रुपये कापला व २७ अश्वशक्तीखालील ग्राहकांना दिला.बोगस सबसिडी दाखवून लूटसत्तेवर येण्यापूर्वी हे सरकार संघटनेबरोबर सहभागी होत होते. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वीज बिले जाळायला सोबत होते. आता संपूर्ण माहिती असूनही निर्णय घेतला जात नाही. सरकारच्या अशा धोरणांमुळे शेतकºयांसह सर्व प्रकारच्या ग्राहकांना नुकसान सहन करावे लागत आहे. बोगस सबसिडी दाखवून सरकारच्या मान्यतेने लूट केली जात आहे.योजना फेलसरकारची कृषी संजीवनी योजना सन २०१४ (अजित पवार) व सन २०१७ (चंद्रशेखर बावनकुळे) या दोन्ही योजना बोगस वीज बिलांच्या फुगवट्यामुळे फेल गेल्या. त्यानंतर कर्जमाफी केली. सन्मान योजना राबवली. शेतकºयांनी न वापरलेल्या बोगस वीज युनिटचा भार याच्यावर टाकला जातो आणि गोंडस नावाच्या योजना दाखविल्या जातात. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर