शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

बोगस वीज बिलातून शेतकऱ्यांची बदनामी -प्रताप होगाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 01:16 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व महाराष्ट राज्य वीज ग्राहक संघटना यांच्यावतीने कृषी पंपाची वीज जोडणी त्वरित द्या यासह

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद -संडे स्पेशल मुलाखत --महाराष्ट वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून आजतागायत चार हजार कोटींहून अधिक रकमेचा वीज ग्राहकांना लाभ मिळून दिला आहे.

अतुल आंबी ।स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व महाराष्ट राज्य वीज ग्राहक संघटना यांच्यावतीने कृषी पंपाची वीज जोडणी त्वरित द्या यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर काढण्यात येणाºया धडक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांच्याशी साधलेला थेट संवाद...

प्रश्न : कृषी पंप वीज बिलातून शेतकऱ्यांचा नेमका तोटा काय व कसा?उत्तर : वीज नियामक आयोगाने सहावेळा दरवाढ जाहीर केली. मात्र, सरकारने त्यावर आजतागायत एकदाही सवलतीचा दर जाहीर केला नाही. परिणामी शेतकºयांच्या वीज बिलात अडीचपट वाढ झाली. एकूण ४२ लाख ग्राहकांपैकी १६ लाख पंपांना मीटर नाही, तर २६ लाख जोडण्यांना मीटर लावले आहेत. मात्र, त्यातील फक्त २० टक्केच मीटर सुरू आहेत व ८० टक्के ग्राहकांना सरासरी बिल केले जाते. त्यामुळे १६ लाख ग्राहकांवर वीज वितरणमधील गळती, चोरी व भ्रष्टाचार यातील नुकसानीचे युनिट टाकून बोगस बिल केले जाते. त्यामुळे शेतकºयाची बदनामी होते.

प्रश्न : बोगस बिल कसे बनते?उत्तर : याची सुरुवात २०१०-११ पासून झाली आहे. वीज वहन व गळती १५ टक्के दाखवली जाते, तर शेती पंपाचा वापर ३० टक्के दाखविला जातो. प्रत्यक्षात मात्र हे आकडे उलट आहेत. महावितरणकडून शेतकºयांच्या जोडणीला अडीच पट अधिक अश्वशक्तीचे बिल वाढवून लावले जाते.

प्रश्न : यंत्रमागधारकांना दिलेल्या सवलतीत कशी फसवणूक झाली आहे?उत्तर : २७ अश्वशक्तीवरील दहा हजार ग्राहक, तर २७ अश्वशक्तीखालील ८० हजार आहेत. दोघांचाही सरासरी वीज वापर अंदाजे दोन हजार दशलक्ष युनिट आहे. सरकारने २७ अश्वशक्तीवरील ग्राहकांचा १ रुपये कापला व २७ अश्वशक्तीखालील ग्राहकांना दिला.बोगस सबसिडी दाखवून लूटसत्तेवर येण्यापूर्वी हे सरकार संघटनेबरोबर सहभागी होत होते. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वीज बिले जाळायला सोबत होते. आता संपूर्ण माहिती असूनही निर्णय घेतला जात नाही. सरकारच्या अशा धोरणांमुळे शेतकºयांसह सर्व प्रकारच्या ग्राहकांना नुकसान सहन करावे लागत आहे. बोगस सबसिडी दाखवून सरकारच्या मान्यतेने लूट केली जात आहे.योजना फेलसरकारची कृषी संजीवनी योजना सन २०१४ (अजित पवार) व सन २०१७ (चंद्रशेखर बावनकुळे) या दोन्ही योजना बोगस वीज बिलांच्या फुगवट्यामुळे फेल गेल्या. त्यानंतर कर्जमाफी केली. सन्मान योजना राबवली. शेतकºयांनी न वापरलेल्या बोगस वीज युनिटचा भार याच्यावर टाकला जातो आणि गोंडस नावाच्या योजना दाखविल्या जातात. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर