शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

किसान संघर्ष समितीच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:51 PM

संतोष बामणे ।उदगाव : उसाचा उतरलेला भाव, वाढलेले वीज बिल, भाजीपाल्याचा गडगडलेला दर, कर्जमाफीचा गोंधळ यामुळे शेतकºयांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे पिकाला हमीभाव देणाºया लोकप्रतिनिधींच्या डोळ्याला शेतकºयांची अवस्था दिसत नाही का? अशी जोरदार टीका सोशल मीडियावर वेग घेत आहे. त्यामुळे सात-बारा कोरा व उत्पादनाच्या खर्चाला दीडपट हमीभाव या विधेयकाला ...

संतोष बामणे ।उदगाव : उसाचा उतरलेला भाव, वाढलेले वीज बिल, भाजीपाल्याचा गडगडलेला दर, कर्जमाफीचा गोंधळ यामुळे शेतकºयांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे पिकाला हमीभाव देणाºया लोकप्रतिनिधींच्या डोळ्याला शेतकºयांची अवस्था दिसत नाही का? अशी जोरदार टीका सोशल मीडियावर वेग घेत आहे. त्यामुळे सात-बारा कोरा व उत्पादनाच्या खर्चाला दीडपट हमीभाव या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी देशातील सर्व संघटना एकत्र झाल्या असून, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या २८ मार्च रोजी होणाºया बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

देशातील सर्व शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच पाहिजे, या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी देशातील विविध शेतकरी संघटनांना एकत्रित करून दिल्लीत मोर्चा काढून शासनाला जाग आणली तेव्हापासून सात-बारा कोरा व उत्पादनाच्या खर्चाच्या दीडपट हमीभाव या मागणीचे विधेयक मंजूर करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पूर्ण भारतभर फिरून देशातील सर्व संघटनांना जागे करण्याचे काम केले आहे. याबाबत २८ मार्चला नवी दिल्ली येथे खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली कॉन्स्टिट्युशन क्लब बैठक होणार आहे.

शेतकºयांचे एका महिन्याचे वीज बिल थकले तर तोडले जाते. दुसरीकडे पाणीपुरवठा संस्थांच्या थकबाकीपोटी पाटबंधारे विभागाच्या संस्था सीलबंद करण्यात येत आहेत, तर उतरलेला उसाचा दर व गडगडलेला भाजीपाला यात शेतकऱ्यांची चारीबाजूंनी कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व शासनावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. या कारणाने अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

शेतकऱ्यांच्या हितासाठी सात-बारा कोरा व उत्पादनाला दीडपट हमीभाव मिळावा यासाठी विधेयक सादर करणार आहोत. याला देशातील १८२ शेतकरी संघटनांचा पाठिंबा आहे. या विधेयकाला कोणता खासदार पाठिंबा देणार नाही त्याला शेतकरी त्याच्या गावात जाऊ देणार नाहीत. त्यामुळे काहीही झाले तरी या सरकारवर दबाव आणून हे विधेयक मंजूर करून घेणारच.- राजू शेट्टी, खासदार