शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

पावसाच्या ओढीने शेतकरी घायाळ !

By admin | Updated: July 8, 2014 23:03 IST

परिस्थिती गंभीर नाही : जिल्ह्यात उपसा बंदी नाहीच; एक महिना पुरेल एवढे पाणी शिल्लक

कोल्हापूर : वेळेवर आणि भरपूर पाऊस पडणारा जिल्हा अशी संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने यंदा ओढ दिल्यामुळे शेतकरी पुरता घायाळ झाला आहे. पाऊस आज पडेल, उद्या पडेल म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या शेतकऱ्यांचे डोळे मात्र सध्या ढगांकडे लागले आहेत. पावसाने ओढ दिली असल्याने सर्वांचीच चिंता कायम असली तरी परिस्थिती मात्र गंभीर नाही, असा प्रशासनाचा दावा आहे. अद्यापही एक महिना पुरेल इतका पाणीसाठा धरणात असल्याने जिल्ह्यात कोठेही पाणी उपसा बंदी लागू केलेली नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी व नागरिकांना पिण्यासाठी नद्यांत पाणी सोडले जात आहे. जिल्ह्यात सगळीकडेच पाऊस म्हणावा तितका झालेला नाही. दरवर्षी हमखास चांगला पाऊस होतो. विशेष म्हणजे वेळेवर पडतो. कालचक्रानुसार पंधरा तीन आठवडे इकडे तिकडे होतात. परंतु, यावर्षी एक महिना ओलांडून गेला. मृग आणि आद्रा नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. वास्तविक आद्रा नक्षत्रात मोठा पाऊस होऊन नद्या-नाले भरून वाहात असतात. परंतु, यंदा महत्त्वाची दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एक तर जिल्ह्यात खरिपाच्या फक्त २५.४९ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उसाचे क्षेत्र धरून ५६.६३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित क्षेत्रात भाताची लागवड व्हायची बाकी आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके करपण्याची शक्यता आहे.पावसाने ओढ दिली असली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण आपल्याकडील धरणात अद्याप एक महिना शेतीला व पिण्यास पाणी पुरवू शकेल एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सांगितले. भोगावती नदीत पूर्वी २०० क्युसेक्स पाणी सोडले जात होते. त्याचा विसर्ग वाढवून ६०० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. इचलकरंजी शहराला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वारणा धरणातून पाणी सोडले असून, उद्या, मंगळवारपर्यंत हे पाणी इचलकरंजीला पोहोचणार आहे. अगदीच परिस्थिती नाजूक बनली तर रोेटेशन पद्धतीने पाणी सोडले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या पिण्याचे पाणी व शेतीचे पाणी व्यवस्थित पुरवठा होत आहे. एकाही गावात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही, असा दावा जिल्हाधिकारी माने यांनी केला. (प्रतिनिधी)