शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

Kolhapur: त्रास दिलेल्यांची नावे कोळशाने भिंतीवर लिहून शेतकऱ्याने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 11:30 IST

कर्जबाजारी झाल्यामुळे तो दारूच्या खूप आहारी गेला होता

गडहिंग्लज : त्रास दिलेल्यांची नावे गोठ्यातील भिंतीवर कोळशाने लिहून ठेवून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. सिद्धेश्वर रामचंद्र कानडे (वय ३९,रा.औरनाळ बस थांब्याजवळ दुंडगे, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, औरनाळ बस थांब्यानजीक राहणाऱ्या सिद्धेश्वर कानडे हा शेतीबरोबरच भाजीपाला आणि फळे विक्रीचा व्यवसाय करीत होता. कर्जबाजारी झाल्यामुळे तो दारूच्या खूप आहारी गेला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्याची पत्नी मुलांसह माहेरी राहत होती.सोमवारी, दुपारी आई बाजारासाठी गडहिंग्लजला गेली होती. त्यावेळी घरी कुणी नसल्याचे पाहून त्याने राहत्या घरालगतच्या जनावरांच्या गोठ्यातील तुळईला दारूच्या नशेतच दोरीने गळफास लावून घेतला. दरम्यान,बाजार करून आल्यानंतर त्याची आई जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेली होती. त्यावेळी सिद्धेश्वर याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे. रावसाहेब कुरबेट्टी यांच्या वर्दीवरुन गडहिंग्लज पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे.

भिंतीवर नावं लिहून..!उत्तूर येथील दूध संस्था, गडहिंग्लज येथील महिलेसह दुंडगे व गडहिंग्लज येथील एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे सिद्धेश्वर याने गोठ्यातील भिंतीवर कोळशाने लिहून ठेवले असल्याची चर्चा घटनास्थळी होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर