शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

वळीव बरसला, चिंता मिटली, दमदार पावसाने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 14:10 IST

अडीच महिन्यापासून पाठ फिरवलेल्या पावसाने वायू चक्रीवादळाच्या रुपाने का होईना कोल्हापुरात दमदार एन्ट्री केल्याने बळीराजा सुखावला असून त्याची चिंता कांहीअंशी मिटली आहे.

ठळक मुद्देवळीव बरसला, चिंता मिटली, दमदार पावसाने शेतकरी सुखावलापेरण्यांना सुरुवात, उभ्या पिकाला जीवदान

कोल्हापूर: अडीच महिन्यापासून पाठ फिरवलेल्या पावसाने वायू चक्रीवादळाच्या रुपाने का होईना कोल्हापुरात दमदार एन्ट्री केल्याने बळीराजा सुखावला असून त्याची चिंता कांहीअंशी मिटली आहे. पावसाअभावी भेगाळलेल्या जमिनींचीही तहान भागली आहे. पुरेसा ओलावा झाल्याने मशागत करुन ठेवलेल्या शिवारांमध्ये पेरणीची लगबगही सुरु झाली आहे. पाण्याअभावी करपणाऱ्या पिकांसाठी हा पाउस संजीवनी देणारा ठरला आहे. बऱ्याच प्रतिक्षेनंतर आगमन झालेल्या पावसात न्हाउन निघण्याचा आनंद अख्खी सृष्टी अनुभवत आहे.मान्सूनचे आगमन आणखी दोन दिवस लांबणीवर पडले असलेतरी अरबी समुद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळामुळे कोकण, मुंबई, मध्यमहाराष्ट्रासह दक्षिण महाराष्ट्रातही पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवार, मंगळवारी रात्री तासभर पावसाने चांगली हजेरी लावली.

आभाळ भरुन येत होते, पण जोराचा पाउस पडत नव्हता. बुधवारी सकाळी पावसाला सुरुवात झाल्याने प्रतिक्षा संपल्याचे वाटप असतानाच दुपारी परत उन पडले, पण अधेमधे एखादी येणारी सर दिलासा देउन जात होती. संध्याकाळी साडेपाचनंतर मात्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. जवळपास दीडतासाहून अधिक काळ पाउस पडला.जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १४५.६२ मिलीमीटर पाउस नोंदवण्यात आला. यात सर्वाधिक ३८ मिलीमीटर पाउस गगनबावड्यात झाला. चंदगडमध्ये २४.३३ तर आजºयात १३ आणि करवीरमध्ये १२. २७ मिलीमीटर तर भूदरगडमध्ये ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कागल, हातकणंगले, शिरोळमध्ये सर्वात कमी म्हणजे ३ ते ४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

उर्वरीत तालुक्यात चांगला पाउस झाल्याने शेतकऱ्यांची पिकांची चिंता मिटली आहे. पेरणीयोग्य पाउस असल्याने आणि चार दिवसात मान्सूनचे आगमन होणार असल्याने पेरणी आटोपून घेण्याच्या नियोजनात शेतकरी आहे. भात, सोयाबीन, भूईमुगाच्या पेरण्या आता वेग घेणार आहेत. राने तयार असल्याने आता केवळ टोकण करण्याचे काम शिल्लक राहिले आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर