शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

सुसज्ज मैदानांसाठी लोकचळवळ गरजेची-: राजकारण, हेवेदावे बाजूला ठेवून एकजूट आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:56 IST

मैदाने कमी होत आहेत, आहे त्या मैदानांची दुरवस्था होत आहे, अशी ओरड होते; पण ही दुरवस्था होत असताना मैदाने सुस्थितीत आणण्यासाठी आपलेही योगदान यात असावे

ठळक मुद्देनागरिकांसह खेळाडूंचा पुढाकार हवा

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : मैदाने कमी होत आहेत, आहे त्या मैदानांची दुरवस्था होत आहे, अशी ओरड होते; पण ही दुरवस्था होत असताना मैदाने सुस्थितीत आणण्यासाठी आपलेही योगदान यात असावे असे नागरिकांनाही वाटणे गरजेचे आहे. मैदाने टिकवायची असतील तर ती वापरणाऱ्या नागरिकांनी, तरुणांनी, खेळाडूंनी पुढे येण्याची गरज आहे. अशी चळवळ प्रत्येक मैदानाच्या भागात सुरू झाल्यास शहरात मैदानांचे रूप बदलणे अवघड नाही. शहरातील लोकचळवळीतून शास्त्रीनगर मैदान, कसबा बावडा पॅव्हेलियन या मैदानांचा होत असलेला कायापालट याचे उत्तम उदाहरण आहे.

दहावी-बारावीची परीक्षा संपल्याने उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की मुलांना ओढ लागते ती मैदानाची; पण शहरात खेळाडू जास्त आणि मैदाने कमी अशी स्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. आहेत ती मैदाने भाडेतत्त्वावर मेळावे किंवा अन्य कामांसाठी देण्यात आली आहेत. मोकळ्या जागेवर वाहनांच्या पार्किंगचा विळखा आहे. उपलब्ध मैदानांवर खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्याने मुलांना विविध अडचणी येत आहेत. त्यामुळे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. मैदानांच्या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येही खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर कोल्हापूरचा नावलौकिक केला आहे.हे खेळाडू आहेत त्या सुविधांमध्येच विविध क्रीडांगणांवर सराव करीत आहेत.

शहरातील महानगरपालिकेच्या गांधी मैदान, मेजर ध्यानचंद स्टेडियम, शास्त्रीनगर मैदान, रुईकर कॉलनी, सासने मैदान, मेरी वेदर मैदान, दुधाळी पॅव्हेलियन, कसबा बावडा पॅव्हेलियन यांसह शिवाजी स्टेडियम, शाहूपुरी जिमखाना, राजाराम कॉलेज, तपोवन मैदान अशी मोठी मैदाने आहेत.मात्र, येथील बहुतांश मैदानांवर खेळाडूंना आवश्यक सुविधांचा अभाव आहे. मैदानांना संरक्षण भिंत नसल्याने या ठिकाणी मोकाट जनावरांचा मुक्त वावर असतो. रात्रीच्या वेळी ही मैदाने ओपन बार म्हणून वापरली जातात. काही समारंभ असो किंवा अन्य कामांसाठी येथे पार्किंग नित्याचे झाले आहे; तर काही मैदानांवर दरवर्षी काही मेळावे, प्रदर्शने ही हे नित्याची झाली आहेत.खासगी समर कॅम्पवाल्यांनी मैदानावर कब्जा केलेला आहे. यामुळे मुलांना खेळण्यासाठी तर ज्येष्ठ नागरिक व नागरिकांना फिरण्यासाठी मोठी समस्या होते.

या समस्येला जशी महानगरपालिका कारणीभूत आहेच; तसेच नागरिकही. किती नागरिक मैदान सुस्थितीत ठेवण्यासाठी तळमळ दाखवतात? याबाबत उदासीनताच दिसून येते. महानगरपालिकेचे तोकडे नियोजनही याला कारणीभूत असले तरी लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधीची साथ मिळाल्यास महानगरपालिकेची शास्त्रीनगर, कसबा बावडा पॅव्हेलियन, रुईकर कॉलनी मैदानाचा झालेला विकास ही तीन ठसठशीत उदाहरणे आहेत.मैदानांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, मंडळे, खेळाडू आणि नागरिकांनी मैदान सुस्थितीत व निगा राखण्यासाठी मैदानात उतरले पाहिजे. विशेष म्हणजे, त्या परिसरातील नागरिकांनी राजकारण, हेवेदावे बाजूला ठेवून मैदानासाठी एक होऊन चळवळ प्रत्येक भागात सुरू झाल्यास मैदानांवरील सर्व समस्या काही वेळातच सुटतील. अशी चळवळ उभी करणे फार अवघड नाही. 

ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे मैदान स्वच्छ ठेवल्यास मनपाच्या कर्मचाऱ्यांची गरजही भासणार नाही. प्रत्येक मैदान परिसरातील तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मैदानातील तळिराम हटविण्यासाठी चळवळ उभी केल्यास, मैदानातील ओपन बारही बंद होईल.

- सुहास साळोखे, माजी खेळाडूमैदानाच्या प्रश्नी प्रत्येकाने राजकारण बाजूला ठेवून खेळाडू म्हणूनच मैदानाच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे. ही जबाबदारी स्थानिक नागरिकांचीही आहे. तिला शासनाची साथ मिळणे गरजेचे आहे.- सुरेश ढोणुक्षे, माजी नगरसेवक

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर