शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

फडणवीसांकडून महाविकास आघाडीत मतभेद करण्याचे डाव : शंभुराजे देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 11:46 IST

Shambhuraj Desai, kolhapur, BJP, Shiv Sena, politics देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेचा भगवा आता संपला असल्याच्या आरोपाचा गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करण्यासाठी फडणवीस अशा प्रकारचे बेछूट आरोप करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देफडणवीसांकडून महाविकास आघाडीत मतभेद करण्याचे डाव : शंभुराजे देसाई शिवसेनेचा भगवा संपल्याच्या आरोपाचा घेतला समाचार

कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेचा भगवा आता संपला असल्याच्या आरोपाचा गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करण्यासाठी फडणवीस अशा प्रकारचे बेछूट आरोप करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेना हा पक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा आहे. आजही या विचारावरच काम सुरू आहे. फडणवीस जबाबदार विरोधी पक्षनेते असल्यामुळे सरकारविरोधात टीका करण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय राहिलेला नसल्याचा टोलाही देसाई यांनी लगावला.शिवसेनेचा कोल्हापुरातील दसरा चौकातील दिगंबर जैन बोर्डिंग हॉलमध्ये पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी मेळावा झाला. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे ह्यपुणे पदवीधरह्णमधून अरुण लाड, शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर या उमेदवारांना निवडून आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेतला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मिळून प्रचाराचे नियोजन झाले आहे. तालुकानिहाय मेळावे घेतले जात आहेत. मतदानाची टक्केवारी जास्त करण्यावर महाविकास आघाडीचा भर आहे. समन्यवयाने, एका विचाराने काम सुरू आहे. यामध्ये शिवसेना आपली जबाबदारी ताकदीने पार पाडेल.देसाई म्हणाले...

  • एस.टी.प्रमाणेच महावितरणबाबतही मदत देण्याचा सहानुभूतिपूर्वक विचार केला जाईल.
  • कोरोनाची दुसरी लाट येईल, असे अपेक्षित धरून सर्व उपाययोजना केल्या आहेत.
  • कोविड सेंटर तात्पुरती बंद केली आहेत.
  • आवश्यक ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे.
  • परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासन सज्ज आहे.
  • पालकांची संमती, रुग्णसंख्या कमी असेल तरच शाळा सुरू; जिल्हाधिकाय्रांना सर्वाधिकार
  • १२ जणांच्या राज्यपालनियुक्त आमदार पदाबाबत राज्यपाल सकारात्मक विचार करतील.
  • महिला सुरक्षा कायदा (दिशा ॲक्ट) प्रारूप स्वरूपात अंतिम टप्प्यात.

महाविकास आघाडीत निधीवरून वाद नाहीत.निधीवाटपात महाविकास आघाडीत दुजाभाव होत असल्याचे आरोप होत असल्याबाबत विचारले असता देसाई म्हणाले, प्रत्येकाला अधिकचा निधी मिळावा, अशी अपेक्षा आहे. कोरोनामुळे उद्योग-व्यवसायांवर परिणाम झाला. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत अपेक्षित उत्पन्न जमा झाले नाही. निधी देण्यात दुजाभाव नसून महाविकास आघाडीत समन्वय आहे. मुख्यमंत्री सर्वांशी समतोल राखण्याचे आणि न्याय देण्याचे काम करीत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणShambhuraj Desaiशंभूराज देसाईkolhapurकोल्हापूरBJPभाजपाShiv Senaशिवसेना