शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

कारखान्यांनी लिहून घेतलेली संमतीपत्रे अमान्यच : ‘एफआरपी’ वेळेत द्यावीच लागेल-- सौरव राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 2:01 PM

शेतकरी कारखान्यांकडे ज्यावेळी उसाची नोंद देतात, त्यावेळी करारनाम्यात बेकायदेशीर अट टाकली जाते. दोन टप्प्यांत एफआरपी द्या, याबाबत कोठेही तक्रार करणार नाही, व्याजही मागणार नाही, असे लिहून घेतले जाते.

कोल्हापूर : ‘एफआरपी’ दोन टप्प्यांत देण्याबाबत साखर कारखान्यांनी ऊसनोंद करारात घेतलेली संमतीपत्रे अमान्य असून, शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ वेळेत द्यावीच लागेल. जे देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा साखर आयुक्त सौरभ राव यांनी दिला.

संमतीपत्राच्या आडून साखर कारखानदार शेतकऱ्यांची आडवणूक करीत असल्याबाबत सोमवारी (दि. १०) आंदोलन अंकुश, जय शिवराय व बळिराजा शेतकरी संघटना यांच्या वतीने साखर आयुक्त राव यांची भेट घेतली. शेतकरी कारखान्यांकडे ज्यावेळी उसाची नोंद देतात, त्यावेळी करारनाम्यात बेकायदेशीर अट टाकली जाते. दोन टप्प्यांत एफआरपी द्या, याबाबत कोठेही तक्रार करणार नाही, व्याजही मागणार नाही, असे लिहून घेतले जाते. याबाबत शेतकरी अनभिज्ञ राहतो. मात्र संमतीपत्राचा आधार घेऊन साखर कारखाने एफआरपीप्रमाणे उसाचे पैसे देण्यासाठी शेतकºयांची अडवणूक करीत आहेत.

कारखान्याकडे पैसे उपलब्ध होतील त्यावेळी देऊ, अशी भूमिका घेतल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचे संघटनांनी निदर्शनास आणून दिले. यावर अशा प्रकारची अडवणूक पूर्णपणे चुकीची असून कायद्याप्रमाणे चौदा दिवसांत शेतकºयांना पैसे देणे बंधनकारक आहे. विहीत वेळेत एफआरपी न दिल्यास १५ टक्क्यांप्रमाणे व्याज द्यावे लागेल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

यावेळी ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे, जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने, ‘बळिराजा’ संघटनेचे बी. जी. पाटील, राकेश जगदाळे, आदी उपस्थित होते.अवास्तव नोकरभरतीला चाप लावणारअवास्तव नोकरभरती केल्याने साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्याचा परिणाम शेतक-यांना एफआरपी देण्यावर होतो; त्यामुळे अशा प्रकारच्या भरतीला चाप लावणार असल्याचे आयुक्त राव यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर