शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

आर्थिक अरिष्टातील साखर उद्योगाला इथेनॉलचा ‘बूस्टर’

By राजाराम लोंढे | Updated: July 25, 2022 14:26 IST

बाजारपेठेची भूक ओळखून तेवढ्याच साखरेचे उत्पादन करुन उर्वरित इथेनॉलची निर्मिती करण्यास कारखान्यांनी सुरुवात केल्याने हा उद्योग सावरण्यास मदत होत आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : उसाचे वाढलेले क्षेत्र, त्यातून साखरेच्या उत्पादनात झालेल्या मोठ्या वाढीमुळे साखरेचे दर अस्थिर झाले होते. परिणामी सगळा साखर उद्योगच आर्थिक अरिष्टात सापडला होता. मात्र बाजारपेठेची भूक ओळखून तेवढ्याच साखरेचे उत्पादन करुन उर्वरित इथेनॉलची निर्मिती करण्यास कारखान्यांनी सुरुवात केल्याने हा उद्योग सावरण्यास मदत होत आहे.आगामी साखर हंगामात जिल्ह्यात २५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार आहे. स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेच्या दरातील अस्थिरतेमुळे साखर उद्योग अडचणीत आला. अडचणीत येण्यात हे जरी कारण असले तरी काही कारखान्यांमधील गैर व्यवस्थापन ही तितकेच कारणीभूत ठरले. हंगाम २०१५ पासून कारखाने अधिक अरिष्टात सापडत गेले.उसाची एफआरपी देण्यासाठी या कालावधीत तीन ते चार वेळा कारखान्यांना कर्जे घ्यावी लागली. साखरेचे आयात, निर्यात धोरणाचा फटका बसल्याने साखरेचे दर घसरत गेले. केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव निश्चित केला, मात्र एकीकडे एफआरपी वाढत असताना दुसऱ्या बाजूला त्या पटीत साखरेचे दर वाढले नाहीत, हेही वस्तुस्थिती आहे.

इथेनॉल, निर्यात धोरणामुळे साखर स्थिर

इथेनॉल निर्मिती केल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी झाले, त्यात निर्यात धोरणामुळे गेल्या वर्षभर साखरेचे दर स्थिर राहिले आहेत. घाऊक बाजारात प्रति क्विंटल ३१०० ते ३२५० रुपयांपर्यंत साखर राहिली असली तरी किरकोळ बाजारात ३८०० पर्यंत आहे.

हे कारखाने करतात इथेनॉल निर्मिती दत्त-शिरोळ, गुरुदत्त-टाकळीवाडी, वारणा, दालमिया, शाहू, सदाशिवराव मंडलीक, संताजी घोरपडे, पंचगंगा, उदयसिंगराव गायकवाड.

‘कुंभी’, ’बिद्री’चा प्रकल्प प्रस्तावित

बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा वेदगंगा व कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी कारखान्यांचे इथेनॉल प्रकल्प प्रस्तावित आहेत. येत्या वर्षभरात ते चालू होणार असल्याने जिल्ह्यात इथेनॉलचे उत्पादन वाढणार आहे.

गेल्या पाच-सहा वर्षात साखर उद्याेग कधी नव्हे इतका अडचणीत आला. आता बाजारपेठेच्या गरजेनुसार साखर उत्पादन, इथेनॉल निर्मिती व निर्यात या त्रिसुत्रीमुळे साखर उद्योग हळूहळू बाहेर पडण्यास मदत होईल. - विजय औताडे (साखर उद्योगातील तज्ज्ञ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने