शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: पंचगंगा नदीपात्रातील मृत माशांमागे परिसरातील कारखानेच, अभ्यासकांचा निष्कर्ष 

By संदीप आडनाईक | Updated: January 9, 2023 13:53 IST

मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापर

संदीप आडनाईककोल्हापूर : पंचगंगा नदीपात्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मृत मासे तरंगताना आढळत आहेत. शिये परिसर, राजाराम बंधारा आणि वळीवडे-गांधीनगर, तेरवाड येथील नदीपात्रापासून इचलकरंजीपर्यंत मृत माशांचे खच आढळल्याने नदी प्रदूषणाला या परिसरातील कारखानेच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण अभ्यासकांनी काढला असून या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनाही जबाबदार धरण्याची मागणी करण्यात आली आहे.गेल्या चार दिवसांपासून पंचगंगा नदीपात्रात आढळलेल्या मृत माशांप्रकरणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेच्या दिलीप देसाई यांनी इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या पाण्याचे केवळ नमुनेच तपासण्यासाठी नेले आहेत. तसेच मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी काही ठिकाणच्या मृत माशांना नदीपात्रातून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.

याप्रकरणी मंडळामार्फत सोमवारी नदीपात्रातील प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या कारखान्यांना नोटीस काढण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रदूषणाकडे जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे त्यांनाही जबाबदार धरावे, अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रदूषण रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष पुण्याचे विभागीय आयुक्त असून त्यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकांचे आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. अशा प्रदूषणांवर नजर ठेवण्यासाठी आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी आठवड्यातून एकदा बैठक घ्यायची असते, अशीही माहिती देसाई यांनी दिली.कारखाने कारणीभूतपंचगंगा नदीपात्रातील पाणी केवळ एका दिवसात प्रदूषित झालेले नाही. भोगावती, राजाराम बंधारा, इचलकरंजी परिसरातील कारखाने या प्रदूषणाला कारणीभूत आहेत. याशिवाय छोट्या कारखान्यांची रसायनेही याला कारणीभूत आहेत. गांधीनगर परिसरातील फरसाण निर्मिती करणाऱ्या कारखान्यांतूनही नदीपात्रात आणून सोडलेले पदार्थ या प्रदूषणाला कारणीभूत आहेत, असे पर्यावरण अभ्यासकांचा निष्कर्ष आहे.

मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापरमासेमारी करणारे मच्छीमार मोठ्या प्रमाणात ब्लिचिंग पावडरचा वापर करत असल्यामुळे त्यामुळेही नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. त्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात नदीचे पाणी हिरवे होत नाही. याचा सविस्तर अहवाल तयार करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfishermanमच्छीमारpollutionप्रदूषणriverनदी