शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

अतिवृष्टीबरोबरच मानवी चुकांमुळे महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 11:04 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकाच वेळी धरण तसेच नदीक्षेत्रांत झालेला दुप्पट पाऊस, पूररेषेतील बांधकामे तसेच ‘गेट आॅपरेशन शेड्युल’ तंतोतंत हाताळण्यात झालेल्या मानवी चुका यांमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसल्याचा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे. अलमट्टी धरणातील पाणी सोडण्यातही हलगर्जीपणा झाल्याचे सांगण्यात येते.

ठळक मुद्देअतिवृष्टीबरोबरच मानवी चुकांमुळे महापूरजाणकारांचा दावा : बांधकामामुळे नद्यांचे बेसिन झाले कमी

भारत चव्हाण

कोल्हापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकाच वेळी धरण तसेच नदीक्षेत्रांत झालेला दुप्पट पाऊस, पूररेषेतील बांधकामे तसेच ‘गेट आॅपरेशन शेड्युल’ तंतोतंत हाताळण्यात झालेल्या मानवी चुका यांमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसल्याचा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे. अलमट्टी धरणातील पाणी सोडण्यातही हलगर्जीपणा झाल्याचे सांगण्यात येते.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना बसलेल्या महापुराला कोणतीही एक घटना जबाबदार नाही तर अनेक कारणे आहेत. निसर्गाचा प्रकोप तर आहेच; शिवाय मानवी चुकासुद्धा झाल्याची बाब समोर येत आहे. यावर्षी जून महिना कोरडा गेला, पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातही तशीच अवस्था होती.

जुलैच्या शेवटी-शेवटी पावसाने जोर धरला. पावसाने ओढ दिल्यामुळे धरणातील पाणी सोडायचे की नाही अशा संभ्रमात जलसंपदाचे अधिकारी होते. अलमट्टी धरणाचे जबाबदार अधिकारीही अशाच संभ्रमात राहिले. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी पाणी अडवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले.अचानक जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोर धरला आणि आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात तर तो अधिकच वाढला. धरणक्षेत्र तसेच नदीक्षेत्रात एकच वेळी दुप्पट-तिप्पट पाऊस पडू लागला. बघता-बघता कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील धरणांतून विसर्ग वाढवला. कृष्णा, कोयना, वारणा व पंचगंगा नद्यांना एकाच वेळी महापूर आल्यामुळे त्याची तीव्रता वाढली.

महापुराचे पाणी अलमट्टी धरणाच्या दिशेने पुढे सरकत होते, तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनीही येणारे पाणी अडवून ठेवण्याचे काम केले. परिणामी महापुराची परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा फटका कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला बसला, असा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे.

पूररेषेतील बांधकामांचा फटकानदीकाठावर होत असलेले अतिक्रमण हेही एक कारण महापुराबद्दल सांगितले जात आहे. प्रत्येक शहरात, गावात नदीकाठावर पूररेषेच्या आत मोठ्या प्रमाणात बांधकामे होऊ लागली आहेत. त्यावर कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे नद्यांचे पाणी साठवून ठेवण्याची (बेसिन) क्षमता कमी होत असून पाणी नागरी वस्तीत घुसत आहे. मोठा पाऊस झाला की नदी आपल्या मूळ पात्रात महापुराचे पाणी सामावून घेऊ शकत नाही.

गेट आॅपरेशन शेड्युल चुकलेपाच आॅगस्टपासून महापुराची वाटचाल विध्वंसाकडे सुरू झाली तेव्हा धरणाचे ‘गेट आॅपरेशन शेड्युल’ चुकत असल्याचे जाणवत होते. दुप्पट-तिप्पट पाऊस होत असताना सगळी धरणे एकाच वेळी भरली. त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला. अलमट्टी धरणात प्रतिसेकंद ६ लाख ८० हजार क्युसेक पाणी येऊन मिसळत असताना तेथील अधिकाऱ्यांनी त्याच्या बदल्यात ५ लाख ३० हजार क्युसेक्स पाणी धरणातून सोडण्यात येत होते. याचा अर्थ प्रतिसेकंद दीड लाख क्युसेक्स पाणी धरणात साठत होते. म्हणूनच पाण्याची फुग वाढली, पाणीही लवकर उतरत नव्हते, असे या क्षेत्रातील अभ्यासक बी. एस. घुणकीकर यांनी सांगितले.कोल्हापुरातील पाऊस

  •  गतवर्षी १२ आॅगस्टपर्यंत झालेला पाऊस - ७७७ मी.मी.
  • यावर्षी १२ आॅगस्टपर्यंत झालेला पाऊस - १४२८ मी.मी.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर