शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अतिवृष्टीबरोबरच मानवी चुकांमुळे महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 11:04 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकाच वेळी धरण तसेच नदीक्षेत्रांत झालेला दुप्पट पाऊस, पूररेषेतील बांधकामे तसेच ‘गेट आॅपरेशन शेड्युल’ तंतोतंत हाताळण्यात झालेल्या मानवी चुका यांमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसल्याचा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे. अलमट्टी धरणातील पाणी सोडण्यातही हलगर्जीपणा झाल्याचे सांगण्यात येते.

ठळक मुद्देअतिवृष्टीबरोबरच मानवी चुकांमुळे महापूरजाणकारांचा दावा : बांधकामामुळे नद्यांचे बेसिन झाले कमी

भारत चव्हाण

कोल्हापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकाच वेळी धरण तसेच नदीक्षेत्रांत झालेला दुप्पट पाऊस, पूररेषेतील बांधकामे तसेच ‘गेट आॅपरेशन शेड्युल’ तंतोतंत हाताळण्यात झालेल्या मानवी चुका यांमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसल्याचा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे. अलमट्टी धरणातील पाणी सोडण्यातही हलगर्जीपणा झाल्याचे सांगण्यात येते.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना बसलेल्या महापुराला कोणतीही एक घटना जबाबदार नाही तर अनेक कारणे आहेत. निसर्गाचा प्रकोप तर आहेच; शिवाय मानवी चुकासुद्धा झाल्याची बाब समोर येत आहे. यावर्षी जून महिना कोरडा गेला, पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातही तशीच अवस्था होती.

जुलैच्या शेवटी-शेवटी पावसाने जोर धरला. पावसाने ओढ दिल्यामुळे धरणातील पाणी सोडायचे की नाही अशा संभ्रमात जलसंपदाचे अधिकारी होते. अलमट्टी धरणाचे जबाबदार अधिकारीही अशाच संभ्रमात राहिले. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी पाणी अडवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले.अचानक जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोर धरला आणि आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात तर तो अधिकच वाढला. धरणक्षेत्र तसेच नदीक्षेत्रात एकच वेळी दुप्पट-तिप्पट पाऊस पडू लागला. बघता-बघता कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील धरणांतून विसर्ग वाढवला. कृष्णा, कोयना, वारणा व पंचगंगा नद्यांना एकाच वेळी महापूर आल्यामुळे त्याची तीव्रता वाढली.

महापुराचे पाणी अलमट्टी धरणाच्या दिशेने पुढे सरकत होते, तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनीही येणारे पाणी अडवून ठेवण्याचे काम केले. परिणामी महापुराची परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा फटका कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला बसला, असा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे.

पूररेषेतील बांधकामांचा फटकानदीकाठावर होत असलेले अतिक्रमण हेही एक कारण महापुराबद्दल सांगितले जात आहे. प्रत्येक शहरात, गावात नदीकाठावर पूररेषेच्या आत मोठ्या प्रमाणात बांधकामे होऊ लागली आहेत. त्यावर कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे नद्यांचे पाणी साठवून ठेवण्याची (बेसिन) क्षमता कमी होत असून पाणी नागरी वस्तीत घुसत आहे. मोठा पाऊस झाला की नदी आपल्या मूळ पात्रात महापुराचे पाणी सामावून घेऊ शकत नाही.

गेट आॅपरेशन शेड्युल चुकलेपाच आॅगस्टपासून महापुराची वाटचाल विध्वंसाकडे सुरू झाली तेव्हा धरणाचे ‘गेट आॅपरेशन शेड्युल’ चुकत असल्याचे जाणवत होते. दुप्पट-तिप्पट पाऊस होत असताना सगळी धरणे एकाच वेळी भरली. त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला. अलमट्टी धरणात प्रतिसेकंद ६ लाख ८० हजार क्युसेक पाणी येऊन मिसळत असताना तेथील अधिकाऱ्यांनी त्याच्या बदल्यात ५ लाख ३० हजार क्युसेक्स पाणी धरणातून सोडण्यात येत होते. याचा अर्थ प्रतिसेकंद दीड लाख क्युसेक्स पाणी धरणात साठत होते. म्हणूनच पाण्याची फुग वाढली, पाणीही लवकर उतरत नव्हते, असे या क्षेत्रातील अभ्यासक बी. एस. घुणकीकर यांनी सांगितले.कोल्हापुरातील पाऊस

  •  गतवर्षी १२ आॅगस्टपर्यंत झालेला पाऊस - ७७७ मी.मी.
  • यावर्षी १२ आॅगस्टपर्यंत झालेला पाऊस - १४२८ मी.मी.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर