शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

निर्यात अनुदानाचे प्रस्ताव अद्याप कारखान्यातच पडून-विभागात ६२ हजार टन साखर निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:55 IST

कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी डिसेंबरअखेर ६२ हजार २७ टन साखर निर्यात केली असली तरी तिच्या अनुदानाचे प्रस्ताव शासनाकडे सादर केलेले नाहीत. प्रस्ताव कारखान्यातच असून,

ठळक मुद्देअनुदानावर उर्वरित एफआरपी मिळण्यास पावसाळा येणार

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी डिसेंबरअखेर ६२ हजार २७ टन साखर निर्यात केली असली तरी तिच्या अनुदानाचे प्रस्ताव शासनाकडे सादर केलेले नाहीत. प्रस्ताव कारखान्यातच असून, लेखापरीक्षण होऊन प्रस्ताव प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे दाखल होणार; तेथून पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन अनुदान मिळेल. या अनुदानातून उर्वरित एफआरपीची रक्कम मिळण्यासाठी पावसाळा उजाडण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने देशातील अतिरिक्त साखर बाहेर काढण्यासाठी १२ आॅक्टोबर २०१८ रोजी ५० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेतला. त्यानुसार देशातील साखर कारखान्यांना निर्यात कोटा ठरवून दिला. हंगाम २०१८-१९ मधील एकूण उत्पादनाच्या १५ टक्के साखर निर्यात करणे कारखान्यांना बंधनकारक केले. कारखान्यांना दिलेला साखरेचा कोटा ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत निर्यात करावाच लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून कारखान्यांना उसाला प्रतिटन १३८.८० रुपये अनुदान मिळणार आहे. कोल्हापूर विभागातील कारखान्यांना ८ लाख १७ हजार ३७४ टन साखर निर्यातीचा कोटा दिला होता. निर्यातीचे आदेश काढून साडेचार महिने झाले. या कालावधीत कोल्हापूर विभागातील बारा कारखान्यांनी केवळ ६२ हजार २७ टन साखर निर्यात केली आहे.

यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी २९ हजार ७४६, तर सांगलीतील सात कारखान्यांनी ३२ हजार २८१ टन निर्यात केली आहे. त्याचबरोबर देशातील ३० लाख टन साखरेच्या बफर स्टॉकचा निर्णय केंद्राने १५ जून रोजी घेतला. त्याची अंमलबजावणी १ जुलै २०१८ पासून सुरू केली. साठ्यावरील भांडवलाचे व्याज, विमा आणि साठवणूक खर्च प्रत्येक तीन महिन्यांनी देण्यात येणार आहे. विभागातील ३१ कारखान्यांनी बफर स्टॉक केला आहे. केंद्राने निर्यात अनुदानासह बफर स्टॉक व निर्यात वाहतुकीचे अनुदान तातडीने देण्याचे मान्य केले आहे.

त्यातच साखरेची किमान किंमत प्रतिटन २९०० वरून ३१०० रुपये केल्याने एकरकमी ‘एफआरपी’चा गुंता सुटेल असे वाटत होते; पण निर्यातीसह इतर अनुदान वगळता उर्वरित एफआरपी देण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला आहे. साधारणत: निर्यात अनुदान, बफर स्टॉक व वाहतूक अनुदानातून प्रतिटन २५० रुपये मिळू शकतात. तेवढी रक्कम वजा करून शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहेत. बफर स्टॉक साठवणूक खर्चाचे प्रस्ताव बहुतांश कारखान्यांचे प्रस्ताव दाखल होऊन त्यांना पैसेही मिळालेले आहेत; पण निर्यात अनुदान व वाहतुकीचे प्रस्ताव अद्याप एकाही कारखान्याने साखर सहसंचालक कार्र्यालयाकडे पाठविलेले नाहीत.निर्यात पुरावा प्रमाणपत्राचा अडसरसाखर निर्यात कराराबरोबरच निर्यात पुरावा प्रमाणपत्राची (बीआरसी) सक्ती केली आहे. हे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय अनुदान मिळत नाही; पण निर्यातीनंतर दोन-अडीच महिन्यांनी हे प्रमाणपत्र मिळते. त्यानंतर शासकीय साखळीतून प्रस्ताव पुढे सरकतो.निर्यात पुरावा प्रमाणपत्राची वाट न पाहता केंद्राने ९० टक्के अनुदान दिले पाहिजे. यासाठी नुकतीच केंद्रीय सचिवांच्या बैठकीत मागणी केली आहे. त्याचबरोबर अनुदान प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया वेगाने केली पाहिजे.- पी. जी. मेढे, साखर उद्योगातील तज्ज्ञया कारखान्यांनी केली साखर निर्यात टनांतकारखाना कोटा निर्यातजवाहर ३५,०१९ १६,८७५शाहू १६,६६९ १,७६३वारणा १८,०५३ २,४४५दालमिया १८,२७० २,९५१कारखाना कोटा निर्यातओलम १२,७६८ ८,२४७हुतात्मा १७,२७५ ४,२६०सोनहिरा १७,८७३ ४,९४८निनाईदेवी २,८६९ २,८६९कारखाना कोटा निर्यातदत्त इंडिया १०,००१ ६८७सदगुरू ४,८७८ १,३००उदगिरी ९,०५० ७,१११केन अ‍ॅग्रो ८,५७१ ८,५७१

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर