शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

गॅस पाईपलाईन जोडणीच्या दिवशीच स्फोट; कोल्हापुरात दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:27 IST

गॅस पुरवठा कंपनी विरोधात संताप

कोल्हापूर : घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी झाले. हा प्रकार सोमवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास कळंबा कारागृहाच्या पाठीमागील एलआयसी कॉलनीतील मनोरंभ कॉलनीत झाला. अनंत भोजणे (वय ६०), शीतल अमर भोजणे (२९), प्रज्ज्वल अमर भोजणे (साडेपाच वर्षे) आणि इशिका अमर भोजणे (३) अशी जखमींची नावे आहेत. स्फोट आणि आगीत दोन घरातील प्रापंचिक साहित्याचे सुमारे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाले.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मनोरंभ कॉलनीत राहणारे अमर भोजने हे शहरातील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतात. सोमवारी दुपारी ते कामावर गेले होते. त्यावेळी त्यांचे वडील अनंत, पत्नी शीतल आणि दोन्ही मुले घरात होती. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या घरात गॅस पुरवठा करणारी पाईपलाईन आणि मीटरची जोडणी केली होती. मात्र, गॅस पुरवठा सुरू केला नव्हता. रात्री पावणेअकराच्या सुमारास अचानक घरात स्फोट झाला. स्फोट एवढा भयानक होता की खिडकीच्या काचा फुटून समोरच्या घरात आगीच्या झळा पोहोचल्या तसेच प्रापंचिक साहित्याचे जळून नुकसान झाले. स्फोटामुळे घरातील पडदे जळाले. छताचे सिलिंग आणि भिंतीचे प्लास्टर निघाले. आगीने पेट घेतलेल्या अवस्थेत अनंत भोजने आणि शीतल भोजने हे घरातून बाहेर पळत आले. हा प्रकार लक्षात येताच गल्लीतील राजेश्वरी सचिन देशमाने, रमेश पाटील, रविना पाटील यांनी अंगावर ब्लँकेट टाकून दोघांची आग विझवली तसेच घरात अडकलेला प्रज्वल आणि इशिका या दोघांना बाहेर काढले. खासगी वाहनातून त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

पंधरा मिनिटांत आग विझवलीवर्दी मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने आग विझवली. या आगीत भोजने यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचे सुमारे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले तसेच समोरचे रमेश पाटील यांच्या घराचे एक ते दोन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. स्टेशन ऑफिसर जयवंत खोत, संग्राम मोरे, प्रवीण ब्रह्मदंडे, मोहसीन पठाण, संभाजी ढेपले, विक्रम कुंभार आणि सागर पाटील यांनी आग विझविली.

गॅस पुरवठा कंपनी विरोधात संतापघरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने सोमवारीच या परिसरात मीटर जोडणीचे काम सुरू केले. गॅस जोडणी केलेल्या पहिल्या घरात पहिल्याच दिवशी दुर्घटना घडल्याने गॅस पुरवठा कंपनी विरोधात नागरिकांनी प्रचंड संपात व्यक्त केला. मीटर जोडणी पूर्ण झाल्याशिवाय कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गॅस पुरवठा कसा सुरू केला? असा सवाल या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मयूर भोसले यांनी व्यक्त केला.